पाण्यासाठी उत्तरवाढोणाच्या सरपंच, सचिवाला ग्रामपंचायतीत कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 22:17 IST2018-05-29T22:17:47+5:302018-05-29T22:17:57+5:30
भीषण पाणीटंचाईचा दोन महिन्यांपासून सामना करणाऱ्या नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथील गावकºयांनी मंगळवारी आक्रमक पावित्रा घेत चक्क सरपंच, सचिव आणि चार सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. यामुळे गावात एकच खळबळ उडाली.

पाण्यासाठी उत्तरवाढोणाच्या सरपंच, सचिवाला ग्रामपंचायतीत कोंडले
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनखास : भीषण पाणीटंचाईचा दोन महिन्यांपासून सामना करणाऱ्या नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथील गावकºयांनी मंगळवारी आक्रमक पावित्रा घेत चक्क सरपंच, सचिव आणि चार सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. यामुळे गावात एकच खळबळ उडाली.
उत्तरवाढोणा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावकरी एक किलोमीटरवरून पाणी आणत आहे. गावातील नळ योजनेचा पाणीपुरवठा १५ ते २० दिवसानंतर होतो. त्यामुळे गावकरी संतप्त झाले. मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उज्वला गुरड, उपसरपंच निरंजन लांजेवार, सचिव प्रशांत बोचरे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. त्यांना जाब विचारण्यासाठी गावकरी गेले. तेथे गावकºयांनी पाणी प्रश्नावर त्यांना चांगलेच धारेवर धरले. दरम्यान संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांना कोंडले. दोन तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली. गावकºयांनी यावेळी ग्रामपंचायतीकडे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. ग्रामपंचायतीने शासनाकडे तसा प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगितले. मात्र टँकर अद्याप का पोहोचला नाही या प्रश्नावर गावकरी चांगलेच संतप्त झाले होते. भरउन्हात डोक्यावरून गुंडाने महिलांना पाणी आणावे लागत आहे. त्या संतापाचा उद्रेक मंगळवारी झाला.