शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
3
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
4
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
5
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
6
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
7
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
8
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
9
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
10
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
11
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
12
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
13
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
14
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
15
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
16
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
17
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
18
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
19
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
20
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
Daily Top 2Weekly Top 5

उच्च माध्यमिकच्या अनुदान प्रस्तावांची युद्ध पातळीवर छाननी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 19:39 IST

राज्य शासनाने फेब्रुवारीत अनुदान पात्र शाळांच्या यादीतून डावललेल्या शेकडो प्रस्तावांची पुन्हा एकदा युद्धपातळीवर छाननी केली जात आहे. विशेष म्हणजे, यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांनी पुण्याच्या आयुक्तालयापुढे केलेल्या धरणे आंदोलनानंतर या कामास गती आली आहे.

ठळक मुद्देआयुक्त कार्यालयात गती मे महिन्याच्या अखेरीस मंत्रालयात जाण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने फेब्रुवारीत अनुदान पात्र शाळांच्या यादीतून डावललेल्या शेकडो प्रस्तावांची पुन्हा एकदा युद्धपातळीवर छाननी केली जात आहे. विशेष म्हणजे, यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांनी पुण्याच्या आयुक्तालयापुढे केलेल्या धरणे आंदोलनानंतर या कामास गती आली. त्यामुळे गेल्या सतरा वर्षांपासून विनावेतन काम करीत असलेल्या शिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.राज्यात २००१ पासून साधारणत: १३०० कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक विद्यालये विनाअनुदान तत्ववावर सुरू आहेत. त्यात काही वर्षांपूर्वी ‘कायम’ शब्द निघाल्याने अनुदानाच्या आशा जाग्या झाल्या. २०१४ मध्ये मूल्यांकन होऊनही शासनाने या शाळांची अनुदानपात्र यादी घोषित केली नव्हती. त्यासाठी शिक्षकांनी २०० पेक्षा जास्त आंदोलने केल्यावर राज्य शासनाने यंदा २८ फेब्रुवारीला अनुदानपात्र शाळांची यादी जाहीर केली. परंतु, केवळ १२३ शाळांचाच समावेश केला. विशेष म्हणजे, यवतमाळ, नागपूरसारख्या जिल्ह्यातील एकाही उच्च माध्यमिक विद्यालयाचा या यादीत समावेश करण्यात आला नाही.त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. यवतमाळ जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या निर्णयाचा धिक्कारही केला. त्यानंतरही प्रशासन हलले नाही. तेव्हा थेट पुण्यात आयुक्त आणि संचालक कार्यालयापुढे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. १२ दिवस सतत आंदोलन केल्यानंतर आयुक्त कार्यालय जागे झाले. अडलेल्या सर्व प्रस्तावांची पुन्हा एकदा छाननी करण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालकांनी दिले होते. त्यामुळे आंदोलन थांबविण्यात आले.परंतु, केवळ आश्वासनावर विसंबून न राहाता विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या शिक्षकांनी नुकतीच आयुक्त कार्यालयात जाऊन आपल्या प्रस्तावांबाबत जाब विचारला. तेव्हा यवतमाळसह राज्यातील सर्वच प्रस्तावांची युद्धस्तरावर छाननी सुरू असून ते लवकरच मंत्रालयात पाठविण्यात येणार असल्याचे लेखी पत्र शिक्षकांना देण्यात आले. परंतु, एवढ्यवरच न थांबता कृती समितीने आता सहविचार सभा आयोजित केली आहे. यवतमाळच्या अभ्यंकर कन्या शाळेत २४ मे रोजी होणाऱ्या या सभेला सर्व प्राध्यापक, संस्थाप्रमुख यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम येरेकार, प्रा. आनंद चौधरी, प्रा. संदीप विरुटकर, प्रा. उमाशंकर सावळकर, प्रा. महेंद्र वाडेकर, प्रा. श्रीकांत लाकडे, प्राचार्य पाईलवार आदींनी केले आहे.

टॅग्स :Schoolशाळा