शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

टंचाई भीषण, तरीही निर्णय संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:29 IST

ऐन वेळेवर गोखीचा पर्याय निवडण्याचे काम केले. घिसाडघाईत गोखीचे पाणी शहरात आणताच आले नाही. जवळपास ४२ लाखांच्या पाईपलाईनचा खर्च व्यर्थ ठरला. आता टँकर आणून पाणी वाटप हा परंपरागत उपाय केला जाऊ लागला.

ठळक मुद्देउपायांना नियमाचे बंधन : पालिकेकडे समन्वयाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ऐन वेळेवर गोखीचा पर्याय निवडण्याचे काम केले. घिसाडघाईत गोखीचे पाणी शहरात आणताच आले नाही. जवळपास ४२ लाखांच्या पाईपलाईनचा खर्च व्यर्थ ठरला. आता टँकर आणून पाणी वाटप हा परंपरागत उपाय केला जाऊ लागला. अशात भूजल पातळी झपाट्याने कमी झाली. त्यासोबत टँकरच्या पाण्याची मागणी वाढली. जानेवारीत लागलेले टँकर मे मध्ये मागणी पूर्ण करू शकले नाही. आरडोओरडा वाढल्यानंतर ३५ हजार लिटरचे टँकर प्रशासनाने शहरात आणले. त्यातही आठवडाभर टँकरचा खेळखंडोबाच झाला. पाणी टाकीत टाकून नळाने द्यायचे, हाही प्रयोग जनता तडफडत असताना करून पाहिला. काही साध्य होत नसल्याचे लक्षात येताच टँकरमधून टँकर भरण्याचा उपक्रम सुरू झाला. यातही फेऱ्या व वेळेच्या मर्यादा असल्याने सायंकाळी ५ नंतर पाणी बंद होते.टंचाईचा निधी मिळविण्यासाठी शहराला दुष्काळी क्षेत्र जाहीर केले. तीन कोटींचा भक्कम निधी आला. मात्र त्यासोबतच जाचक अटीही स्वीकाराव्या लागल्या. खासगी व सामूहिक बोअरवेल करण्यास निर्बंध घातले. शहरातून खासगी टँकर भरण्यावर बंदी आणली. याने दिलासा तर दूर टंचाईच्या संकटात भरच पडली. महसूलातील अधिकारी जनतेपर्यंत पाणी पोहोचते की नाही याची खातरजमा करण्याऐवजी पाणी कसे मिळणार नाही, अशा दुष्काळी निकषांची अंमलबजावणी करण्यातच धन्यता मानू लागले. कठोर निकषाविरोधात तीव्र आक्षेप उमटल्यानंतर शासकीय बोअरवेल खोदण्याला परवानगी मिळाली. तसेच खासगी टँकरला शहराबाहेरून पाणी आणण्यास सवलत दिली. भीषण टंचाईत शहर होरपळत असताना प्रशासकी यंत्रणेची अंमलबजावणीच्या नावाने केवळ रंगीत तालीम सुरू आहे. आताही एक ना अनेक पर्याय उपलब्ध असताना नियोजनशून्यता कायम आहे.उपाययोजनेच्या कामांची जबाबदारी असलेले अधिकारी, कर्मचारी कधीच गंभीर दिसत नाही. उलट नगरपरिषदेची यंत्रणा जीवन प्राधिकरणकडे बोट दाखविते. महसूल यंत्रणा त्रयस्तपणे केवळ फोनवरून आकडेवारी घेण्यात धन्यता मानते. नगरपरिषदेचा पाणीपुरवठा विभाग पूर्णत: निद्रिस्त आहे. येथील अधिकारीवर्ग सातत्याने व्यस्तता दाखवून एकाही भागात पोहोचत नाही. या पाणीपुरवठा विभागाने अनेक उपाययोजना राबविल्या. कोट्यवधीच्या घरातील निधीही जिरविला. पाणी मात्र पोहोचलेच नाही, हे वास्तवही नगरसेवकांच्या चर्चेतून बाहेर आले. नियोजनाचा आराखडा तयार करताना उणिवा राहिल्याची प्रांजळ कबुलीसुध्दा नगरसेवकांनी दिली.उपाययोजनांच्या खर्चाची आकडेवारीनिळोणा, चापडोह फ्लोटींग पंप - एक कोटी ५० लाख, गोखीची तात्पुरती पाईपलाईन - ४५ लाख, विहिरीची स्वच्छता - ३५ लाख, हांतपंप दुरुस्ती, विंधन विहिरींसाठी भाड्याने घेतलेले मोटरपंप (२००० प्रति दिवस) या सर्व आकड्यांची गोळाबेरीज केली आणि प्रत्यक्ष शहरात नागरिकांना मिळालेले पाणी याचा हिशेब काढला तर मोठी तफावत दिसून येते. इतका पैसा मोजूनही दूषित पाणी अनेक घरात पोहोचले. अजूनही पिण्याच्या पाण्याची समस्या कायमच आहे. आरोग्याचा प्रश्न केव्हाही उद्भवू शकतो. प्रभाग ११ मध्ये दूषित पाण्याने कॉलरासारख्या साथीची लागण झाली होती. यात एकाला प्राणही गमवावा लागला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई