निम्न पैनगंगा प्रकल्पावर केंद्रीय राज्यमंत्र्यांची भूमिका संदिग्ध
By Admin | Updated: July 6, 2015 02:36 IST2015-07-06T02:36:18+5:302015-07-06T02:36:18+5:30
तालुक्यातून जाणाऱ्या पैनगंगा नदीवर चिमटा येथे धरण प्रस्तावित आहे. या धरणा ऐवजी येथे शिरपूर पॅटर्न राबवून बॅरेजेस उभारण्यात यावे,....

निम्न पैनगंगा प्रकल्पावर केंद्रीय राज्यमंत्र्यांची भूमिका संदिग्ध
आर्णी : तालुक्यातून जाणाऱ्या पैनगंगा नदीवर चिमटा येथे धरण प्रस्तावित आहे. या धरणा ऐवजी येथे शिरपूर पॅटर्न राबवून बॅरेजेस उभारण्यात यावे, या मागणीसाठी धरण विरोधी संघर्ष समितीचा लढा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार हंसराज अहीर यांनी धरणाला विरोध करून परिसरातील जनमताचा पाठिंबा मिळविला होता. आता सत्तेत आल्यानंतर त्यांनी भूमिका बदलविली आहे. उघडपणे विरोधात बोलायला तयार नाही, असा आरोप धरणविरोधी संघर्ष समितीचे अॅड़ बालाजी येरावार यांनी आर्णी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
निम्न पैनगंगा धरणासंदर्भात पांढरकवडा येथील एका कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी धरण होण्यासंदर्भात भूमिका मांडली होती. यावरून धरणविरोधी समिती मॅनेज झाली, धरण विरोधी समितीमध्ये फुट पडली अशी टिका समितीवर होऊ लागली होती. याचा खुलासा करण्यासाठी धरणविरोधी समितीने आर्णी येथील विश्रामगृहावर केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांची भेट घेऊन निम्नपैनगंगा धरण बांधण्याऐवजी तेथे बॅरेजस, बुडीत व लाभक्षेत्रातील नाल्यावर शिरपूर पॅटर्न, सर्व वनजमिनीवर साठवण तलाव बांधून सिंचनाचा प्रश्न सोडवावा. यातून आर्थिक, तांत्रिकदृष्ट्या, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणाचे नुकसार टाळता येणार आहे, असा प्रस्ताव केंद्रीय मंत्र्यांपुढे केला आहे. मात्र त्यांनी या प्रस्तावावर कुठलीही उघड भूमिका मांडली
नाही.
उलट धरण होण्याकडेच त्यांचा कल दिसून आला. यामुळे धरणविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हाद जगताप, अॅड़ बालाजी येरावार, विजय राऊत, मुबारक तवंर या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देऊन निर्णयाबाबत पुनरविचार करावा अशीही मागणी केली. केंद्रीय मंत्र्यांनी बोलण्याचे टाळल्यानंतर बालाजी येरावार यांनी आपला संताप व्यक्त करत धरणाला विरोध कायम राहील असाही निर्धार केला. (शहर प्रतिनिधी)