शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा

By admin | Updated: July 21, 2014 00:24 IST

सोयाबीन बियाण्याचा तुटवडा आधीच होता. त्यात यंदा पावसाळा लांबल्याने पेरण्या उलटल्या. यातून सोयाबीन बियाण्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नामांकित बियाणे

यवतमाळ : सोयाबीन बियाण्याचा तुटवडा आधीच होता. त्यात यंदा पावसाळा लांबल्याने पेरण्या उलटल्या. यातून सोयाबीन बियाण्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नामांकित बियाणे बाजारात मिळणे अवघड झाले आहे. यावर मात करण्यासाठी शेतकरी पर्यायी पीक घेण्यासाठी धावाधाव करीत आहे. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकरी भरकटले आहेत.जिल्ह्यात ७० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. सहा लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. अनेकांना दुबार व तिबार पेरणीसुद्धा करावी लागली. त्यामध्ये ३ लाख ८२ हजार हेक्टरवर कापूस आहे. तर १ लाख ८० हजार हेक्टरवर सोयाबीन आहे. कपाशीच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र निम्म्यावर आहे. असे असलेतरी यातील दोन लाख हेक्टरवर च्या पेरण्या निघाल्या नाही. त्या ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली. पाऊस लांबल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. मात्र पाऊस येताच शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीचा कालावधी संपल्याने सोयाबीनकडे धाव घेतली. बाजारात एकच गर्दी वाढली. यातून बाजारातील सोयाबीनचे बियाणे संपले. आता नामांकीत कंपन्यांचे बियाणे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे बियाणे मिळविण्यासाठी शेतकरी कृषी केंंद्र पिंजून काढत आहेत.सोयाबीन बियाण्याला पर्यायी पीक म्हणून सूर्यफूल, बाजरीला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र या पिकांना बाजारात योग्य दर नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. सोयाबीन बियाणे मिळविण्यासाठी ते बाजारपेठ पिंजून काढत आहेत. २० मिमी बरसला पाऊसजिल्ह्यात १९ जुलैला सायंकाळ पासून पावसाची रिपरिप सुरू होती. हा पाऊस जिल्हयात सर्वत्र बरसला. २० जुलैला सकाळी ८ पर्यंत २० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक ४२ मिमी पाऊस यवतमाळ आणि नेर तालुक्यात बरसला. तर सर्वात कमी ४ मिमी पावसाची नोंद पुसदमध्ये करण्यात आली.ज्वारीचा कालावधीही संपलाया स्थितीत ज्वारीसारख्या पीक घेण्याकडे शेतकऱ्यांनी सांगण्यात येत असले तरी ज्वारीच्या पेरणीचाही कालावधी संपला असल्याचे पुढे आले आहे. ज्वारीच्या पेरणीतून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तरी निकाली निघेल, असे वाटत असताना कालावधी संपल्यामुळे शेतकरी मात्र सैरभैर झाल्याचे चित्र दिसत आहे. (शहर वार्ताहर)