दारव्हात सरकारी केंद्रावर कापूस, तूर खरेदी संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST2020-05-10T05:00:00+5:302020-05-10T05:00:23+5:30

तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात ३ हजार १०७ शेतकऱ्यांनी कापूस, तर साडेतीन हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली. परंतु त्यामधील कापसाकरिता दररोज केवळ २०, तर तुरीकरिता केवळ १00 जणांचा क्रमांक लागतो. त्यातही एक लाख क्विंटल कापसाची खरेदी होणार असल्याची चर्चा आहे. जागेअभावी तूर खरेदी काही दिवसांकरिता बंद झाली. त्यामुळे संपूर्ण मालाची खरेदी होईल की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे.

Slow purchase of cotton and tur at the government center in Darwaza | दारव्हात सरकारी केंद्रावर कापूस, तूर खरेदी संथ

दारव्हात सरकारी केंद्रावर कापूस, तूर खरेदी संथ

ठळक मुद्दे६६०७ शेतकऱ्यांनी केली ऑनलाईन नोंदणी, हंगामाचा खर्च भागविण्याची शेतकऱ्यांना लागली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : येथील शासकीय शेतमाल खरेदी केंद्रावर कापूस आणि तुरीची खरेदी अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना विक्रीला आधीच विलंब होत आहे. त्यात बँक खात्यात पैसे जमा व्हायला वेळ लागतो. यामुळे हंगामाचा खर्च कसा भागवावा, याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे.
तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात ३ हजार १०७ शेतकऱ्यांनी कापूस, तर साडेतीन हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली. परंतु त्यामधील कापसाकरिता दररोज केवळ २०, तर तुरीकरिता केवळ १00 जणांचा क्रमांक लागतो. त्यातही एक लाख क्विंटल कापसाची खरेदी होणार असल्याची चर्चा आहे. जागेअभावी तूर खरेदी काही दिवसांकरिता बंद झाली. त्यामुळे संपूर्ण मालाची खरेदी होईल की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. येथे केवळ एकाच सेंटरवर सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात झाली. त्यातही आवक वाढल्याचे कारण पुढे करुन मध्येच खरेदी बंद झाली. ब्रेकनंतर खरेदी सुरु झाली.
तीन ३ हजार १०७ शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केली. आता दररोज केवळ २० कापूस गाड्यांचे मोजमाप होते. परंतु नोंदणी केलेल्यांची संख्या मोठी आहे. हीच गती राहिली तर पाच महिन्यातही खरेदी आटोपणार नाही. नाफेडतर्फे दारव्हा विविध कार्यकारी सोसायटीमार्फत सुरु करण्यात आलेल्या तूर खरेदीचीसुद्धा तीच अवस्था आहे. साडेतीन हजार शेतकऱ्यांनी नोंदणी झाली. एक हजार ८५८ शेतकऱ्यांची नोंदणी ऑनलाईन न होऊ शकल्याने पेंडींग आहे. दररोज चार ते पाच गाड्यांचे मोजमाप होते. सध्या जागेअभावी खरेदी बंद करण्यात आली. याप्रकारे शेतमालाची खरेदी होत असताना इकडे खरीप हंगाम तोंडावर आला. २४ मे पासून रोहिणी नक्षत्राला सुरवात होईल. त्यामुळे आत्तापासूनच शेतकऱ्यांना पेरणीचे वेध लागेल आहे. अशावेळी त्वरित मालाची विक्री होऊन हातात पैसे न पडल्यास शेतीचा खर्च कोठून लावावा, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कापसाच्या दिवसाला किमान १00 गाड्या सोडल्या जाव्या, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अमोल राठोड, वहीद खान, प्रकाश उरकुडे आदींसह शेतकºयांनी केली आहे.

सीमाबंदीचा फटका
संचारबंदीतून शेतमालाच्या खरेदी-विक्रीला सूट देण्यात आली. मात्र बाजार समितीच्या यार्डमध्ये शेतमालाचे लिलाव होत नाही. तसेच चांगली बाजारपेठ नाही. त्यामुळे शेतकरी शेतमाल शेजारच्या कारंजा येथे घेऊन जातात. मात्र सध्या जिल्हा बंदीमुळे शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. तसेच तालुक्यातील अनेक शेतकरी कारंजा येथे राहतात. त्यांची शेती येथे आहे. त्यांना येण्या-जाण्यासाठी अडचण निर्माण झाली. काहींची शेतजमीन मानोरा तालुक्यात येते. त्यांनाही शेतात जाता येत नाही. या शेतकऱ्यांना परवानगी मिळायला हवी, अशी अपेक्षा रामगावचे सुभाष साबु, चोरखोपडीचे माणिकचंद कांकरिया, दारव्हाचे सतीश गावंडे आदींनी व्यक्त केली.

Web Title: Slow purchase of cotton and tur at the government center in Darwaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.