शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

विदर्भातील चार जिल्ह्यांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा; ५७ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 1:47 PM

सर्वाधिक १९ टँकर बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातील पाच गावांना पाण्यासाठी टँकरची गरज भासली आहे. तर अमरावती जिल्ह्यात १४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देसात जिल्हे टॅँकरमुक्त

यवतमाळ : मागील पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने विदर्भातील बहुतांश प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असल्याने विदर्भातील ११ पैकी सात जिल्ह्यांत यंदा अद्यापपर्यंत पाण्याचा टँकर लागलेला नाही. परंतु, चार जिल्ह्यांना मात्र टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून, या जिल्ह्यातील ५७ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात उन्हाळा कठीण जातो. तापमानाचा पारा चढा असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक कासावीस झालेले दिसतात. मागील दोन पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झालेला असल्याने मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी मात्र बहुतांश जिल्ह्यात पाण्यासाठी संघर्ष दिसत नाही. त्यामुळेच मे महिन्याच्या मध्यंतरानंतरही अकोला, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांत अद्यापपर्यंत टँकरची गरज भासलेली नाही. मागील वर्षी यातील सहा जिल्ह्यांतील १२ गावांमध्ये दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.

बुलडाणा, यवतमाळमध्ये सर्वाधिक टँकर

१९ मे रोजी विदर्भातील ११ पैकी चार जिल्ह्यांतील ५७ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक १९ टँकर बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातील पाच गावांना पाण्यासाठी टँकरची गरज भासली आहे. तर अमरावती जिल्ह्यात १४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली.

आठवड्यात टँकरची संख्या झाली दुप्पट

मागील आठवड्यात राज्यातील २८१ गावे आणि ७३८ वाड्यांना २७० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र मेमध्ये उन्हाच्या झळा तीव्र होत गेल्या तसा पाण्याचा प्रश्नही जटिल झाला. आठवडाभरातच तहानलेल्या गावांची संख्या साधारण दुपटीवर गेली आहे. १९ मे रोजी राज्यातील ४०२ गावे आणि ९६५ वाड्यांना ३५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा कोकणाला

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ५७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तर पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांना अद्यापपर्यंत टँकरची गरज भासलेली नाही. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३७ गावांना ५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील ५९ गावांमध्ये ६४ टँकर सुरू आहेत. नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत २७ गावांना २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तर कोकणातील पाच जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १४४ गावे आणि ४५७ वाड्यांना टँकरद्वारे पाणी पोहोचविण्यात येत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीVidarbhaविदर्भ