शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

संत, महंत जिल्ह्यात करणार स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:40 PM

राज्य हागणदरीमुक्त झाले असलेतरी शौचालयाचा नियमित वापर होत नाही. शौचालय नसणाºयांनी प्राधान्याने बांधावे, या मोहिमेला गती देण्यासाठी राज्यभर स्वच्छतेचा जागर हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेची मोहीम : २०० वारकऱ्यांची फळी, एका प्रबोधनकारावर २४ गावांची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य हागणदरीमुक्त झाले असलेतरी शौचालयाचा नियमित वापर होत नाही. शौचालय नसणाºयांनी प्राधान्याने बांधावे, या मोहिमेला गती देण्यासाठी राज्यभर स्वच्छतेचा जागर हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने मंगळवारी स्वच्छता विषयक परिषदेचे आयोजन केले होते. २६ जानेवारी ते १० फेबु्रवारी या कालावधीत अभियान राबविले जाणार आहे.मोहिमेला गती देण्याबाबत पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांचे पत्र प्राप्त झाले आहे. याकरिता जिल्ह्यात २०० वारकऱ्यांची फळी निर्माण करण्यात आली. या वारकºयांना मंगळवारी प्रबोधनातील विषयाचे प्रशिक्षणही देण्यात आले. एका प्रवचनकाराकडे २४ गावांची जबाबदारी देण्यात आली आहे. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संत महंताची मदत घेतली जाणार आहे. ही मंडळी गावामध्ये जाऊन प्रवचन करणार आहे. या प्रबोधनामध्ये शाश्वत स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छता सुविधांची देखभाल दुरूस्ती, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, ओला कचरा आणि सुका कचरा कसा वर्गीकृत करायचा, प्लास्टीक बंदी आणि प्लास्टीकचे धोके त्याच बरोबर परिसर स्वच्छतेचे महत्व या विषयांवर संत महंत गावपातळीवर प्रबोधन करतील. एक प्रवचनकार एका दिवशी दोन गावांमध्ये प्रवचन करणार आहे. प्रवचनानंतर उपस्थित विद्यार्थी, ग्रामस्थांना शपथ दिली जाणार आहे. कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. पाटील, स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, हभप श्यामसुंदर महाराज, भागवताचार्य गुलाबराव राऊत, हभप प्रभूदास शिरभाते, हभप पुरुषोत्तम इंगोले, हभप घोगरे महाराज, हभप लक्ष्मण तराळकर आदी उपस्थित होते.आचारसंहितेपूर्वी मोेहिमेला गतीगत चार वर्षांपासून राबविण्यात येणारी स्वच्छतेची मोहीम अधिक गतीमान करण्यावर भर देण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहितेपूर्वी स्वच्छतेचे संपूर्ण कामकाज अंतिम टप्प्यात पोहचावे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. संत महंतांमुळे या कामाला गती येईल, असा विश्वास जिल्हा परिषद यंत्रणेने व्यक्त केला.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान