शहरं
Join us  
Trending Stories
1
गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
2
माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
3
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
5
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
6
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
7
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...
8
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
9
दहावीतील गुणांवरून नातेवाईकांनी उडवली होती खिल्ली, आता तरुणाने बँकेचा SMS दाखवला; आकडा पाहून 'बोलती बंद'
10
कोल्हापूरकरांच्या विरोधाची धग अंबानीपर्यंत पोहोचली; वनताराचे पथक नांदणीत येणार
11
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
12
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
13
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
14
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
15
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
16
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
17
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
18
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
19
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
20
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

विदर्भातील चार जिल्ह्यांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा; ५७ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 13:53 IST

सर्वाधिक १९ टँकर बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातील पाच गावांना पाण्यासाठी टँकरची गरज भासली आहे. तर अमरावती जिल्ह्यात १४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देसात जिल्हे टॅँकरमुक्त

यवतमाळ : मागील पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने विदर्भातील बहुतांश प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असल्याने विदर्भातील ११ पैकी सात जिल्ह्यांत यंदा अद्यापपर्यंत पाण्याचा टँकर लागलेला नाही. परंतु, चार जिल्ह्यांना मात्र टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून, या जिल्ह्यातील ५७ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात उन्हाळा कठीण जातो. तापमानाचा पारा चढा असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक कासावीस झालेले दिसतात. मागील दोन पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झालेला असल्याने मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी मात्र बहुतांश जिल्ह्यात पाण्यासाठी संघर्ष दिसत नाही. त्यामुळेच मे महिन्याच्या मध्यंतरानंतरही अकोला, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांत अद्यापपर्यंत टँकरची गरज भासलेली नाही. मागील वर्षी यातील सहा जिल्ह्यांतील १२ गावांमध्ये दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.

बुलडाणा, यवतमाळमध्ये सर्वाधिक टँकर

१९ मे रोजी विदर्भातील ११ पैकी चार जिल्ह्यांतील ५७ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक १९ टँकर बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातील पाच गावांना पाण्यासाठी टँकरची गरज भासली आहे. तर अमरावती जिल्ह्यात १४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली.

आठवड्यात टँकरची संख्या झाली दुप्पट

मागील आठवड्यात राज्यातील २८१ गावे आणि ७३८ वाड्यांना २७० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र मेमध्ये उन्हाच्या झळा तीव्र होत गेल्या तसा पाण्याचा प्रश्नही जटिल झाला. आठवडाभरातच तहानलेल्या गावांची संख्या साधारण दुपटीवर गेली आहे. १९ मे रोजी राज्यातील ४०२ गावे आणि ९६५ वाड्यांना ३५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा कोकणाला

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ५७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तर पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांना अद्यापपर्यंत टँकरची गरज भासलेली नाही. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३७ गावांना ५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील ५९ गावांमध्ये ६४ टँकर सुरू आहेत. नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत २७ गावांना २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तर कोकणातील पाच जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १४४ गावे आणि ४५७ वाड्यांना टँकरद्वारे पाणी पोहोचविण्यात येत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीVidarbhaविदर्भ