तीन अपघातात सहा जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST2020-09-10T05:00:00+5:302020-09-10T05:00:31+5:30
विरुद्ध दिशेने येणारा ट्रक क्र. एमएच-२७-डीएक्स-१७६५ ने दुचाकीला जबर धडक दिली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. उपस्थितांनी तातडीने त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. हा अपघात दुपारी २ वाजता घडला. यापूर्वी पहाटेच्या सुमारास भाजी घेऊन जात असलेल्या वाहनाला ट्रकने धडक दिली. यातही चालक व वाहक दोघे जखमी झाले. यापूर्वी रात्री दुभाजकावर धडकून दोन युवक जखमी झाले.

तीन अपघातात सहा जण गंभीर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग तयार झाला. तेव्हापासून यवतमाळ शहरातून आर्णीकडे जाणाऱ्या वाहनांची अडचण होत आहे. बुधवारी काही तासाच्या अंतराने वनवासी मारोती चौफुलीवर तीन अपघात घडले. यात सहा जण गंभीर जखमी झाले. चौपदरी रस्त्याची लेन क्रॉस करताना वाहन चालकांची तारांबळ उडते. यातूनच हे अपघात घडत आहे.
सुजित हरिपाल बिसवाल (२०), सुंदराबाई बिसवाल (३०) व विशाल बिसवाल (२०) सर्व रा. तिवसा ता. यवतमाळ हे एमएच-२९-एएक्स-९५०३ क्रमांकाच्या दुचाकीने आर्णीकडे जात होते. विरुद्ध दिशेने येणारा ट्रक क्र. एमएच-२७-डीएक्स-१७६५ ने दुचाकीला जबर धडक दिली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. उपस्थितांनी तातडीने त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. हा अपघात दुपारी २ वाजता घडला. यापूर्वी पहाटेच्या सुमारास भाजी घेऊन जात असलेल्या वाहनाला ट्रकने धडक दिली. यातही चालक व वाहक दोघे जखमी झाले. यापूर्वी रात्री दुभाजकावर धडकून दोन युवक जखमी झाले. एकाच जागेवर सलग अपघाताची मालिका घडली. त्याउपरही रस्ते सुरक्षा विभाग, परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.
विरुद्ध दिशेचा प्रवास ठरतोय जीवघेणा
राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ शहरातील वाहन प्रवेश करताना त्याला काही अंतरापर्यंत विरुद्ध दिशेने जावे लागते. तसेच लेन बदलविण्याच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून बांधकाम कंपनीने दुभाजकाचे दगड ठेवले आहे. यामुळे समोरासमोर वाहन धडकून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. वरील तीनही अपघातात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.