शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 12:08 PM

राज्यात २४ हजार जागा येत्या सहा महिन्यात भरणार, असा दावा एकीकडे शिक्षणमंत्र्यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे ग्रामविकास विभागाने नव्या शिक्षक भरतीचा मार्ग खडतर केला आहे.

ठळक मुद्दे‘कम्पलसरी व्हॅकन्सी’चा खोडाअतिरिक्त शिक्षकांच्या जागा रिक्त ठेवण्याचे आदेश

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात २४ हजार जागा येत्या सहा महिन्यात भरणार, असा दावा एकीकडे शिक्षणमंत्र्यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे ग्रामविकास विभागाने नव्या शिक्षक भरतीचा मार्ग खडतर केला आहे. जिल्हा परिषद शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या जागा ‘कम्पलसरी व्हॅकन्सी’ म्हणून नोंदविण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने शनिवारी दिल्यामुळे आता नव्या भरतीसाठी जागा कुठून उपलब्ध होतील, हा प्रश्न डीएडधारकांपुढे उभा ठाकला आहे.तब्बल पाच वर्षानंतर शिक्षक भरतीचे सुतोवाच शिक्षण विभागाने केले आहे. त्यासाठी नुकतीच डिसेंबर महिन्यात बुद्धीमत्ता आणि अभियोग्यता चाचणीही घेण्यात आली. ही परीक्षा देणारे पावणे दोन लाख विद्यार्थी अडीच महिन्यानंतरही ‘रिझल्ट’च्याच प्रतीक्षेत आहेत. तर दुसरीकडे फेब्रुवारीमध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी २४ हजार शिक्षक पदे सहा महिन्यात भरणार असल्याचे जाहीर केले. सध्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया ‘पाईपलाईन’मध्ये आहे. ती पूर्ण होताच रिक्त जागा भरल्या जातील, असा दावा केला जात आहे.१ जानेवारी रोजीच्या पटसंख्येनुसार जिल्हा परिषद शाळांची संचमान्यता पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात सहायक शिक्षक, पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक आदींची तब्बल १४ हजार पदे अतिरिक्त ठरली आहेत. तर हजारो शाळांमध्ये पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षकांची उपलब्धता नाही. त्यामुळे बदली प्रक्रियेनंतर रिक्त जागांवर नवी भरती केली जाईल, अशी आशा ‘टेट’च्या परीक्षार्थ्यांना होती. त्यात आता ग्रामविकास विभागाच्या ‘कम्पलसरी व्हॅकन्सी’च्या आदेशाने खोडा घातला आहे.या आदेशानुसार, संचमान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करता येणार आहे. परंतु, ते ज्या शाळेत अतिरिक्त ठरले आहेत, तेथील जागांवर यापुढे कोणत्याही शिक्षकांची बदली करू नये, असे आदेशात म्हटले आहे. बदली प्रक्रियेसाठी त्या जागांचे मॅपिंग करताना तेथे ‘कम्पलसरी व्हॅकन्सी’ (अनिवार्य रिक्त जागा) दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील १४ हजार शिक्षक पदे व्यपगत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.बंद होणाऱ्या शाळांची संख्या वाढणारशिक्षण विभागाने आधीच १० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद केल्या आहेत. तर आता ३० पेक्षा कमी पटांच्या शाळांची आकडेवारी गोळा करणे सुरू केले आहे. ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हे संचमान्यतेचे सूत्र आहे. आता संचमान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या जागाच कायमच्या रिक्त ठेवण्याचे आदेश ग्रामविकासने दिले. त्यामुळे ३० पेक्षा कमी पटाच्या शाळाही येत्या सत्रात बंद होण्याचा धोका स्पष्ट झाला आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक