शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

"संजय राऊत मातोश्रीचे घरगडी, अपक्ष आमदार स्वाभिमानी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 14:52 IST

अपक्ष आमदार कुणाचे घरगडी नाहीत, ते स्वाभिमानी आहेत, असा उपरोधिक टोला आमदार संजय कुटे यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना लगावला.

यवतमाळ - राज्यसभा निवडणुकीतील भाजप विरुद्ध शिवसेनेच्या महायुद्धात शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. यात महाराष्ट्रातील सहापैकी तीन जागांवर भाजपचा विजय झाला, तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा जिंकता आली. शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिक यांच्यात झालेल्या थेट सामन्यात भाजपचा विजय झाला. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही अपक्ष आमदारांची नावे सांगत भाजपला मतदान केल्याचा आरोप केला. त्यावरुन, आता भाजप नेत्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. अपक्ष आमदार हे कोणाचेही घरगडी नाहीत, असे माजीमंत्री संजय कुटे यांनी म्हटले आहे. 

अपक्ष आमदार कुणाचे घरगडी नाहीत, ते स्वाभिमानी आहेत, असा उपरोधिक टोला आमदार संजय कुटे यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना लगावला. संजय राऊत हे मातोश्रीचे आणि विजय वडेट्टीवार हे सोनिया गांधींचे घरगडी असेल, असेही ते म्हणाले. संजय राऊत आणि वडेट्टीवार यांच्या व्यक्तव्यावर आचारसंहिता भंगाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करायची का नाही ते अपक्ष आमदार ठरवणार आहेत. मात्र, आमदारांचा निधी कुणीही थांबवू शकत नाही, आणि तो निधी कसा मिळवायचा हे अपक्ष आमदारांना माहीत आहे. अपक्ष आमदार हे स्वाभिमानी आहेत, अशा शब्दात यवतमाळ येथे आले असता आमदार संजय कुटे यांनी संजय राऊतांवर तोफ डागली. 

'संजय राऊतांना सत्तेचा माज'

राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अनिल बोंडे नागपूरात दाखल झाले. नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना बोंडे म्हणाले की, "महाराष्ट्रातील जनता आता महाविकास आघाडीला वैतागली आहे. महाविकास आघाडीतील आणि अपक्ष आमदारही त्यांना वैतागले आहेत. संजय राऊत यांना तर सत्तेचा माज आलाय, ते द्वेषाने पेटलेले आहेत, म्हणूनच त्यांनी अपक्ष आमदारांचा अपमान केला. अपक्ष आमदार घोडेबाजारामध्ये खपले, किंमत घेतली असा आरोप करून बदनामी करण्याचा गाढवपणा त्यांनी केला," अशी बोचरी टीका बोंडे यांनी केली आहे. 

राऊतांनी आचारसंहितेचा भंग केला - सोमय्या

शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस किंवा अन्य पक्षाच्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. ते अधिकृत पक्षाचे आमदार असल्याने राज्यसभेला मतदान करताना पक्षाच्या प्रतोदाला मताची चिठ्ठी दाखवून ते द्यावे लागते. परंतू अपक्षांना कोणीही विचारू शकत नाही. त्यांनी कोणाला मतदान केले हे कोणीही सांगू शकत नाही. असे असताना अपक्ष आमदारांनी कोणाला मत दिले हे संजय राऊत कसे सांगू शकतात. त्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाMLAआमदारRajya Sabhaराज्यसभा