शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

एटीएममध्ये सुरक्षा रक्षक होता भरदिवसा झोपलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 21:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हाभरात विविध बँकांचे दोनशे एटीएम आहेत. या एटीएमची जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळात स्थिती तपासली असता धक्कादायक चित्र पुढे आले. मुख्यालयाची ही स्थिती असेल तर तालुका व ग्रामीण भागातील एटीएमची काय अवस्था असेल याचा अंदाज आला. सेंट्रल बँकेच्या मार्इंदे चौकातील एटीएमचा सुरक्षा रक्षक गुरुवारी दुपारी १२.३० वाजता ...

ठळक मुद्देजिल्हा मुख्यालयीच सुरक्षा धोक्यात : ग्रामीणची अवस्था काय ?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हाभरात विविध बँकांचे दोनशे एटीएम आहेत. या एटीएमची जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळात स्थिती तपासली असता धक्कादायक चित्र पुढे आले. मुख्यालयाची ही स्थिती असेल तर तालुका व ग्रामीण भागातील एटीएमची काय अवस्था असेल याचा अंदाज आला. सेंट्रल बँकेच्या मार्इंदे चौकातील एटीएमचा सुरक्षा रक्षक गुरुवारी दुपारी १२.३० वाजता आत झोपलेल्या स्थितीत आढळला. आर्णी रोडवर अभ्यंकर कन्या शाळेच्या गल्लीतील आयडीबीआयच्या एटीएमवर सुरक्षा रक्षक नव्हता, तेथे केरकचराही मोठ्या प्रमाणात आढळला. टांगा चौकातील कॉसमॉस बँकेच्या एटीएमवर तर चक्क खुर्ची ठेवलेली आढळून आली. गार्डचा तेथे पत्ताच नव्हता. दत्त चौकातील एक्सीस बँक, सारस्वत चौकातील एचडीएफसी बँक, दर्डानगरातील आयडीबीआय, बँक आॅफ इंडिया, दारव्हा रोडवरील पंजाब नॅशनल या ठिकाणी सुरक्षा रक्षक दृष्टीस पडला नाही. पीएनबीच्या एटीएममध्ये तर लावलेले योजनांचे फलक कुणी तरी काढून नेले.प्रत्येक एटीएममध्ये दर दोन दिवसांनी १५ ते २० लाखांची रोकड टाकली जाते. त्याची क्षमता ३० लाखांची आहे. पोलिसांकडून सुरक्षेबाबत वारंवार सूचना केल्या जातात. मात्र एटीएमची जबाबदारी खासगी एजंसीकडे आहे, असे सांगून सर्रास बँका हातवर करताना दिसतात. प्रत्येक वेळी सीसीटीव्ही व अलार्मकडे बोट दाखवून बँका स्वत:ची जबाबदारी झटकत असल्याचेही चित्र आहे.दर्डानगर येथील बँक आॅफ इंडियाचे एटीएम तर अक्षरश: शोभेची वस्तू ठरले आहे. तेथून कुणी कॅश काढल्याचे ऐकिवात नाही. तेथे सूचना फलकही लागलेला नसतो. या एटीएमच्या नावाने ग्राहक कायमच शिमगा करताना दिसतो. अनेकदा तर या एटीएममध्ये पावसाळ्यात चक्क जनावरे शिरल्याचीही उदाहरणे आहेत. वारंवार सूचना देऊनही बँकाच आपल्या एटीएमबाबत गंभीर नसल्याचे पाहून पोलीसही त्याकडे दुर्लक्ष करतात.आजच्या घडीला अनेक एटीएम दुर्लक्षित जागी आहेत. तेथे भंडारासारखी घटना घडविणे कठीण नाही. मात्र त्यानंतरही बँका एटीएममधील रोकडच्या सुरक्षेबाबत फारशी काळजी घेत नसल्याचे या पाहणीत आढळून आले.बँकांचा असाही बचावसुरक्षा गार्ड असतात पण ते राहत नाहीत, त्यांच्या तीन शिफ्ट असतात, मात्र पगार वेळेत मिळत नसल्याने ते दिसत नाहीत, बँकेला अटॅच असल्याने गार्डची गरज पडत नाही, असे एटीएम रात्री ८ नंतर बंद केले जातात, एटीएमवर सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्म सिस्टम लागलेली आहे, असा बचाव बँका घेत आहेत. परंतु प्रत्यक्षात सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारणे, अलार्मचे वायर तोडणे या सारखे प्रकार घडत असल्याने सुरक्षेची ही प्रतिबंधात्मक उपाययोजना फेल ठरते.

टॅग्स :atmएटीएम