शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

मृत शेतकऱ्याच्या घरात प्रशासनाचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:21 IST

शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर तालुक्यातील सावळेश्वर गाव प्रचंड अस्वस्थ आहे. प्रशासन मात्र ही शेतकरी आत्महत्या नसून अपघातच आहे, हे दाखविण्यासाठी मरणदारी तळ ठोकून बसले आहे.

ठळक मुद्देकाहीही बोलू नका : आत्महत्येला अपघात दाखविण्याचा प्रयत्न, गाव मात्र अस्वस्थ

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर तालुक्यातील सावळेश्वर गाव प्रचंड अस्वस्थ आहे. प्रशासन मात्र ही शेतकरी आत्महत्या नसून अपघातच आहे, हे दाखविण्यासाठी मरणदारी तळ ठोकून बसले आहे. मृताच्या वारसांनी कोणाशीही काहीही बोलू नये, यासाठी प्रचंड दबाव आणला जात असल्याची गंभीर बाब ‘लोकमत’ चमूच्या प्रत्यक्ष पाहणीत निदर्शनास आली.सावळेश्वर गावात १४ एप्रिल रोजी माधवराव रावते या वृद्ध शेतकऱ्याने शेतात सरण रचून आत्महत्या केली. मात्र सावळेश्वर हे मुख्यमंत्र्यांचे दत्तक गाव असल्याने स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी ही शेतकरी आत्महत्या नव्हेच, असा कांगावा सुरू केला. माधवरावांच्या मृत्यूनंतर तब्बल दोन दिवसांनी ही बाबपुढे आली. १६ एप्रिल रोजी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार व कार्यकर्त्यांनी या गावात धडक दिल्यावर जळून खाक झालेल्या माधवरांच्या कलेवराला वाचा फुटली. मात्र १७ एप्रिलला उपविभागीय अधिकाऱ्यांनी पत्रपरिषद घेऊन या शेतकऱ्याचे कर्ज माफ झाल्याचे सांगितले. प्रत्यक्ष गावकऱ्यांचे म्हणणे वेगळे आहे. ते म्हणाले. आमच्या गावात २५० शेतकरी कर्जमाफीत बसतात. पण एकालाही शासनाने आतापर्यंत कर्ज माफ झाल्याचे प्रमाणपत्र दिले नाही. माधवराव गेल्यानंतर त्यांचे कर्ज माफ झाल्याचे सांगून काय फायदा?‘लोकमत’ चमू माधवराव रावते यांच्या घरी पोहोचली, तेव्हा त्यांच्या घरात तलाठी, पोलीस पाटील, मुख्यमंत्री दूत यांनी ठिय्या दिलेला होता. माधवरावचा मुलगा गंगाधर काही बोलू इच्छित असला तरी या अनामिक दबावामुळे तो बोलू शकत नव्हता. गावकऱ्यांनी सांगितलेली कहाणी भयंकर आहे. माधवरावचे वावर पूर्णत: मुरमाड जमिनीचे आहे. त्याच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी तर जमिनी कसणे सोडून दिले आहे. पण त्यांना शेतीविना पर्याय नव्हता. कर्जमाफी जाहीर झाली, पण नव्या कर्जाचे काय? बोंडअळीच्या मदतीत त्याचे नाव आले, पण मदत कुठे मिळाली? असे अनेक प्रश्न गावकºयांनी उपस्थित केले.गावातल्या कार्यकर्त्यावर रोषमाधवराव रावते यांची आत्महत्या झाल्यापासूनच गावातील एक भाजपा कार्यकर्ता सतत ही आत्महत्या नसून अपघातच आहे, असे सर्वांना सांगत आहे. आता गावकरीही त्या कार्यकर्त्याविरुद्ध रोष व्यक्त करू लागले आहे. माधवराव पुंजाणे पेटवताना जळले, तर मग त्यांच्या चपला, काठी, चष्मा कसे बाजूला सलामत राहिले, असा या गावकºयांचा प्रश्न आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या