शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

गौळ-आसोली नळयोजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 22:25 IST

तालुक्यातील गौळ आसोली पाणीपुरवठा योजना प्रशासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे अनेक वर्षांपासून बंद पडली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई : दहा गावातील नागरिकांची भटकंती, प्रशासनाचे दुर्लक्ष

अखिलेश अग्रवाल ।ऑनलाईन लोकमतपुसद : तालुक्यातील गौळ आसोली पाणीपुरवठा योजना प्रशासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे अनेक वर्षांपासून बंद पडली आहे. परिणामी यंदाच्या भीषण पाणीटंचाई काळात दहा गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येत्या १५ दिवसात पाणीपुरवठा सुरू केला नाही तर आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.पुसद तालुक्यातील गौळ आसोली येथे पाच कोटी ६२ लाख रुपये खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले होते. याचा फायदा हर्षी, गौळ, आसोली, दहीवड, पाळूवाडी, वेणी, खडकदरी, लोणदरी, शिवाजीनगर, शिळोणा या गावातील नागरिकांना होत होता. ही योजना जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीची आहे. योजना नियमित सुरू ठेवण्यासाठी वार्षिक खर्च ४५ लाखांपेक्षा अधिक आहे. तेव्हा ही योजना सुरू करण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणा घेत नसल्याने अनेक वर्षांपासून दहा गावची पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. ही योजना पुनश्च सुरू करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता एस.एम. दारव्हेकर यांनी आमदार व खासदारांशी चर्चा केली. पाणीटंचाईची माहिती दिली. परंतु लोकप्रतिनिधींची अनास्था दिसून आली. त्यामुळे या दहा गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.मार्च महिन्यात पारा ३८ अंशांपेक्षा अधिक झाला आहे. पहाटे ५ वाजल्यापासून नागरिकांना पाण्याच्या शोधार्थ भटकावे लागते. घरी पाणी आणण्यासाठी नागरिक भल्या पहाटेच घराबाहेर पडतात. त्यामुळे मोलमजुरी बुडत आहे. पुसद तालुक्यावर दुष्काळाचे सावट असून फेब्रुवारी महिन्यापासूनच पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाणी उपलब्ध नाही.या प्रकल्पाला दहा गावे जोडली आहे. आसोली गावात गोपाळकृष्ण गोशाळा आहे. या गोशाळेत १५० जनावरे असून त्यांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे, अशी माहिती गोशाळेचे संचालक अनिल पांडे यांनी दिली. एक दिवसाआड जनावरांसाठी पाण्यावर ७०० रुपये खर्च करावे लागत आहे.२३ हजार नागरिक तहानलेलेगौळ-आसोली पाणीपुरवठा योजनेंतर्गत दहा गावांची लोकसंख्या २३ हजार आहे. ही योजना बंद असल्याने पिण्यासाठी पाणी मिळत नाही. जनावरांनाही भटकंती करावी लागते. पाण्यासाठी जनता व्याकुळ झाली असून १५ दिवसांत पाणीपुरवठा झाला नाही तर रस्ता रोको आंदोलनाचा इशारा अनिल दत्तराव पांडे यांनी दिला आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

टॅग्स :Waterपाणी