शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

विश्वगुरूचे स्वप्न दाखवून देश विक्रीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 22:11 IST

Yawatmal News पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वगुरू करण्याचे स्वप्न दाखवून देशच विक्रीला काढला आहे, संस्थाच राहणार नसतील तर शेवटच्या घटकाच्या हाती काय उरेल, असा प्रश्न कन्हैयाकुमार यांनी केला.

ठळक मुद्देदेश आमचाही, त्याला बर्बाद होऊ देणार नाही

 

यवतमाळ : वंचितांना प्रतिनिधित्व, सामाजिक भागीदारीसाठी आमची लढाई आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वगुरू करण्याचे स्वप्न दाखवून देशच विक्रीला काढला आहे, संस्थाच राहणार नसतील तर शेवटच्या घटकाच्या हाती काय उरेल, असा प्रश्न कन्हैयाकुमार यांनी केला. आम्ही हे होऊ देणार नाही, हा देश आमच्याही हिश्शाचा आहे. त्याला आम्ही बर्बाद करू देणार नाही, देश वाचविण्याची क्षमता केवळ संविधानात आहे, त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी एकत्रित येऊ या, असे आवाहनही त्यांनी केले.

महात्मा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समतापर्व प्रतिष्ठानच्या वतीने समता मैदानावर आयोजित ‘राष्ट्र निर्माते डाॅ. आंबेडकर यांचे संविधान आणि आजची लोकशाही’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. सत्तेत आल्यापासून देशातील ऐतिहासिक संस्था विक्रीला काढल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद केली जात आहे. सार्वजनिक दवाखाने, शासकीय शाळा-महाविद्यालये गुंडाळण्यात येत आहे. या संस्था बंद झाल्या तर कोणाची मुले शिक्षणापासून वंचित राहतील?, कोणत्या घटकाला आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागेल याचा विचार करण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारकडून आज कष्टकऱ्यांना संपविले जात आहे. एअर इंडियाच भारत सरकारकडे नसेल तर हवाई वाहतूक मंत्री काय करणार, शासकीय शाळा, महाविद्यालये उरणार नसतील तर शिक्षण मंत्र्याला काय अर्थ राहील, शासनाची रेल्वेच नसेल तर रेल्वेमंत्री काय कामाचे, देशातील सर्व काही विकून आत्मनिर्भरतेचा धडा पंतप्रधान देत आहेत, सरकारी संस्था खासगी लोकांच्या घशात घालणार असाल तर सरकारी पंतप्रधान तरी कशाला असा परखड सवालही कन्हैयाकुमार यांनी केला.

वन नेशन वन टॅक्स, वन नेशन वन इलेक्शन मग पेट्रोल, डिझेलवर वन टॅक्स का नाही, जीएसटी महत्त्वाची आहे तर इंधनावर जीएसटी का नाही असा प्रश्नांचा भडीमार करीत हे स्वातंत्र्य आम्हाला गिफ्ट म्हणून मिळालेले नाही, यासाठी आमच्या अनेकांनी जीव गमावलेले आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य राखण्याची जबाबदारी ही आपलीच असल्याचे सांगत त्यासाठी संविधान वाचवावे लागेल, त्यासाठी एकजूट महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. प्रारंभी प्रा. डाॅ. प्रवीण इंगोले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोदिनी रामटेके होत्या. अॅड. रामदास राऊत, सत्यवान देठे यांनी कन्हैयाकुमार यांचे स्वागत केले. अॅड. जयसिंह चव्हाण यांनी परिचय, अॅड. इम्रान देशमुख यांनी संचालन तर जयश्री भगत यांनी आभार मानले.

मूळ समस्यांकडून लक्ष हटविण्यासाठी विद्वेष

 मागील ४५ वर्षातील सर्वोच्च स्तरावर बेरोजगारी पोहाेचली आहे. महागाई दरात ३०० पटीने वाढ झाली आहे. दुसरीकडे विविध सरकारी सेवेतील नोकर भरती बंद आहे. पेट्रोल, डिझेलचे दर भरमसाट वाढले आहे. या मूळ समस्यांकडे लक्ष जाऊ नये यासाठी देशात विद्वेषाची पेरणी केली जात असल्याचा आरोपही कन्हैयाकुमार यांनी केला. जे शिक्षक महागाईसारख्या मूलभूत विषयावर बोलतात, त्यांना देशद्रोही ठरविले जात असून देश विकणारेच देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटत असल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमार