शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

मुलांच्या अ‍ॅडमिशनऐवजी घेतले नळ कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 22:34 IST

लोहारा विभागातील पंचशीलनगर दलित वस्तीत पाण्याची भीषण टंचाई आहे. वर्षभरच या भागात पाण्यासाठी संघर्षाची स्थिती असते. उन्हाळ्यात या संकटाची भीषणता आणखीच वाढली आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकांना पावसाळ्यात नळाचे नवीन कनेक्शन देण्यात आले.

ठळक मुद्देनळाला थेंबभर पाणी नाहीकेवळ आश्वासनांचाच भडीमारटँकरमधून मिळते अशुद्ध पाणीदहा दिवसानंतर टँकरची फेरी

रुपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोहारा विभागातील पंचशीलनगर दलित वस्तीत पाण्याची भीषण टंचाई आहे. वर्षभरच या भागात पाण्यासाठी संघर्षाची स्थिती असते. उन्हाळ्यात या संकटाची भीषणता आणखीच वाढली आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकांना पावसाळ्यात नळाचे नवीन कनेक्शन देण्यात आले. त्याकरिता मोठी रक्कम मोजावी लागली. येथील लोकांनी मुलांची अ‍ॅडमिशन न करता नळाचे कनेक्शन घेतले. पण त्या नळाला थेंबभरही पाणी आले नाही.पंचशीलनगरात पाण्याच्या व्यवस्थेकडे नगरपरिषदेचे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. टँकरची व्यवस्था झाली पण हे टँकर नऊ ते १० दिवसांनी येत आहे. मिळालेल्या टँकरमधून ड्रमभर पाणी येते. हे पाणी शेवाळलेले वास असलेले आहे. पण टंचाईकाळात नाईलाजाने ते भरून ठेवावे लागत आहे. या वसाहतीपासून जवळच औद्योगिक वसाहतीमधील गोखी पॉर्इंटचे पाणी आहे. हे पाणी शुद्ध आहे. त्या ठिकाणी दररोज टँकर जातात. मात्र आजपर्यंत हे शुद्ध पाणी पंचशीलनगरात आले नाही, असे जिजाबाई पुरी, पुष्पा भारसाकळे म्हणाल्या.या भागात दोन हापशा आणि दोन विहिरी आहेत. या विहिरींची पाणीपातळी खोल गेली आहे. यामुळे या भागातील पाण्याची निर्भरता पूर्णत: टँकरवर आहे. टँकरचे पाणी पिण्यास योग्य नाही. यामुळे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. एका ड्रमसाठी १०० रूपये मोजावे लागतात, असे उषा मेश्राम, शांता पाल म्हणाल्या.नळाचे कनेक्शन घेण्यासाठी ७ ते १० हजारांपर्यंत खर्च आला. मात्र या ठिकाणावरून गेलेल्या पाईपलाईनला नगरातील पाईपलाईनचे आजपर्यंत कनेक्शनच जोडले नाही. यामुळे या प्राधिकरणाचे पाणी अद्याप पोहोचले नाही. लोहारा विभागाचे नळ आहे. मात्र या नळाचे कुठलेही वेळापत्रक नाही. रात्री अपरात्री पाणी सोडले जाते. किमान वेळापत्रक तरी सुधारावे, असे वंदना जगताप म्हणाल्या.आमच्या भागात पाण्याचा थेंब नाही. मात्र काही भागात सलग तीन दिवस नळ राहतात. त्याचा काय उपयोग? आम्हाला वाळीत टाकले काय? असा प्रश्नही या भागातील महिलांनी उपस्थित केला.पाहुण्यांना थांबवलेयवतमाळ शहरातील पाणीटंचाई सगळ्यांनाच माहीत आहे. यामुळे यावर्षी आम्ही येणाऱ्या नातेवाईकांना न येण्याच्याच सूचना केल्या. मिळालेले पाणी काटकसरीने वापरावे लागत असल्याचे मतही अनेकांनी नोंदविले.यवतमाळचे पाणी संसदेतयवतमाळच्या पाण्याचा विषय लोकसभा आणि विधानसभेपर्यंत गेला. पण या भागात अजूनपर्यंत पाणी आले नाही. यानंतरही प्रशासनाच्या कामाची गती ढिम्म आहे, असे म्हणत नागरिकांनी चिंता व्यक्त केली.दिवस बदलतील, असे वाटत नाहीपाणीटंचाईचा प्रश्न दरवर्षी असतो. यानंतरही आमच्या भागात पाण्याच्या ठोस उपाययोजना होत नाही. आमचे दिवस अजूनही बदलणार किंवा नाही, हे माहीत नाही. मात्र दूषित पाण्याने आमच्या भागात बिमाºया येण्याचा धोका असल्याचे मत नागरिकांनी नोंदविले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई