शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

गणवेश दिलाच नाही : ‘एमपीएसपी’नेच मांडला हिशेब, मुख्याध्यापकांच्या कारभारावर ताशेरे

By अविनाश साबापुरे | Updated: July 8, 2023 17:56 IST

गरीब पोरांसाठी आलेले पावणे चार कोटी परत जाणार 

अविनाश साबापुरे

यवतमाळ : शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देणार, अशी घोषणा शिक्षण विभागाने केली. त्यासाठी जूनच्या सुरुवातीलाच जिल्ह्याला तब्बल चार कोटी ७३ लाख ८७ हजारांचा निधीही दिला. परंतु, अद्यापही बहुतांश विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. शाळांनी हा निधी खर्चच केला नसल्याची गंभीर बाब पुढे आली असून आता ‘एमपीएसपी’ने अखर्चित राहिलेला तीन कोटी ७६ लाखांचा निधी परत घेण्याची तंबी दिली आहे.

समग्र शिक्षा अभियानातून दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना दोन गणवेश मोफत दिले जातात. यंदा २०२३-२४ या सत्रात गणवेश वाटपासाठी फेब्रुवारी-मार्चमध्येच केंद्र सरकारच्या स्तरावर ‘बजेट’ही ठरले. महाराष्ट्रातील शाळांकडूनविद्यार्थीसंख्येचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्राला केंद्राच्या वाट्याचा ६० टक्के निधीही देण्यात आला. त्यात ४० टक्के वाटा महाराष्ट्र सरकारने उचलून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देणे क्रमप्राप्त होते. तीच दक्षता घेत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने जूनच्या सुरुवातीलाच जिल्ह्याला चार कोटी ७३ लाखांचा निधी वर्ग केला. समग्र शिक्षा कक्षाकडून हा निधी सोळाही पंचायत समित्यांना व तेथून शाळा व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापकांच्या संयुक्त खात्यात वर्ग करण्यात आला. त्यातून ३० जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे आदेश होते. काही शाळांनी हे गणवेश दिलेही. मात्र बहुतांश शाळांनी याबाबत उदासीनता दाखविल्याचा प्रकार पुढे आला आहे. 

निधी खर्च का झाला नाही, याबाबत ६ जुलै रोजी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी व्हीसीद्वारे जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यात तब्बल पावणेचार कोटी रुपये खर्चच झाले नसल्याची बाब पुढे आली. या बैठकीत मुख्याध्यापकांच्या कारभारावर चांगलेच ताशेरे ओढले गेले. आता हा निधी पाच दिवसात खर्च न झाल्यास तो परत घेण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी तातडीने सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना गणवेश योजनेचा निधी तातडीने १०० टक्के खर्च करण्याचे आदेश दिले आहेत. 

आकडेच बोलतात 

तालुका : निधी : शिल्लक आर्णी : ३०१९८०० : ३०१९८००बाभूळगाव : १७४०३०० : १०२०६००दारव्हा : ३६७३५०० : ३६७३५००दिग्रस : २२८६३०० : २०५७१००घाटंजी : ३३२२२०० : ८२७७००कळंब : १८९५७०० : १८०३९००महागाव : ४४२४१०० : ४४२४१००मारेगाव : १३४२२०० : १३४२२००नेर : १८९४२०० : १८९४२००पांढरकवडा : २७५८८०० : २९१०००पुसद : ५७३४८०० : ५७३४८००राळेगाव : १८६७२०० : १८६७२००उमरखेड : ५५४६४०० : ५५४६४००वणी : २१७८६०० : २१७८६००यवतमाळ : ३९८०१०० : २२१४००झरी : १७२३२०० : १७२३२००एकूण : ४,७३,८७,४०० : ३,७६,२५,७००

दहा पंचायत समित्यांची ‘झिरो’ कामगिरी 

गणवेशाचा निधी शाळा सुरू होण्यापूर्वीच खर्च करून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याचे आदेश होते. प्रत्यक्षात शाळा सुरू होऊन आठवडा लोटला तरी निधी खर्च करण्यात आलेला नाही. यात आर्णी, दारव्हा, महागाव, मारेगाव, नेर, पुसद, राळेगाव, उमरखेड, वणी व झरी या पंचायत समित्यांनी एक रुपयाही खर्च केला नसल्याची गंभीर बाब पुढे आली. या दहा तालुक्यांमध्ये गणवेशाचा खर्च शून्य आहे. मात्र त्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले आहेत. मग हा खर्च नेमका कुठून झाला, झाला असेल तर तो पीएफएमएस प्रणालीवरच झाला की नाही, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळा