शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

महसूल खात्याला रिक्त पदांनी पोखरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 22:27 IST

जिल्हा प्रशासनात महत्त्वाचे मानले जाणाऱ्या महसूल खात्याला सध्या रिक्त पदांनी पोखरले आहे. महिनोगणती रिक्त असलेल्या या जागा सत्ताधारी नेत्यांचे राजकीय अपयश मानले जाते. परंतु त्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांचे समर्थक एकमेकांकडे बोट दाखवित आहे.

ठळक मुद्देअपयश कुणाचे ? : पालकमंत्र्यांचे की महसूल राज्यमंत्र्यांचे ?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा प्रशासनात महत्त्वाचे मानले जाणाऱ्या महसूल खात्याला सध्या रिक्त पदांनी पोखरले आहे. महिनोगणती रिक्त असलेल्या या जागा सत्ताधारी नेत्यांचे राजकीय अपयश मानले जाते. परंतु त्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांचे समर्थक एकमेकांकडे बोट दाखवित आहे.संजय राठोड यांच्याकडे महसूल राज्यमंत्री तर सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री पद मदन येरावार यांच्याकडे आहे. त्यानंतरही जिल्ह्यात शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात अधिकारी-कर्मचाºयांची पदे रिक्त आहेत. विशेषत: शासकीय यंत्रणेचा कणा समजल्या जाणाºया महसूल विभागातच सर्वाधिक जागा रिक्त आहेत. आजच्या घडीला जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ दोन उपजिल्हाधिकारी खिंड लढवित आहेत. जिल्हाधिकारी प्रशिक्षणासाठी गेले आहे. रिक्त पदांमुळे ऐन पाणीटंचाईत महसूल खात्याची गती मंदावली आहे. खरीप हंगाम तोंडावर आहे. पीक कर्ज वाटप, बियाणे, खते, कीटकनाशकांची उपलब्धी, शेतमालाची विक्री, साठवणूक, चुकारे असे विविध प्रश्न आहेत. यावर शासकीय स्तरावर फारशी चर्चा होताना दिसत नाही. प्रशासकीय यंत्रणेत मरगळ आली आहे. यासाठी जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांना जबाबदार धरले जात आहे.जनतेची रास्त अपेक्षामहसूल राज्यमंत्रीपद यवतमाळ जिल्ह्याकडे असल्याने किमान महसूल विभागात तरी अधिकारी-कर्मचाऱ्यांची एकही जागा रिक्त असू नये, ही येथील जनतेची रास्त अपेक्षा आहे. परंतु प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणात महसुलात पदे रिक्त आहे. काही अधिकाºयांच्या नियुक्त्या झाल्या. मात्र त्यांनी परस्परच आपले बदली आदेश फिरवून घेतले.उघडे पाडण्याची तर खेळी नाही?जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पूर्वी संजय राठोड यांच्याकडे होते. मात्र भाजपाने ते स्वत:कडे घेतले. तेव्हापासून हिरमोड झाल्याने राठोड यांचा जिल्ह्यात इन्टरेस्ट संपला. आता संपूर्ण जबाबदारी मदन येरावार यांची म्हणून ते दुर्लक्ष करीत असावे, असा अंदाज आहे. अधिकाधिक जागा रिक्त राहिल्यास पालकमंत्री पदाचे अपयश उघड होईल, असा तर शिवसेनेचा छुपा अजेंडा नाही ना असा शंकेचा सूर ऐकायला मिळतो आहे.सामान्य प्रशासनचा उपयोग काय?पालकमंत्रीपद मदन येरावार यांनी खेचून आणत आपले वजन दाखवून दिले. त्यांच्याकडे सामान्य प्रशासन हे खाते आहे. त्यानंतरही जिल्ह्यात महसूलसह विविध खात्यात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असाव्या, हे पालकमंत्र्यांचे अपयश मानले जाते. ना. येरावारांकडील ऊर्जा खात्यातही अनेक पदे रिक्त आहेत. बदलीवर अधिकारी येण्यास तयार नाहीत. त्यातही सर्वाधिक वाईट अवस्था भूमिअभिलेख, अन्न व औषधी प्रशासन या खात्यांची आहे. ‘महसूल’चे अपयश दिसावे म्हणून भाजपाची तर त्यातील पदे रिक्त ठेवण्याची खेळी नसावी ना, असा सूरही ऐकायला मिळतो आहे.मंत्र्यांच्या वर्चस्वाच्या लढाईत जनतेचे हालभाजपा, शिवसेना मंत्र्यांच्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईत जिल्ह्यातील जनता मात्र होरपळली जात आहे. ऐन पाणीटंचाईच्या काळातही प्रशासकीय सपोर्ट मिळताना दिसत नाही. रिक्त पदे भरण्याबाबत जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारवर एकजुटीने दबाव वाढविल्याचे ऐकिवात नाही. विविध खात्यातील या रिक्त पदांचा विपरित परिणाम जिल्ह्यात सर्वदूर होत असून त्याचा त्रास सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे.