शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

मृत शेतकऱ्याच्या घरात प्रशासनाचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:21 IST

शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर तालुक्यातील सावळेश्वर गाव प्रचंड अस्वस्थ आहे. प्रशासन मात्र ही शेतकरी आत्महत्या नसून अपघातच आहे, हे दाखविण्यासाठी मरणदारी तळ ठोकून बसले आहे.

ठळक मुद्देकाहीही बोलू नका : आत्महत्येला अपघात दाखविण्याचा प्रयत्न, गाव मात्र अस्वस्थ

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर तालुक्यातील सावळेश्वर गाव प्रचंड अस्वस्थ आहे. प्रशासन मात्र ही शेतकरी आत्महत्या नसून अपघातच आहे, हे दाखविण्यासाठी मरणदारी तळ ठोकून बसले आहे. मृताच्या वारसांनी कोणाशीही काहीही बोलू नये, यासाठी प्रचंड दबाव आणला जात असल्याची गंभीर बाब ‘लोकमत’ चमूच्या प्रत्यक्ष पाहणीत निदर्शनास आली.सावळेश्वर गावात १४ एप्रिल रोजी माधवराव रावते या वृद्ध शेतकऱ्याने शेतात सरण रचून आत्महत्या केली. मात्र सावळेश्वर हे मुख्यमंत्र्यांचे दत्तक गाव असल्याने स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी ही शेतकरी आत्महत्या नव्हेच, असा कांगावा सुरू केला. माधवरावांच्या मृत्यूनंतर तब्बल दोन दिवसांनी ही बाबपुढे आली. १६ एप्रिल रोजी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार व कार्यकर्त्यांनी या गावात धडक दिल्यावर जळून खाक झालेल्या माधवरांच्या कलेवराला वाचा फुटली. मात्र १७ एप्रिलला उपविभागीय अधिकाऱ्यांनी पत्रपरिषद घेऊन या शेतकऱ्याचे कर्ज माफ झाल्याचे सांगितले. प्रत्यक्ष गावकऱ्यांचे म्हणणे वेगळे आहे. ते म्हणाले. आमच्या गावात २५० शेतकरी कर्जमाफीत बसतात. पण एकालाही शासनाने आतापर्यंत कर्ज माफ झाल्याचे प्रमाणपत्र दिले नाही. माधवराव गेल्यानंतर त्यांचे कर्ज माफ झाल्याचे सांगून काय फायदा?‘लोकमत’ चमू माधवराव रावते यांच्या घरी पोहोचली, तेव्हा त्यांच्या घरात तलाठी, पोलीस पाटील, मुख्यमंत्री दूत यांनी ठिय्या दिलेला होता. माधवरावचा मुलगा गंगाधर काही बोलू इच्छित असला तरी या अनामिक दबावामुळे तो बोलू शकत नव्हता. गावकऱ्यांनी सांगितलेली कहाणी भयंकर आहे. माधवरावचे वावर पूर्णत: मुरमाड जमिनीचे आहे. त्याच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी तर जमिनी कसणे सोडून दिले आहे. पण त्यांना शेतीविना पर्याय नव्हता. कर्जमाफी जाहीर झाली, पण नव्या कर्जाचे काय? बोंडअळीच्या मदतीत त्याचे नाव आले, पण मदत कुठे मिळाली? असे अनेक प्रश्न गावकºयांनी उपस्थित केले.गावातल्या कार्यकर्त्यावर रोषमाधवराव रावते यांची आत्महत्या झाल्यापासूनच गावातील एक भाजपा कार्यकर्ता सतत ही आत्महत्या नसून अपघातच आहे, असे सर्वांना सांगत आहे. आता गावकरीही त्या कार्यकर्त्याविरुद्ध रोष व्यक्त करू लागले आहे. माधवराव पुंजाणे पेटवताना जळले, तर मग त्यांच्या चपला, काठी, चष्मा कसे बाजूला सलामत राहिले, असा या गावकºयांचा प्रश्न आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या