शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

गणवेश दिलाच नाही : ‘एमपीएसपी’नेच मांडला हिशेब, मुख्याध्यापकांच्या कारभारावर ताशेरे

By अविनाश साबापुरे | Updated: July 8, 2023 17:56 IST

गरीब पोरांसाठी आलेले पावणे चार कोटी परत जाणार 

अविनाश साबापुरे

यवतमाळ : शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देणार, अशी घोषणा शिक्षण विभागाने केली. त्यासाठी जूनच्या सुरुवातीलाच जिल्ह्याला तब्बल चार कोटी ७३ लाख ८७ हजारांचा निधीही दिला. परंतु, अद्यापही बहुतांश विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. शाळांनी हा निधी खर्चच केला नसल्याची गंभीर बाब पुढे आली असून आता ‘एमपीएसपी’ने अखर्चित राहिलेला तीन कोटी ७६ लाखांचा निधी परत घेण्याची तंबी दिली आहे.

समग्र शिक्षा अभियानातून दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना दोन गणवेश मोफत दिले जातात. यंदा २०२३-२४ या सत्रात गणवेश वाटपासाठी फेब्रुवारी-मार्चमध्येच केंद्र सरकारच्या स्तरावर ‘बजेट’ही ठरले. महाराष्ट्रातील शाळांकडूनविद्यार्थीसंख्येचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्राला केंद्राच्या वाट्याचा ६० टक्के निधीही देण्यात आला. त्यात ४० टक्के वाटा महाराष्ट्र सरकारने उचलून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देणे क्रमप्राप्त होते. तीच दक्षता घेत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने जूनच्या सुरुवातीलाच जिल्ह्याला चार कोटी ७३ लाखांचा निधी वर्ग केला. समग्र शिक्षा कक्षाकडून हा निधी सोळाही पंचायत समित्यांना व तेथून शाळा व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापकांच्या संयुक्त खात्यात वर्ग करण्यात आला. त्यातून ३० जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे आदेश होते. काही शाळांनी हे गणवेश दिलेही. मात्र बहुतांश शाळांनी याबाबत उदासीनता दाखविल्याचा प्रकार पुढे आला आहे. 

निधी खर्च का झाला नाही, याबाबत ६ जुलै रोजी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी व्हीसीद्वारे जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यात तब्बल पावणेचार कोटी रुपये खर्चच झाले नसल्याची बाब पुढे आली. या बैठकीत मुख्याध्यापकांच्या कारभारावर चांगलेच ताशेरे ओढले गेले. आता हा निधी पाच दिवसात खर्च न झाल्यास तो परत घेण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी तातडीने सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना गणवेश योजनेचा निधी तातडीने १०० टक्के खर्च करण्याचे आदेश दिले आहेत. 

आकडेच बोलतात 

तालुका : निधी : शिल्लक आर्णी : ३०१९८०० : ३०१९८००बाभूळगाव : १७४०३०० : १०२०६००दारव्हा : ३६७३५०० : ३६७३५००दिग्रस : २२८६३०० : २०५७१००घाटंजी : ३३२२२०० : ८२७७००कळंब : १८९५७०० : १८०३९००महागाव : ४४२४१०० : ४४२४१००मारेगाव : १३४२२०० : १३४२२००नेर : १८९४२०० : १८९४२००पांढरकवडा : २७५८८०० : २९१०००पुसद : ५७३४८०० : ५७३४८००राळेगाव : १८६७२०० : १८६७२००उमरखेड : ५५४६४०० : ५५४६४००वणी : २१७८६०० : २१७८६००यवतमाळ : ३९८०१०० : २२१४००झरी : १७२३२०० : १७२३२००एकूण : ४,७३,८७,४०० : ३,७६,२५,७००

दहा पंचायत समित्यांची ‘झिरो’ कामगिरी 

गणवेशाचा निधी शाळा सुरू होण्यापूर्वीच खर्च करून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याचे आदेश होते. प्रत्यक्षात शाळा सुरू होऊन आठवडा लोटला तरी निधी खर्च करण्यात आलेला नाही. यात आर्णी, दारव्हा, महागाव, मारेगाव, नेर, पुसद, राळेगाव, उमरखेड, वणी व झरी या पंचायत समित्यांनी एक रुपयाही खर्च केला नसल्याची गंभीर बाब पुढे आली. या दहा तालुक्यांमध्ये गणवेशाचा खर्च शून्य आहे. मात्र त्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले आहेत. मग हा खर्च नेमका कुठून झाला, झाला असेल तर तो पीएफएमएस प्रणालीवरच झाला की नाही, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळा