शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

गौळ-आसोली नळयोजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 22:25 IST

तालुक्यातील गौळ आसोली पाणीपुरवठा योजना प्रशासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे अनेक वर्षांपासून बंद पडली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई : दहा गावातील नागरिकांची भटकंती, प्रशासनाचे दुर्लक्ष

अखिलेश अग्रवाल ।ऑनलाईन लोकमतपुसद : तालुक्यातील गौळ आसोली पाणीपुरवठा योजना प्रशासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे अनेक वर्षांपासून बंद पडली आहे. परिणामी यंदाच्या भीषण पाणीटंचाई काळात दहा गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येत्या १५ दिवसात पाणीपुरवठा सुरू केला नाही तर आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.पुसद तालुक्यातील गौळ आसोली येथे पाच कोटी ६२ लाख रुपये खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले होते. याचा फायदा हर्षी, गौळ, आसोली, दहीवड, पाळूवाडी, वेणी, खडकदरी, लोणदरी, शिवाजीनगर, शिळोणा या गावातील नागरिकांना होत होता. ही योजना जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीची आहे. योजना नियमित सुरू ठेवण्यासाठी वार्षिक खर्च ४५ लाखांपेक्षा अधिक आहे. तेव्हा ही योजना सुरू करण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणा घेत नसल्याने अनेक वर्षांपासून दहा गावची पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. ही योजना पुनश्च सुरू करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता एस.एम. दारव्हेकर यांनी आमदार व खासदारांशी चर्चा केली. पाणीटंचाईची माहिती दिली. परंतु लोकप्रतिनिधींची अनास्था दिसून आली. त्यामुळे या दहा गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.मार्च महिन्यात पारा ३८ अंशांपेक्षा अधिक झाला आहे. पहाटे ५ वाजल्यापासून नागरिकांना पाण्याच्या शोधार्थ भटकावे लागते. घरी पाणी आणण्यासाठी नागरिक भल्या पहाटेच घराबाहेर पडतात. त्यामुळे मोलमजुरी बुडत आहे. पुसद तालुक्यावर दुष्काळाचे सावट असून फेब्रुवारी महिन्यापासूनच पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाणी उपलब्ध नाही.या प्रकल्पाला दहा गावे जोडली आहे. आसोली गावात गोपाळकृष्ण गोशाळा आहे. या गोशाळेत १५० जनावरे असून त्यांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे, अशी माहिती गोशाळेचे संचालक अनिल पांडे यांनी दिली. एक दिवसाआड जनावरांसाठी पाण्यावर ७०० रुपये खर्च करावे लागत आहे.२३ हजार नागरिक तहानलेलेगौळ-आसोली पाणीपुरवठा योजनेंतर्गत दहा गावांची लोकसंख्या २३ हजार आहे. ही योजना बंद असल्याने पिण्यासाठी पाणी मिळत नाही. जनावरांनाही भटकंती करावी लागते. पाण्यासाठी जनता व्याकुळ झाली असून १५ दिवसांत पाणीपुरवठा झाला नाही तर रस्ता रोको आंदोलनाचा इशारा अनिल दत्तराव पांडे यांनी दिला आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

टॅग्स :Waterपाणी