शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गणवेश दिलाच नाही : ‘एमपीएसपी’नेच मांडला हिशेब, मुख्याध्यापकांच्या कारभारावर ताशेरे

By अविनाश साबापुरे | Updated: July 8, 2023 17:56 IST

गरीब पोरांसाठी आलेले पावणे चार कोटी परत जाणार 

अविनाश साबापुरे

यवतमाळ : शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देणार, अशी घोषणा शिक्षण विभागाने केली. त्यासाठी जूनच्या सुरुवातीलाच जिल्ह्याला तब्बल चार कोटी ७३ लाख ८७ हजारांचा निधीही दिला. परंतु, अद्यापही बहुतांश विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. शाळांनी हा निधी खर्चच केला नसल्याची गंभीर बाब पुढे आली असून आता ‘एमपीएसपी’ने अखर्चित राहिलेला तीन कोटी ७६ लाखांचा निधी परत घेण्याची तंबी दिली आहे.

समग्र शिक्षा अभियानातून दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना दोन गणवेश मोफत दिले जातात. यंदा २०२३-२४ या सत्रात गणवेश वाटपासाठी फेब्रुवारी-मार्चमध्येच केंद्र सरकारच्या स्तरावर ‘बजेट’ही ठरले. महाराष्ट्रातील शाळांकडूनविद्यार्थीसंख्येचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्राला केंद्राच्या वाट्याचा ६० टक्के निधीही देण्यात आला. त्यात ४० टक्के वाटा महाराष्ट्र सरकारने उचलून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देणे क्रमप्राप्त होते. तीच दक्षता घेत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने जूनच्या सुरुवातीलाच जिल्ह्याला चार कोटी ७३ लाखांचा निधी वर्ग केला. समग्र शिक्षा कक्षाकडून हा निधी सोळाही पंचायत समित्यांना व तेथून शाळा व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापकांच्या संयुक्त खात्यात वर्ग करण्यात आला. त्यातून ३० जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे आदेश होते. काही शाळांनी हे गणवेश दिलेही. मात्र बहुतांश शाळांनी याबाबत उदासीनता दाखविल्याचा प्रकार पुढे आला आहे. 

निधी खर्च का झाला नाही, याबाबत ६ जुलै रोजी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी व्हीसीद्वारे जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यात तब्बल पावणेचार कोटी रुपये खर्चच झाले नसल्याची बाब पुढे आली. या बैठकीत मुख्याध्यापकांच्या कारभारावर चांगलेच ताशेरे ओढले गेले. आता हा निधी पाच दिवसात खर्च न झाल्यास तो परत घेण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी तातडीने सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना गणवेश योजनेचा निधी तातडीने १०० टक्के खर्च करण्याचे आदेश दिले आहेत. 

आकडेच बोलतात 

तालुका : निधी : शिल्लक आर्णी : ३०१९८०० : ३०१९८००बाभूळगाव : १७४०३०० : १०२०६००दारव्हा : ३६७३५०० : ३६७३५००दिग्रस : २२८६३०० : २०५७१००घाटंजी : ३३२२२०० : ८२७७००कळंब : १८९५७०० : १८०३९००महागाव : ४४२४१०० : ४४२४१००मारेगाव : १३४२२०० : १३४२२००नेर : १८९४२०० : १८९४२००पांढरकवडा : २७५८८०० : २९१०००पुसद : ५७३४८०० : ५७३४८००राळेगाव : १८६७२०० : १८६७२००उमरखेड : ५५४६४०० : ५५४६४००वणी : २१७८६०० : २१७८६००यवतमाळ : ३९८०१०० : २२१४००झरी : १७२३२०० : १७२३२००एकूण : ४,७३,८७,४०० : ३,७६,२५,७००

दहा पंचायत समित्यांची ‘झिरो’ कामगिरी 

गणवेशाचा निधी शाळा सुरू होण्यापूर्वीच खर्च करून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याचे आदेश होते. प्रत्यक्षात शाळा सुरू होऊन आठवडा लोटला तरी निधी खर्च करण्यात आलेला नाही. यात आर्णी, दारव्हा, महागाव, मारेगाव, नेर, पुसद, राळेगाव, उमरखेड, वणी व झरी या पंचायत समित्यांनी एक रुपयाही खर्च केला नसल्याची गंभीर बाब पुढे आली. या दहा तालुक्यांमध्ये गणवेशाचा खर्च शून्य आहे. मात्र त्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले आहेत. मग हा खर्च नेमका कुठून झाला, झाला असेल तर तो पीएफएमएस प्रणालीवरच झाला की नाही, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळा