शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

आदेशाची वाट न पाहता हंगामी वसतिगृहाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:45 PM

आईवडील मजुरीसाठी परगावात गेले. पण छोट्या-छोट्या लेकरांची शाळा असल्याने ते गावातच थांबले. या मुलांच्या जेवणाचे, राहण्याचे वांदे आहेत. त्यांच्यासाठी शासनाने हंगामी वसतिगृहांसाठी निधी मंजूर केल्यावरही शिक्षण विभागाला जिल्ह्यात अद्याप एकही वसतिगृह सुरू करता आलेले नाही.

ठळक मुद्देशिक्षकांचे धाडस : निधी मंजूर, तरीही प्रशासनाला मात्र प्रस्तावांचीच प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आईवडील मजुरीसाठी परगावात गेले. पण छोट्या-छोट्या लेकरांची शाळा असल्याने ते गावातच थांबले. या मुलांच्या जेवणाचे, राहण्याचे वांदे आहेत. त्यांच्यासाठी शासनाने हंगामी वसतिगृहांसाठी निधी मंजूर केल्यावरही शिक्षण विभागाला जिल्ह्यात अद्याप एकही वसतिगृह सुरू करता आलेले नाही. मात्र, पोरांची आबाळ लक्षात घेऊन काही शिक्षकांनी आदेशाची वाट न पाहता वसतिगृह सुरू करून प्रशासनाच्या लेटलतिफ कारभारला चपराक दिली आहे.पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महागाव तालुक्यातील मजुरांनी दिवाळीपूर्वीच परगावात, पर जिल्ह्यात रोजगारासाठी स्थलांतर केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या रोडावण्याची शक्यता लक्षात घेता, शिक्षकांनी अशा मजुरांची मनधरणी करून त्यांच्या मुलांना गावातच थांबविले. नियमानुसार, एक नोव्हेंबरपासूनच या मुलांसाठी शाळांमध्ये हंगामी वसतिगृह सुरू होण्याची गरज होती. मात्र शिक्षण विभागाच्या उच्च पदस्थांनी मंजुरीलाच महिनाभराचा विलंब लावला. त्यानंतर निधी मंजूर झाला. मात्र जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने आता शाळांकडून वसतिगृह सुरू करण्याचे प्रस्ताव मागविले आहेत. हे प्रस्ताव आल्यावर, त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंजुरीची मोहोर उमटवल्यावर वसतिगृह सुरू होणार आहेत.पण तोपर्यंत या मुलांचे काय करायचे, हा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. हीच स्थिती भंडारी (ता. पुसद) या दुर्गम गावातील शिक्षकांपुढे निर्माण झाला. शाळेत आल्यावर स्थालांतरित मजुरांच्या पोरांनी वसतिगृहाविषयी विचारणा केली. त्यावेळी शिक्षकांकडे कोणतेही उत्तर नव्हते. अखेर या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक गणेश चव्हाण यांनी सर्वांना विश्वासात घेऊन लगेच आपल्या शाळेत हंगामी वसतिगृह सुरू केले. गेल्या सोमवारपासून आता या मुलांना जेवण दिले जात आहे. प्रशासनाचा आदेश आल्यावर अधिकृत वसतिगृह सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.भंडारीचे भागले, इतरांचे काय?भंडारीच्या जिल्हा परिषद शाळेने प्रशासनाची वाट न पाहता हंगामी वसतिगृह सुरू करून टाकले. त्यामुळे तेथील स्थालांतरित मजुरांच्या मुलांची सोय झाली आहे. परंतु, या शाळेप्रमाणेच पुसद, महागाव, उमरखेड आणि दिग्रस तालुक्यातील साधारण ५० शाळांपुढे ही समस्या कायम आहे. त्यांना शिक्षण विभाग वसतिगृह सुरू करण्याचा आदेश कधी देणार, हा प्रश्न आहे.