लॉकडाऊनमधील पदोन्नतीने वाढणार शिक्षकांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:00:51+5:30

जिल्हा परिषदेने २०११ पासून केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदांवर पदोन्नतीची प्रक्रिया राबविलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पात्र शिक्षक बढतीपासून वंचित आहे. दरम्यान, केंद्र प्रमुख सभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र वेरुळकर यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर गेल्या आठवड्यात विस्तार अधिकारी पदासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली.

The shortage of teachers will increase with the promotion in lockdown | लॉकडाऊनमधील पदोन्नतीने वाढणार शिक्षकांचा तुटवडा

लॉकडाऊनमधील पदोन्नतीने वाढणार शिक्षकांचा तुटवडा

ठळक मुद्देदुर्गम गावातील शाळांचा प्रश्न : विस्तार अधिकारी यादीतही चुका

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विस्तार अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाने पदोन्नतीचे दार उघडले आहे. त्यामुळे बीएडधारक शिक्षकांना अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बढतीची संधी चालून आली आहे. मात्र दुसरीकडे आधीच तुटवडा असलेल्या सहायक शिक्षकांची तूट काही शेकड्यांवरून हजारांवर जाण्याचीही भीती आहे. त्यामुळे पात्र शिक्षकांना बढती देणे आणि शिक्षकांची रिक्त पदे भरून काढणे हा दुहेरी समतोल साधण्याची कसरत अधिकाऱ्यांना करावी लागेल.
जिल्हा परिषदेने २०११ पासून केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदांवर पदोन्नतीची प्रक्रिया राबविलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पात्र शिक्षक बढतीपासून वंचित आहे. दरम्यान, केंद्र प्रमुख सभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र वेरुळकर यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर गेल्या आठवड्यात विस्तार अधिकारी पदासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. १४७८ शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या यादीत अनेक नावे दोनदा टाकण्यात आली आहे. तर अनेक पात्र शिक्षकांची नावेच गायब आहेत. केंद्र प्रमुख सभेने पुन्हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर शिक्षणाधिकाºयांनी २८ मेपर्यंत पुन्हा आक्षेप मागविले आहेत. तर दुसरीकडे लॉकडाऊन कालावधीत होणाºया या पदोन्नतीमुळे जिल्ह्यात शिक्षकांचा मोठा तुटवडा निर्माण होणार आहे.
जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सदस्य मधुकर काठोळे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून दुर्गम गावांमध्ये शिक्षकच उपलब्ध नाहीत. आता विस्तार अधिकारी म्हणून शिक्षकांची बढती झाल्यास आणखी अनेक शाळा शिक्षकांना मूकणार आहेत. कोरोनामुळे मजूर खेड्यात परतल्याने पटसंख्या वाढणार असून त्यासाठी जादा शिक्षक कसे मिळतील हा प्रश्न आहे.

बदल्या, भरतीसाठी जिल्हा परिषदेवर बंदी
एकीकडे शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बढत्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. तर दुसरीकडे राज्य शासनाने नवीन शिक्षक नियुक्ती, बदल्यांवर निर्बंध घातले आहे. त्यामुळे बढतीमुळे शाळा सोडून तालुका पातळीवर जाणाºया शिक्षकामुळे शाळेतील जागा रिक्त होणार आहे. मात्र शासनाच्या निर्बंधामुळे तेथे नवा शिक्षक देणे किंवा बदलीने दुसरा शिक्षक पाठविणे अशक्य होईल.

Web Title: The shortage of teachers will increase with the promotion in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.