शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुरुस्तीसाठी हवे ४०० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 22:24 IST

गत १० वर्षांपासून जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते आणि जिल्हा मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नुकत्याच निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने त्यात भर पडली आहे. या रस्त्यांसाठी ४०० कोटी रूपयांची मागणी करण्यात आली. प्रत्यक्षात केवळ १० कोटी रूपयांत जिल्हा परिषदेची बोळवण करण्यात आली.

ठळक मुद्देपावसाने झाली चाळणी : जिल्हा परिषदेची १० कोटी रुपयांत बोळवण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत १० वर्षांपासून जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते आणि जिल्हा मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नुकत्याच निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने त्यात भर पडली आहे. या रस्त्यांसाठी ४०० कोटी रूपयांची मागणी करण्यात आली. प्रत्यक्षात केवळ १० कोटी रूपयांत जिल्हा परिषदेची बोळवण करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील दळणवळण कोलमडणार आहे.जिल्ह्याचा व्याप १६ तालुक्यामध्ये पसरला आहे. २०४० गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते आहेत. एकवेळा तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर थातुरमातूर डागडुजी झाली. यानंतर रस्त्यांकडे फिरून पाहिलेच नाही. यामुळे हे रस्ते आज ठिकठिकाणी खड्ड्यांनी व्यापले आहे. काही ठिकाणी नावालाच डांबर दिसत आहे. त्यामध्ये मुरूम भरून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. पावसाने त्या ठिकाणी पुन्हा मोठे खड्डे झाले आहे.जिल्हा परिषदेला नऊ हजार ६०० किमीच्या जिल्हा मार्गासाठी ४०० कोटी रूपयांची आवश्यकता आहे. या निधीची मागणी जिल्हा परिषदेने प्रशासनाकडे नोंदविली. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केवळ १० कोटी मंजूर करण्यात आले. यामुळे एका सदस्याला एक किमीचा रस्ता देता येणार आहे. गत १० वर्षांपासून रस्त्यांना लागणारा निधीच उपलब्ध होत नाही. आताही निधी मिळाला नाही. यामुळे पुढील काळात डांबर रोडवर केवळ पायवाट दृष्टीस पडेल, अशी अवस्था अंतर्गत रस्त्यांची झाली आहे. ग्रामीण भागाच्या विकासाला गती देणारे रस्ते खिळखिळे झाल्याने ग्रामस्थांमध्ये रोष आहे.७० रस्ते ‘डॅमेज’, सात पुलांची हानीबुधवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे ग्रामीण भागातील ७० रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास १५० किलोमीटर अंतरातील हे रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे. तर सात पुलावरचे सिमेंटचे थर वाहून गेले आहे. संरक्षक कठड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्यासाठी सव्वा कोटींची तातडीने आवश्यकता आहे. तर कायम स्वरूपी दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांची गरज आहे.

टॅग्स :Rainपाऊस