शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

एटीएममध्ये सुरक्षा रक्षक होता भरदिवसा झोपलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 21:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हाभरात विविध बँकांचे दोनशे एटीएम आहेत. या एटीएमची जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळात स्थिती तपासली असता धक्कादायक चित्र पुढे आले. मुख्यालयाची ही स्थिती असेल तर तालुका व ग्रामीण भागातील एटीएमची काय अवस्था असेल याचा अंदाज आला. सेंट्रल बँकेच्या मार्इंदे चौकातील एटीएमचा सुरक्षा रक्षक गुरुवारी दुपारी १२.३० वाजता ...

ठळक मुद्देजिल्हा मुख्यालयीच सुरक्षा धोक्यात : ग्रामीणची अवस्था काय ?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हाभरात विविध बँकांचे दोनशे एटीएम आहेत. या एटीएमची जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळात स्थिती तपासली असता धक्कादायक चित्र पुढे आले. मुख्यालयाची ही स्थिती असेल तर तालुका व ग्रामीण भागातील एटीएमची काय अवस्था असेल याचा अंदाज आला. सेंट्रल बँकेच्या मार्इंदे चौकातील एटीएमचा सुरक्षा रक्षक गुरुवारी दुपारी १२.३० वाजता आत झोपलेल्या स्थितीत आढळला. आर्णी रोडवर अभ्यंकर कन्या शाळेच्या गल्लीतील आयडीबीआयच्या एटीएमवर सुरक्षा रक्षक नव्हता, तेथे केरकचराही मोठ्या प्रमाणात आढळला. टांगा चौकातील कॉसमॉस बँकेच्या एटीएमवर तर चक्क खुर्ची ठेवलेली आढळून आली. गार्डचा तेथे पत्ताच नव्हता. दत्त चौकातील एक्सीस बँक, सारस्वत चौकातील एचडीएफसी बँक, दर्डानगरातील आयडीबीआय, बँक आॅफ इंडिया, दारव्हा रोडवरील पंजाब नॅशनल या ठिकाणी सुरक्षा रक्षक दृष्टीस पडला नाही. पीएनबीच्या एटीएममध्ये तर लावलेले योजनांचे फलक कुणी तरी काढून नेले.प्रत्येक एटीएममध्ये दर दोन दिवसांनी १५ ते २० लाखांची रोकड टाकली जाते. त्याची क्षमता ३० लाखांची आहे. पोलिसांकडून सुरक्षेबाबत वारंवार सूचना केल्या जातात. मात्र एटीएमची जबाबदारी खासगी एजंसीकडे आहे, असे सांगून सर्रास बँका हातवर करताना दिसतात. प्रत्येक वेळी सीसीटीव्ही व अलार्मकडे बोट दाखवून बँका स्वत:ची जबाबदारी झटकत असल्याचेही चित्र आहे.दर्डानगर येथील बँक आॅफ इंडियाचे एटीएम तर अक्षरश: शोभेची वस्तू ठरले आहे. तेथून कुणी कॅश काढल्याचे ऐकिवात नाही. तेथे सूचना फलकही लागलेला नसतो. या एटीएमच्या नावाने ग्राहक कायमच शिमगा करताना दिसतो. अनेकदा तर या एटीएममध्ये पावसाळ्यात चक्क जनावरे शिरल्याचीही उदाहरणे आहेत. वारंवार सूचना देऊनही बँकाच आपल्या एटीएमबाबत गंभीर नसल्याचे पाहून पोलीसही त्याकडे दुर्लक्ष करतात.आजच्या घडीला अनेक एटीएम दुर्लक्षित जागी आहेत. तेथे भंडारासारखी घटना घडविणे कठीण नाही. मात्र त्यानंतरही बँका एटीएममधील रोकडच्या सुरक्षेबाबत फारशी काळजी घेत नसल्याचे या पाहणीत आढळून आले.बँकांचा असाही बचावसुरक्षा गार्ड असतात पण ते राहत नाहीत, त्यांच्या तीन शिफ्ट असतात, मात्र पगार वेळेत मिळत नसल्याने ते दिसत नाहीत, बँकेला अटॅच असल्याने गार्डची गरज पडत नाही, असे एटीएम रात्री ८ नंतर बंद केले जातात, एटीएमवर सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्म सिस्टम लागलेली आहे, असा बचाव बँका घेत आहेत. परंतु प्रत्यक्षात सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारणे, अलार्मचे वायर तोडणे या सारखे प्रकार घडत असल्याने सुरक्षेची ही प्रतिबंधात्मक उपाययोजना फेल ठरते.

टॅग्स :atmएटीएम