शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

मुलांच्या अ‍ॅडमिशनऐवजी घेतले नळ कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 22:34 IST

लोहारा विभागातील पंचशीलनगर दलित वस्तीत पाण्याची भीषण टंचाई आहे. वर्षभरच या भागात पाण्यासाठी संघर्षाची स्थिती असते. उन्हाळ्यात या संकटाची भीषणता आणखीच वाढली आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकांना पावसाळ्यात नळाचे नवीन कनेक्शन देण्यात आले.

ठळक मुद्देनळाला थेंबभर पाणी नाहीकेवळ आश्वासनांचाच भडीमारटँकरमधून मिळते अशुद्ध पाणीदहा दिवसानंतर टँकरची फेरी

रुपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोहारा विभागातील पंचशीलनगर दलित वस्तीत पाण्याची भीषण टंचाई आहे. वर्षभरच या भागात पाण्यासाठी संघर्षाची स्थिती असते. उन्हाळ्यात या संकटाची भीषणता आणखीच वाढली आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकांना पावसाळ्यात नळाचे नवीन कनेक्शन देण्यात आले. त्याकरिता मोठी रक्कम मोजावी लागली. येथील लोकांनी मुलांची अ‍ॅडमिशन न करता नळाचे कनेक्शन घेतले. पण त्या नळाला थेंबभरही पाणी आले नाही.पंचशीलनगरात पाण्याच्या व्यवस्थेकडे नगरपरिषदेचे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. टँकरची व्यवस्था झाली पण हे टँकर नऊ ते १० दिवसांनी येत आहे. मिळालेल्या टँकरमधून ड्रमभर पाणी येते. हे पाणी शेवाळलेले वास असलेले आहे. पण टंचाईकाळात नाईलाजाने ते भरून ठेवावे लागत आहे. या वसाहतीपासून जवळच औद्योगिक वसाहतीमधील गोखी पॉर्इंटचे पाणी आहे. हे पाणी शुद्ध आहे. त्या ठिकाणी दररोज टँकर जातात. मात्र आजपर्यंत हे शुद्ध पाणी पंचशीलनगरात आले नाही, असे जिजाबाई पुरी, पुष्पा भारसाकळे म्हणाल्या.या भागात दोन हापशा आणि दोन विहिरी आहेत. या विहिरींची पाणीपातळी खोल गेली आहे. यामुळे या भागातील पाण्याची निर्भरता पूर्णत: टँकरवर आहे. टँकरचे पाणी पिण्यास योग्य नाही. यामुळे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. एका ड्रमसाठी १०० रूपये मोजावे लागतात, असे उषा मेश्राम, शांता पाल म्हणाल्या.नळाचे कनेक्शन घेण्यासाठी ७ ते १० हजारांपर्यंत खर्च आला. मात्र या ठिकाणावरून गेलेल्या पाईपलाईनला नगरातील पाईपलाईनचे आजपर्यंत कनेक्शनच जोडले नाही. यामुळे या प्राधिकरणाचे पाणी अद्याप पोहोचले नाही. लोहारा विभागाचे नळ आहे. मात्र या नळाचे कुठलेही वेळापत्रक नाही. रात्री अपरात्री पाणी सोडले जाते. किमान वेळापत्रक तरी सुधारावे, असे वंदना जगताप म्हणाल्या.आमच्या भागात पाण्याचा थेंब नाही. मात्र काही भागात सलग तीन दिवस नळ राहतात. त्याचा काय उपयोग? आम्हाला वाळीत टाकले काय? असा प्रश्नही या भागातील महिलांनी उपस्थित केला.पाहुण्यांना थांबवलेयवतमाळ शहरातील पाणीटंचाई सगळ्यांनाच माहीत आहे. यामुळे यावर्षी आम्ही येणाऱ्या नातेवाईकांना न येण्याच्याच सूचना केल्या. मिळालेले पाणी काटकसरीने वापरावे लागत असल्याचे मतही अनेकांनी नोंदविले.यवतमाळचे पाणी संसदेतयवतमाळच्या पाण्याचा विषय लोकसभा आणि विधानसभेपर्यंत गेला. पण या भागात अजूनपर्यंत पाणी आले नाही. यानंतरही प्रशासनाच्या कामाची गती ढिम्म आहे, असे म्हणत नागरिकांनी चिंता व्यक्त केली.दिवस बदलतील, असे वाटत नाहीपाणीटंचाईचा प्रश्न दरवर्षी असतो. यानंतरही आमच्या भागात पाण्याच्या ठोस उपाययोजना होत नाही. आमचे दिवस अजूनही बदलणार किंवा नाही, हे माहीत नाही. मात्र दूषित पाण्याने आमच्या भागात बिमाºया येण्याचा धोका असल्याचे मत नागरिकांनी नोंदविले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई