शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

धक्कादायक! यवतमाळ जिल्ह्यात क्वारंटाइन केलेल्या युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 11:29 AM

पुण्यावरून परत आल्यानंतर गावातील शाळेत क्वारंटाइन करण्यात आलेल्या एका २३ वर्षीय युवकाने गावालगतच्या पाझर तलावाजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा गावात शनिवारी सकाळी उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: पुण्यावरून परत आल्यानंतर गावातील शाळेत क्वारंटाइन करण्यात आलेल्या एका २३ वर्षीय युवकाने गावालगतच्या पाझर तलावाजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा गावात शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. रामू विठू आत्राम असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. रामू आत्राम हा हनुमान अय्याजी आत्राम व सुरेश अरूण आत्राम या दोन मित्रासमवेत ११ मे रोजी पुणे येथून गोंबुरांडा येथे परत आला होता. त्यानंतर आरोग्य विभागाने या तिघांनाही बुरांडा येथील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाइन करून ठेवले होते. त्यानंतर कोरोनाच्या भयाने या तिघांना गावातील कुणी भेटतही नव्हते. केवळ घरून त्यांना जेवणाचे डबे पुरविले जात होते. या सर्व प्रकाराने रामू आत्राम याच्या मनावर विपरित परिणाम झाला. नैराश्येतून १३ मे रोजी तो शाळेतून पळून गेला. या प्रकारानंतरही गावातील पोलीस पाटील, सरपंच यांनी साधी दखलही घेतली नाही. दरम्यान शनिवारी सकाळी ८ वाजता गावातील एका गुराख्याला गावालगतच्या पाझर तलावाजवळ रामूचा मृतदेह पळसाच्या एका झाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत रामू आत्राम याच्या मागे आई, दोन लहान भाऊ असा परिवार आहे. तो पुणे जिल्ह्यातील वेळू येथील पेट्रोलच्या टाक्या तयार करणाऱ्या कारखान्यात कामाला होता. वडिल नसल्याने संपूर्ण कुटूंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी त्याच्यावर होती. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSuicideआत्महत्या