शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पांढरीत टंचाईचा बळी गावकऱ्यांचा रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 9:54 PM

अपुऱ्या पावसाने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असताना यवतमाळ तालुक्यातील पांढरी येथील एका तरुणाचा पाणी आणण्यासाठी गेला असता विहिरीत पडून बळी गेला.

ठळक मुद्देतरुण विहिरीत पडला : तब्बल चार तास वाहतूक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कअकोलाबाजार : अपुऱ्या पावसाने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असताना यवतमाळ तालुक्यातील पांढरी येथील एका तरुणाचा पाणी आणण्यासाठी गेला असता विहिरीत पडून बळी गेला. या प्रकाराने संतप्त झालेल्या गावकºयांनी यवतमाळ-अकोलाबाजार मार्गावर तब्बल चार तास रस्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला. पांढरीत असलेली नळ योजना अपूर्ण असल्याने गावकºयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.विलास राजेराम राठोड (३८) रा. पांढरी असे मृत तरुणाचे नाव आहे. गावात पाणीटंचाई असल्याने तो पत्नी रुपालीसह रविवारी सकाळी एक किलोमीटर अंतरावरील शेतातील विहिरीवर गेला. या विहिरीवरून पाण्याची एक खेप घेऊन रुपाली घराकडे गेली. इकडे विलासचा पाणी काढताना तोल गेला आणि तो विहिरीत पडला. डोक्याला मार लागल्याने त्याचा विहिरीतच मृत्यू झाला. शेतकरी नामदेव राठोड यांच्या शेतातील या ३५ फूट खोल विहिरीत फक्त तीन फूटच पाणी होते. पत्नी घरुन विहिरीवर आली असता तिला पती दिसला नाही. विहिरीत डोकावून बघितले असता तो पाण्यात पडलेला दिसला. तिने आरडाओरडा केली असता गावकरी धावून आले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. विलासकडे तीन एकर जमीन असून त्याच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई असा परिवार आहे.चार वर्षातील पाणीटंचाईचा पांढरी येथील हा दुसरा बळी होय. चार वर्षापूर्वी लग्नाला दीड महिना झालेल्या लक्ष्मी दिनकर उगले या विवाहितेचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला होता.पाणीटंचाईमुळे गावात अशा घटना घडत असल्याने गावकरी संतप्त झाले. विलासच्या मृत्यूने संतप्त झालेल्या गावकºयांनी यवतमाळ-अकोलाबाजार मार्गावर सकाळी १०.३० वाजता रस्ता रोको सुरू केला. रस्त्यावर झाडाच्या फांद्या टाकून टायर पेटविले. यावेळी गावकºयांनी प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला. दोनही बाजूची वाहतूक खोळंबली होती. या घटनेची माहिती मिळताच नरेंद्र मोदी विकास मंचचे संजय शिंदे पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष धनराज चव्हाण, तहसीलदार सचिन शेजाळ, गटविकास अधिकारी राठोड यांनी भेट देऊन नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.विलासच्या कुटुंबियांना मदतीचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी २.३० वाजता गावकºयांनी आंदोलन मागे घेतले. यवतमाळ ग्रामीण व वडगाव जंगलच्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.पालकमंत्र्यांचा अडविला होता ताफाशनिवारी दुपारी १ वाजता पालकमंत्री मदन येरावार कोळंबी येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी पांढरी येथील नागरिकांनी येरावार यांचा ताफा अडवून पाण्याची समस्या सांगितली. ना. येरावार यांनी नागरिकांच्या भावनेचा सन्मान करीत लगेच एका तासानंतर दुपारी २ वाजता घोडखिंडी येथील तलावातून पाईपलाईनद्वारे गावालगतच्या विहिरीत पाणी सोडले. त्या विहिरीतील गावकºयांनी पाणी भरले. विहिरीत पाणी सोडल्यामुळे नागरिकांची एकच गर्दी झाली होती.दहा वर्षांपासून भीषण पाणीटंचाईयवतमाळ तालुक्यातील पांढरी येथे गत दहा वर्षांपासून नागरिक पाणीटंचाईचा सामना करीत आहे. आठ वर्षापूर्वी येथे ३२ लाख रुपयांची नळ योजना मंजूर झाली होती. कामालाही सुरुवात करण्यात आली. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाने ही योजना अर्धवट आहे. नळ योजनेच्या विहिरीलाच मुळात पाणी कमी आहे. ही विहीर चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

टॅग्स :Waterपाणी