शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

राज्यात दुसरी ते पाचवीचा अभ्यासक्रम बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 14:22 IST

पहिलीचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर आता दुसरी ते पाचवी या वर्गांचा अभ्यासक्रमही नव्या स्वरूपात येणार आहे. यातील दुसरीचा नवा अभ्यासक्रम २०१९-२० या सत्रापासूनच लागू होणार असून त्यापुढील प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम दरवर्षी बदलणार आहे.

ठळक मुद्देबालभारतीची तयारीअभ्यासक्रम पुनर्रचना समितीसाठी १५४ जणांची निवड

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पहिलीचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर आता दुसरी ते पाचवी या वर्गांचा अभ्यासक्रमही नव्या स्वरूपात येणार आहे. यातील दुसरीचा नवा अभ्यासक्रम २०१९-२० या सत्रापासूनच लागू होणार असून त्यापुढील प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम दरवर्षी बदलणार आहे.या संदर्भात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) नवीन अभ्यासक्रमाच्या रचनेसाठी तयारी सुरू केली आहे. दुसरीचा अभ्यासक्रम लगेच बदलविण्याचा निर्णय झाल्याने या संदर्भात अभ्यासक्रम पुनर्रचना व पाठ््यपुस्तक निर्मिती समितीसाठी राज्यातील १५४ जाणकारांची निवडही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी आठवीचा नवा अभ्यासक्रम लागू करताना बालभारतीने निवडक तज्ज्ञांची समिती गठित केली होती. तर पहिलीचा नवा अभ्यासक्रम या समितीने अवघ्या दीड महिन्यात ‘फायनल’ केल्याची माहिती आहे.ही बाब लक्षात घेता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अभ्यासक्रम पुनर्रचना समितीसाठी राज्यभरातून प्रस्ताव मागविण्याची सूचना केली होती. या सूचनेनुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावरील १५४ शिक्षकांना समितीसाठी पाचारण करण्यात आले आहे. आता बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांच्या उपस्थितीत पुणे येथे १ ते ३ आॅगस्टदरम्यान या तज्ज्ञ शिक्षकांची कार्यशाळा होणार असून त्यातूनच दुसरी ते तिसरीच्या नव्या अभ्यासक्रमाचा आराखडा ठरणार आहे.समितीत विदर्भातील ३९ जणबालभारतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील १५४ तज्ज्ञ शिक्षकांनी अभ्यासक्रम पुनर्रचना समितीत सहभाग घेतला. यात विदर्भातील ३९ जणांचा समावेश आहे. यवतमाळातून चार, चंद्रपूर एक, भंडारा एक, अमरावती पाच, बुलडाणा चार, नागपूर नऊ, गडचिरोली एक, अकोला सात, वाशिम एक, वर्धा एक तर गोंदियातून पाच शिक्षक या समितीत आहेत. आता पुण्यातील कार्यशाळेदरम्यान यातील काही जणांची नावे गळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र