शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
3
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
4
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
5
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
6
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
7
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
8
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
9
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
10
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
11
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
12
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
13
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
14
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
15
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
16
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
17
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
18
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
19
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
20
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...

गौळ-आसोली नळयोजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 22:25 IST

तालुक्यातील गौळ आसोली पाणीपुरवठा योजना प्रशासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे अनेक वर्षांपासून बंद पडली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई : दहा गावातील नागरिकांची भटकंती, प्रशासनाचे दुर्लक्ष

अखिलेश अग्रवाल ।ऑनलाईन लोकमतपुसद : तालुक्यातील गौळ आसोली पाणीपुरवठा योजना प्रशासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे अनेक वर्षांपासून बंद पडली आहे. परिणामी यंदाच्या भीषण पाणीटंचाई काळात दहा गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येत्या १५ दिवसात पाणीपुरवठा सुरू केला नाही तर आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.पुसद तालुक्यातील गौळ आसोली येथे पाच कोटी ६२ लाख रुपये खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले होते. याचा फायदा हर्षी, गौळ, आसोली, दहीवड, पाळूवाडी, वेणी, खडकदरी, लोणदरी, शिवाजीनगर, शिळोणा या गावातील नागरिकांना होत होता. ही योजना जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीची आहे. योजना नियमित सुरू ठेवण्यासाठी वार्षिक खर्च ४५ लाखांपेक्षा अधिक आहे. तेव्हा ही योजना सुरू करण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणा घेत नसल्याने अनेक वर्षांपासून दहा गावची पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. ही योजना पुनश्च सुरू करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता एस.एम. दारव्हेकर यांनी आमदार व खासदारांशी चर्चा केली. पाणीटंचाईची माहिती दिली. परंतु लोकप्रतिनिधींची अनास्था दिसून आली. त्यामुळे या दहा गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.मार्च महिन्यात पारा ३८ अंशांपेक्षा अधिक झाला आहे. पहाटे ५ वाजल्यापासून नागरिकांना पाण्याच्या शोधार्थ भटकावे लागते. घरी पाणी आणण्यासाठी नागरिक भल्या पहाटेच घराबाहेर पडतात. त्यामुळे मोलमजुरी बुडत आहे. पुसद तालुक्यावर दुष्काळाचे सावट असून फेब्रुवारी महिन्यापासूनच पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाणी उपलब्ध नाही.या प्रकल्पाला दहा गावे जोडली आहे. आसोली गावात गोपाळकृष्ण गोशाळा आहे. या गोशाळेत १५० जनावरे असून त्यांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे, अशी माहिती गोशाळेचे संचालक अनिल पांडे यांनी दिली. एक दिवसाआड जनावरांसाठी पाण्यावर ७०० रुपये खर्च करावे लागत आहे.२३ हजार नागरिक तहानलेलेगौळ-आसोली पाणीपुरवठा योजनेंतर्गत दहा गावांची लोकसंख्या २३ हजार आहे. ही योजना बंद असल्याने पिण्यासाठी पाणी मिळत नाही. जनावरांनाही भटकंती करावी लागते. पाण्यासाठी जनता व्याकुळ झाली असून १५ दिवसांत पाणीपुरवठा झाला नाही तर रस्ता रोको आंदोलनाचा इशारा अनिल दत्तराव पांडे यांनी दिला आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

टॅग्स :Waterपाणी