शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

४२५ कोटींची कर्ज वसुली वांद्यात

By admin | Updated: November 10, 2014 22:49 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एक हजार कोटी रुपये कर्ज थकीत असून यातील ४२५ कोटी रुपये बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बँकेचा एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट) २६.५१ टक्क्यांवर

जिल्हा बँक : एनपीए २६ टक्के, सहनिबंधकांचा अल्टीमेटमयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एक हजार कोटी रुपये कर्ज थकीत असून यातील ४२५ कोटी रुपये बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बँकेचा एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट) २६.५१ टक्क्यांवर पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांनी बँकेला वसुलीच्या नियोजनाचा अहवाल मागितला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या एनपीएचे आदर्श प्रमाण पाच टक्के निर्धारित करण्यात आले आहे. त्यापेक्षा अधिक प्रमाण असल्यास आर्थिक दृष्ट्या धोक्याची घंटा मानली जाते. रिझर्व्ह बँक अशा प्रकरणात आपल्या अहवालात स्पष्ट नोंद घेते. सहकार प्रशासनाचीही या वाढत्या एनपीएवर सातत्याने नजर असते. जिल्हा बँकेचा एनपीए पूर्वी ७.४९ टक्के होता. नंतर तो दुसऱ्या वर्षी वाढून १४ टक्क्यांवर पोहोचला. आजच्या घडीला हा एनपीए तब्बल २६.५१ टक्के एवढा झाला आहे. या वाढत्या एनपीएची दखल घेऊन अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांनी सहकार कायद्याच्या कलम ७९ अन्वये बँकेला अहवाल मागितला आहे. थकीत कर्जाची वसुली वाढवून कोणत्याही परिस्थितीत बँकेचा एनपीए ३१ मार्च २०१५ पर्यंत पाच टक्क्यावर आणण्याचे निर्देश दिले आहेत. एनपीएतील कर्जाची वसुली कशी करणार याचा कार्यक्रमच बँकेला मागितला आहे. बँकेने आता वसुली मोहीम हाती घेतली. त्यासाठी ७० अधिकाऱ्यांची फौज नेमली असून वेळप्रसंगी शेतीही जप्त करण्याची तयारी चालविली आहे. बँकेने सादर वर्षभरात एनपीए १५ टक्क्याने कमी करण्याची हमी सहनिबंधकांना देऊन वसुलीचा कृती कार्यक्रम सादर केला . एक हजार कोटींपैकी ४२५ कोटी रुपये एनपीएमध्ये गेल्याने बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ४२५ कोटींच्या एनपीए कर्जापैकी ३५० कोटी रुपये शेती कर्जाचे आणि त्यातही रुपांतरित कर्जाचे आहेत. तर उर्वरित ७५ कोटी रुपये मुदती कर्जाचे आहेत. त्यामध्ये वैयक्तिक कर्ज, ओव्हर ड्रॉफ्ट व वाहनांवरील कर्जांचा समावेश आहे. एनपीए २६.५१ टक्के होण्यामागे बँकेने दुष्काळी स्थितीचा आडोसा घेतला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज थकीत राहण्यामागे सततची नापिकी, दुष्काळी स्थिती, निसर्गाचा लहरीपणा ही प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. सन २००९-१० मध्ये जिल्ह्यात पाऊस झाला नाही, कोरडा दुष्काळ पडल्याने उत्पन्न झाले नाही, पर्यायाने शेतकरी कर्ज भरु शकले नाही. गेल्या वर्षी ओला दुष्काळ पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज भरता आले नाही. यावर्षीही स्थिती वेगळी नाही. दुष्काळी स्थितीत शासनाकडून वारंवार कर्जाच्या वसुलीस मनाई केली जाते. त्यामुळे कर्जाचे वाटप जास्त आणि वसुली कमी ही पद्धत गेल्या दोन-तीन वर्षांपासून सतत सुरू असल्याने आर्थिक असमतोल निर्माण झाला आहे. त्यातूनच एनपीए वाढत गेला. ४२५ कोटींच्या संशयित व संभाव्य बुडित कर्जामध्ये रुपांतरित कर्ज ६० ते ७० टक्के आहे. अर्थात आणेवारी कमी आल्यानंतर शेतकऱ्याला थकीत कर्जाचे तीन टप्पे पाडून दिले जातात. शिवाय त्याला नव्याने कर्ज मंजूर होते. मात्र पुढील वर्षीसुद्धा दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागल्याने पुन्हा नवे कर्ज भरणे शक्य होत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)