यवतमाळमधील तिहेरी अपघातात सहा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 06:52 IST2018-05-28T06:52:58+5:302018-05-28T06:52:58+5:30
तीन वाहने एकमेकांवर आदळून रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार, तर दोघे जखमी झाल्याची घटना राळेगाव मार्गावरील कात्री गावाजवळ घडली.

यवतमाळमधील तिहेरी अपघातात सहा ठार
कळंब (यवतमाळ) : तीन वाहने एकमेकांवर आदळून रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार, तर दोघे जखमी झाल्याची घटना राळेगाव मार्गावरील कात्री गावाजवळ घडली.
विनोद कवडू वड्डे (३२, रा. सिंगणापूर), मोहन मेश्राम (२८) व गोपाल जुनघरे (३०, रा.वाºहा) हे तिघे या अपघातात जागीच ठार झाले. ते कारमधून प्रवास करत होते. तसेच दुचाकीने जात असलेले सोनाली राजू पाल (२८), राजू पाल (३२), श्रृती श्रीधर खडसे (१०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़