शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रस्ता दुरुस्तीसाठी हवे ४०० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 22:24 IST

गत १० वर्षांपासून जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते आणि जिल्हा मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नुकत्याच निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने त्यात भर पडली आहे. या रस्त्यांसाठी ४०० कोटी रूपयांची मागणी करण्यात आली. प्रत्यक्षात केवळ १० कोटी रूपयांत जिल्हा परिषदेची बोळवण करण्यात आली.

ठळक मुद्देपावसाने झाली चाळणी : जिल्हा परिषदेची १० कोटी रुपयांत बोळवण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत १० वर्षांपासून जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते आणि जिल्हा मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नुकत्याच निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने त्यात भर पडली आहे. या रस्त्यांसाठी ४०० कोटी रूपयांची मागणी करण्यात आली. प्रत्यक्षात केवळ १० कोटी रूपयांत जिल्हा परिषदेची बोळवण करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील दळणवळण कोलमडणार आहे.जिल्ह्याचा व्याप १६ तालुक्यामध्ये पसरला आहे. २०४० गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते आहेत. एकवेळा तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर थातुरमातूर डागडुजी झाली. यानंतर रस्त्यांकडे फिरून पाहिलेच नाही. यामुळे हे रस्ते आज ठिकठिकाणी खड्ड्यांनी व्यापले आहे. काही ठिकाणी नावालाच डांबर दिसत आहे. त्यामध्ये मुरूम भरून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. पावसाने त्या ठिकाणी पुन्हा मोठे खड्डे झाले आहे.जिल्हा परिषदेला नऊ हजार ६०० किमीच्या जिल्हा मार्गासाठी ४०० कोटी रूपयांची आवश्यकता आहे. या निधीची मागणी जिल्हा परिषदेने प्रशासनाकडे नोंदविली. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केवळ १० कोटी मंजूर करण्यात आले. यामुळे एका सदस्याला एक किमीचा रस्ता देता येणार आहे. गत १० वर्षांपासून रस्त्यांना लागणारा निधीच उपलब्ध होत नाही. आताही निधी मिळाला नाही. यामुळे पुढील काळात डांबर रोडवर केवळ पायवाट दृष्टीस पडेल, अशी अवस्था अंतर्गत रस्त्यांची झाली आहे. ग्रामीण भागाच्या विकासाला गती देणारे रस्ते खिळखिळे झाल्याने ग्रामस्थांमध्ये रोष आहे.७० रस्ते ‘डॅमेज’, सात पुलांची हानीबुधवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे ग्रामीण भागातील ७० रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास १५० किलोमीटर अंतरातील हे रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे. तर सात पुलावरचे सिमेंटचे थर वाहून गेले आहे. संरक्षक कठड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्यासाठी सव्वा कोटींची तातडीने आवश्यकता आहे. तर कायम स्वरूपी दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांची गरज आहे.

टॅग्स :Rainपाऊस