शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

गौळ-आसोली नळयोजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 22:25 IST

तालुक्यातील गौळ आसोली पाणीपुरवठा योजना प्रशासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे अनेक वर्षांपासून बंद पडली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई : दहा गावातील नागरिकांची भटकंती, प्रशासनाचे दुर्लक्ष

अखिलेश अग्रवाल ।ऑनलाईन लोकमतपुसद : तालुक्यातील गौळ आसोली पाणीपुरवठा योजना प्रशासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे अनेक वर्षांपासून बंद पडली आहे. परिणामी यंदाच्या भीषण पाणीटंचाई काळात दहा गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येत्या १५ दिवसात पाणीपुरवठा सुरू केला नाही तर आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.पुसद तालुक्यातील गौळ आसोली येथे पाच कोटी ६२ लाख रुपये खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले होते. याचा फायदा हर्षी, गौळ, आसोली, दहीवड, पाळूवाडी, वेणी, खडकदरी, लोणदरी, शिवाजीनगर, शिळोणा या गावातील नागरिकांना होत होता. ही योजना जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीची आहे. योजना नियमित सुरू ठेवण्यासाठी वार्षिक खर्च ४५ लाखांपेक्षा अधिक आहे. तेव्हा ही योजना सुरू करण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणा घेत नसल्याने अनेक वर्षांपासून दहा गावची पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. ही योजना पुनश्च सुरू करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता एस.एम. दारव्हेकर यांनी आमदार व खासदारांशी चर्चा केली. पाणीटंचाईची माहिती दिली. परंतु लोकप्रतिनिधींची अनास्था दिसून आली. त्यामुळे या दहा गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.मार्च महिन्यात पारा ३८ अंशांपेक्षा अधिक झाला आहे. पहाटे ५ वाजल्यापासून नागरिकांना पाण्याच्या शोधार्थ भटकावे लागते. घरी पाणी आणण्यासाठी नागरिक भल्या पहाटेच घराबाहेर पडतात. त्यामुळे मोलमजुरी बुडत आहे. पुसद तालुक्यावर दुष्काळाचे सावट असून फेब्रुवारी महिन्यापासूनच पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाणी उपलब्ध नाही.या प्रकल्पाला दहा गावे जोडली आहे. आसोली गावात गोपाळकृष्ण गोशाळा आहे. या गोशाळेत १५० जनावरे असून त्यांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे, अशी माहिती गोशाळेचे संचालक अनिल पांडे यांनी दिली. एक दिवसाआड जनावरांसाठी पाण्यावर ७०० रुपये खर्च करावे लागत आहे.२३ हजार नागरिक तहानलेलेगौळ-आसोली पाणीपुरवठा योजनेंतर्गत दहा गावांची लोकसंख्या २३ हजार आहे. ही योजना बंद असल्याने पिण्यासाठी पाणी मिळत नाही. जनावरांनाही भटकंती करावी लागते. पाण्यासाठी जनता व्याकुळ झाली असून १५ दिवसांत पाणीपुरवठा झाला नाही तर रस्ता रोको आंदोलनाचा इशारा अनिल दत्तराव पांडे यांनी दिला आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

टॅग्स :Waterपाणी