शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

उच्च माध्यमिकच्या अनुदान प्रस्तावांची युद्ध पातळीवर छाननी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 19:39 IST

राज्य शासनाने फेब्रुवारीत अनुदान पात्र शाळांच्या यादीतून डावललेल्या शेकडो प्रस्तावांची पुन्हा एकदा युद्धपातळीवर छाननी केली जात आहे. विशेष म्हणजे, यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांनी पुण्याच्या आयुक्तालयापुढे केलेल्या धरणे आंदोलनानंतर या कामास गती आली आहे.

ठळक मुद्देआयुक्त कार्यालयात गती मे महिन्याच्या अखेरीस मंत्रालयात जाण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने फेब्रुवारीत अनुदान पात्र शाळांच्या यादीतून डावललेल्या शेकडो प्रस्तावांची पुन्हा एकदा युद्धपातळीवर छाननी केली जात आहे. विशेष म्हणजे, यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांनी पुण्याच्या आयुक्तालयापुढे केलेल्या धरणे आंदोलनानंतर या कामास गती आली. त्यामुळे गेल्या सतरा वर्षांपासून विनावेतन काम करीत असलेल्या शिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.राज्यात २००१ पासून साधारणत: १३०० कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक विद्यालये विनाअनुदान तत्ववावर सुरू आहेत. त्यात काही वर्षांपूर्वी ‘कायम’ शब्द निघाल्याने अनुदानाच्या आशा जाग्या झाल्या. २०१४ मध्ये मूल्यांकन होऊनही शासनाने या शाळांची अनुदानपात्र यादी घोषित केली नव्हती. त्यासाठी शिक्षकांनी २०० पेक्षा जास्त आंदोलने केल्यावर राज्य शासनाने यंदा २८ फेब्रुवारीला अनुदानपात्र शाळांची यादी जाहीर केली. परंतु, केवळ १२३ शाळांचाच समावेश केला. विशेष म्हणजे, यवतमाळ, नागपूरसारख्या जिल्ह्यातील एकाही उच्च माध्यमिक विद्यालयाचा या यादीत समावेश करण्यात आला नाही.त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. यवतमाळ जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या निर्णयाचा धिक्कारही केला. त्यानंतरही प्रशासन हलले नाही. तेव्हा थेट पुण्यात आयुक्त आणि संचालक कार्यालयापुढे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. १२ दिवस सतत आंदोलन केल्यानंतर आयुक्त कार्यालय जागे झाले. अडलेल्या सर्व प्रस्तावांची पुन्हा एकदा छाननी करण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालकांनी दिले होते. त्यामुळे आंदोलन थांबविण्यात आले.परंतु, केवळ आश्वासनावर विसंबून न राहाता विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या शिक्षकांनी नुकतीच आयुक्त कार्यालयात जाऊन आपल्या प्रस्तावांबाबत जाब विचारला. तेव्हा यवतमाळसह राज्यातील सर्वच प्रस्तावांची युद्धस्तरावर छाननी सुरू असून ते लवकरच मंत्रालयात पाठविण्यात येणार असल्याचे लेखी पत्र शिक्षकांना देण्यात आले. परंतु, एवढ्यवरच न थांबता कृती समितीने आता सहविचार सभा आयोजित केली आहे. यवतमाळच्या अभ्यंकर कन्या शाळेत २४ मे रोजी होणाऱ्या या सभेला सर्व प्राध्यापक, संस्थाप्रमुख यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम येरेकार, प्रा. आनंद चौधरी, प्रा. संदीप विरुटकर, प्रा. उमाशंकर सावळकर, प्रा. महेंद्र वाडेकर, प्रा. श्रीकांत लाकडे, प्राचार्य पाईलवार आदींनी केले आहे.

टॅग्स :Schoolशाळा