शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील चार जिल्ह्यांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा; ५७ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 13:53 IST

सर्वाधिक १९ टँकर बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातील पाच गावांना पाण्यासाठी टँकरची गरज भासली आहे. तर अमरावती जिल्ह्यात १४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देसात जिल्हे टॅँकरमुक्त

यवतमाळ : मागील पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने विदर्भातील बहुतांश प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असल्याने विदर्भातील ११ पैकी सात जिल्ह्यांत यंदा अद्यापपर्यंत पाण्याचा टँकर लागलेला नाही. परंतु, चार जिल्ह्यांना मात्र टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून, या जिल्ह्यातील ५७ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात उन्हाळा कठीण जातो. तापमानाचा पारा चढा असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक कासावीस झालेले दिसतात. मागील दोन पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झालेला असल्याने मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी मात्र बहुतांश जिल्ह्यात पाण्यासाठी संघर्ष दिसत नाही. त्यामुळेच मे महिन्याच्या मध्यंतरानंतरही अकोला, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांत अद्यापपर्यंत टँकरची गरज भासलेली नाही. मागील वर्षी यातील सहा जिल्ह्यांतील १२ गावांमध्ये दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.

बुलडाणा, यवतमाळमध्ये सर्वाधिक टँकर

१९ मे रोजी विदर्भातील ११ पैकी चार जिल्ह्यांतील ५७ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक १९ टँकर बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातील पाच गावांना पाण्यासाठी टँकरची गरज भासली आहे. तर अमरावती जिल्ह्यात १४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली.

आठवड्यात टँकरची संख्या झाली दुप्पट

मागील आठवड्यात राज्यातील २८१ गावे आणि ७३८ वाड्यांना २७० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र मेमध्ये उन्हाच्या झळा तीव्र होत गेल्या तसा पाण्याचा प्रश्नही जटिल झाला. आठवडाभरातच तहानलेल्या गावांची संख्या साधारण दुपटीवर गेली आहे. १९ मे रोजी राज्यातील ४०२ गावे आणि ९६५ वाड्यांना ३५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा कोकणाला

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ५७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तर पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांना अद्यापपर्यंत टँकरची गरज भासलेली नाही. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३७ गावांना ५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील ५९ गावांमध्ये ६४ टँकर सुरू आहेत. नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत २७ गावांना २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तर कोकणातील पाच जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १४४ गावे आणि ४५७ वाड्यांना टँकरद्वारे पाणी पोहोचविण्यात येत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीVidarbhaविदर्भ