शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

आयात कर आकारणी विरोधात दक्षिणात्य लॉबीचा दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 11:18 IST

कापूस दर वाढल्यास कापड मिल मालकांना आर्थिक गुंतवणूक वाढवावी लागेल. नफा कमी होईल. यामुळे दक्षिणात्य लॉबीने दर पाडण्यासाठी आयात कर आकरणीचा केंद्राचा निर्णय रोखण्यासाठी दबाव वाढविला आहे.

ठळक मुद्देउधारीवर कापूस गाठींचे सौदेउत्पादकांना बसणार जबर हादरा

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशांतर्गत बाजारपेठेत कापसाचे उत्पादन घटल्याने कापसाचे दर वाढण्याचे संकेत आहेत. कापूस दर वाढल्यास कापड मिल मालकांना आर्थिक गुंतवणूक वाढवावी लागेल. नफा कमी होईल. यामुळे दक्षिणात्य लॉबीने दर पाडण्यासाठी आयात कर आकरणीचा केंद्राचा निर्णय रोखण्यासाठी दबाव वाढविला आहे. सोबतच अन्य देशातून उधारीवर कापूस गाठींचे सौदे बांधले आहेत. यासंदर्भात केंद्र शासनाने कापूस गाठीवर आयातकर आकारून धोरणात्मक निर्णय न घेतल्यास कापूस उत्पादकांना दर घसरणीचा जबर हादरा बसणार आहे.कृषी उत्पादन वाढविण्यात सर्वात मोठा वाटा कापसाचा आहे. देशातील कापूस हे प्रमुख पीक आहेत. सूत आणि कापड व्यवसायात दक्षिणात्य लॉबिचा सर्वाधिक पगडा आहे. नुकत्याच झालेल्या गुजरात निवडणुकीतही कापड मिल मालकांच्या धोरणाचा भाजपाला मोठा फटका बसला. यानंतरही केंद्र शासन दक्षिणात्य लॉबीच्याच बाजूने झुकले आहे.यामुळे या लॉबीला दुखवू नये म्हणून आयात कर आकारणीचा निर्णय सध्या केंद्राने थांबविला आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य दर मिळावे म्हणून धोरणात्मक निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. हा धोरणात्मक निर्णय घेत असतांना कापूस या मुख्य पिकालाच वगळण्यात आले आहेत. यामुळे सरकारच्या निर्णयाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत सोयाबीन, हरभरा आणि डाळवर्गीय इतर पिकांवर आयातकर आकारण्यात आला. यामुळे शेतमालाच्या किमती सुधारल्या. शेतकऱ्यांच्या हातातून शेतमाल गेल्यानंतरच या किमती सुधारल्या. यामुळे या निर्णयाचा फायदा व्यापाऱ्यांनाच झाला.

देशात कापसाचा उठाव मंदावलासध्याच्या वस्त्रोद्योग धोरणात केवळ कापडमिल मालकांचाच विचार झाला आहे. यामुळे विनाशुल्क कापूस गाठी आयात केल्या जात आहे. तर बाहेर देशातून कापूस आयात करताना उधारीवर देशात येत आहे. यातून १७ लाख कापूस गाठीचे सौदे झाले आहे. यामुळे देशांतर्गत बाजारातील कापसाचा उठाव मंदावला आहे. याचा परिणाम कापसाच्या दरावर झाला आहे. गत २० दिवसात कापसाचे दर ४ टक्के कमी झाले आहे.

राज्य कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षांचा ठिय्या आयात होणाऱ्या कापासावर शुल्क लावावे. निर्यातीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा यासाठी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल दिल्लीत ठाण मांडून आहेत. त्यांना कितपत यश मिळते त्यावर कापसाचे गणित अवलंबून राहणार आहे.दक्षिणात्य लॉबीमुळे २०१२ मध्ये शेतकऱ्यांना कापसाचा वाढीव दर मिळविता आला नाही. आता पुन्हा तशीच स्थिती निर्माण करण्यासाठी त्यांची जोरदार फिल्डींग सुरू आहे. केंद्र शासनाने त्यांच्या दबावाला बळी न पडता उत्पादकांच्या बाजूने निर्णय घ्यावा- विजय जावंधिया, शेतकरी अभ्यासक आणि कृषी तज्ज्ञ

टॅग्स :agricultureशेती