शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

महसूल खात्याला रिक्त पदांनी पोखरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 22:27 IST

जिल्हा प्रशासनात महत्त्वाचे मानले जाणाऱ्या महसूल खात्याला सध्या रिक्त पदांनी पोखरले आहे. महिनोगणती रिक्त असलेल्या या जागा सत्ताधारी नेत्यांचे राजकीय अपयश मानले जाते. परंतु त्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांचे समर्थक एकमेकांकडे बोट दाखवित आहे.

ठळक मुद्देअपयश कुणाचे ? : पालकमंत्र्यांचे की महसूल राज्यमंत्र्यांचे ?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा प्रशासनात महत्त्वाचे मानले जाणाऱ्या महसूल खात्याला सध्या रिक्त पदांनी पोखरले आहे. महिनोगणती रिक्त असलेल्या या जागा सत्ताधारी नेत्यांचे राजकीय अपयश मानले जाते. परंतु त्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांचे समर्थक एकमेकांकडे बोट दाखवित आहे.संजय राठोड यांच्याकडे महसूल राज्यमंत्री तर सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री पद मदन येरावार यांच्याकडे आहे. त्यानंतरही जिल्ह्यात शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात अधिकारी-कर्मचाºयांची पदे रिक्त आहेत. विशेषत: शासकीय यंत्रणेचा कणा समजल्या जाणाºया महसूल विभागातच सर्वाधिक जागा रिक्त आहेत. आजच्या घडीला जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ दोन उपजिल्हाधिकारी खिंड लढवित आहेत. जिल्हाधिकारी प्रशिक्षणासाठी गेले आहे. रिक्त पदांमुळे ऐन पाणीटंचाईत महसूल खात्याची गती मंदावली आहे. खरीप हंगाम तोंडावर आहे. पीक कर्ज वाटप, बियाणे, खते, कीटकनाशकांची उपलब्धी, शेतमालाची विक्री, साठवणूक, चुकारे असे विविध प्रश्न आहेत. यावर शासकीय स्तरावर फारशी चर्चा होताना दिसत नाही. प्रशासकीय यंत्रणेत मरगळ आली आहे. यासाठी जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांना जबाबदार धरले जात आहे.जनतेची रास्त अपेक्षामहसूल राज्यमंत्रीपद यवतमाळ जिल्ह्याकडे असल्याने किमान महसूल विभागात तरी अधिकारी-कर्मचाऱ्यांची एकही जागा रिक्त असू नये, ही येथील जनतेची रास्त अपेक्षा आहे. परंतु प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणात महसुलात पदे रिक्त आहे. काही अधिकाºयांच्या नियुक्त्या झाल्या. मात्र त्यांनी परस्परच आपले बदली आदेश फिरवून घेतले.उघडे पाडण्याची तर खेळी नाही?जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पूर्वी संजय राठोड यांच्याकडे होते. मात्र भाजपाने ते स्वत:कडे घेतले. तेव्हापासून हिरमोड झाल्याने राठोड यांचा जिल्ह्यात इन्टरेस्ट संपला. आता संपूर्ण जबाबदारी मदन येरावार यांची म्हणून ते दुर्लक्ष करीत असावे, असा अंदाज आहे. अधिकाधिक जागा रिक्त राहिल्यास पालकमंत्री पदाचे अपयश उघड होईल, असा तर शिवसेनेचा छुपा अजेंडा नाही ना असा शंकेचा सूर ऐकायला मिळतो आहे.सामान्य प्रशासनचा उपयोग काय?पालकमंत्रीपद मदन येरावार यांनी खेचून आणत आपले वजन दाखवून दिले. त्यांच्याकडे सामान्य प्रशासन हे खाते आहे. त्यानंतरही जिल्ह्यात महसूलसह विविध खात्यात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असाव्या, हे पालकमंत्र्यांचे अपयश मानले जाते. ना. येरावारांकडील ऊर्जा खात्यातही अनेक पदे रिक्त आहेत. बदलीवर अधिकारी येण्यास तयार नाहीत. त्यातही सर्वाधिक वाईट अवस्था भूमिअभिलेख, अन्न व औषधी प्रशासन या खात्यांची आहे. ‘महसूल’चे अपयश दिसावे म्हणून भाजपाची तर त्यातील पदे रिक्त ठेवण्याची खेळी नसावी ना, असा सूरही ऐकायला मिळतो आहे.मंत्र्यांच्या वर्चस्वाच्या लढाईत जनतेचे हालभाजपा, शिवसेना मंत्र्यांच्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईत जिल्ह्यातील जनता मात्र होरपळली जात आहे. ऐन पाणीटंचाईच्या काळातही प्रशासकीय सपोर्ट मिळताना दिसत नाही. रिक्त पदे भरण्याबाबत जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारवर एकजुटीने दबाव वाढविल्याचे ऐकिवात नाही. विविध खात्यातील या रिक्त पदांचा विपरित परिणाम जिल्ह्यात सर्वदूर होत असून त्याचा त्रास सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे.