शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

विश्वगुरूचे स्वप्न दाखवून देश विक्रीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 22:11 IST

Yawatmal News पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वगुरू करण्याचे स्वप्न दाखवून देशच विक्रीला काढला आहे, संस्थाच राहणार नसतील तर शेवटच्या घटकाच्या हाती काय उरेल, असा प्रश्न कन्हैयाकुमार यांनी केला.

ठळक मुद्देदेश आमचाही, त्याला बर्बाद होऊ देणार नाही

 

यवतमाळ : वंचितांना प्रतिनिधित्व, सामाजिक भागीदारीसाठी आमची लढाई आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वगुरू करण्याचे स्वप्न दाखवून देशच विक्रीला काढला आहे, संस्थाच राहणार नसतील तर शेवटच्या घटकाच्या हाती काय उरेल, असा प्रश्न कन्हैयाकुमार यांनी केला. आम्ही हे होऊ देणार नाही, हा देश आमच्याही हिश्शाचा आहे. त्याला आम्ही बर्बाद करू देणार नाही, देश वाचविण्याची क्षमता केवळ संविधानात आहे, त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी एकत्रित येऊ या, असे आवाहनही त्यांनी केले.

महात्मा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समतापर्व प्रतिष्ठानच्या वतीने समता मैदानावर आयोजित ‘राष्ट्र निर्माते डाॅ. आंबेडकर यांचे संविधान आणि आजची लोकशाही’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. सत्तेत आल्यापासून देशातील ऐतिहासिक संस्था विक्रीला काढल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद केली जात आहे. सार्वजनिक दवाखाने, शासकीय शाळा-महाविद्यालये गुंडाळण्यात येत आहे. या संस्था बंद झाल्या तर कोणाची मुले शिक्षणापासून वंचित राहतील?, कोणत्या घटकाला आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागेल याचा विचार करण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारकडून आज कष्टकऱ्यांना संपविले जात आहे. एअर इंडियाच भारत सरकारकडे नसेल तर हवाई वाहतूक मंत्री काय करणार, शासकीय शाळा, महाविद्यालये उरणार नसतील तर शिक्षण मंत्र्याला काय अर्थ राहील, शासनाची रेल्वेच नसेल तर रेल्वेमंत्री काय कामाचे, देशातील सर्व काही विकून आत्मनिर्भरतेचा धडा पंतप्रधान देत आहेत, सरकारी संस्था खासगी लोकांच्या घशात घालणार असाल तर सरकारी पंतप्रधान तरी कशाला असा परखड सवालही कन्हैयाकुमार यांनी केला.

वन नेशन वन टॅक्स, वन नेशन वन इलेक्शन मग पेट्रोल, डिझेलवर वन टॅक्स का नाही, जीएसटी महत्त्वाची आहे तर इंधनावर जीएसटी का नाही असा प्रश्नांचा भडीमार करीत हे स्वातंत्र्य आम्हाला गिफ्ट म्हणून मिळालेले नाही, यासाठी आमच्या अनेकांनी जीव गमावलेले आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य राखण्याची जबाबदारी ही आपलीच असल्याचे सांगत त्यासाठी संविधान वाचवावे लागेल, त्यासाठी एकजूट महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. प्रारंभी प्रा. डाॅ. प्रवीण इंगोले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोदिनी रामटेके होत्या. अॅड. रामदास राऊत, सत्यवान देठे यांनी कन्हैयाकुमार यांचे स्वागत केले. अॅड. जयसिंह चव्हाण यांनी परिचय, अॅड. इम्रान देशमुख यांनी संचालन तर जयश्री भगत यांनी आभार मानले.

मूळ समस्यांकडून लक्ष हटविण्यासाठी विद्वेष

 मागील ४५ वर्षातील सर्वोच्च स्तरावर बेरोजगारी पोहाेचली आहे. महागाई दरात ३०० पटीने वाढ झाली आहे. दुसरीकडे विविध सरकारी सेवेतील नोकर भरती बंद आहे. पेट्रोल, डिझेलचे दर भरमसाट वाढले आहे. या मूळ समस्यांकडे लक्ष जाऊ नये यासाठी देशात विद्वेषाची पेरणी केली जात असल्याचा आरोपही कन्हैयाकुमार यांनी केला. जे शिक्षक महागाईसारख्या मूलभूत विषयावर बोलतात, त्यांना देशद्रोही ठरविले जात असून देश विकणारेच देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटत असल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमार