शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

वसुलीचा धडाका, पण वीज चोरीकडे महावितरणचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 21:38 IST

वीजचोरी आणि थकीत वसुलीसाठी वरिष्ठांनी इशारा देऊनही महावितरणचे वीज चोरीकडे दुर्लक्ष होत आहे. ग्राहकांनी वारंवार तक्रार करूनही महावितरणच्या कामात सुधारणा होत नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देडीपी उघड्या : ग्राहकांनी अनेकदा तक्रार करूनही लाभ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीजचोरी आणि थकीत वसुलीसाठी वरिष्ठांनी इशारा देऊनही महावितरणचेवीज चोरीकडे दुर्लक्ष होत आहे. ग्राहकांनी वारंवार तक्रार करूनही महावितरणच्या कामात सुधारणा होत नसल्याचे दिसून येत आहे.राज्यात विजेची मागणी शिगेला पोहोचली आहे. सोमवारी ही मागणी थेट २४ हजार ९६२ मेगावॅटवर पोहोचली होती. मात्र महावितरणकडे एवढ्या प्रमाणात वीज उपलब्ध नव्हती. परिणामी भारनियमन करण्यात आले. यात वसुली कमी असलेल्या जी-१ ते जी-३ गटातील वाहिन्यांवर तब्बल ९५० मेगावॅट विजेचे भारनियमन करण्यात आले. वसुली कमी असल्यामुळे भारनियमनाचा सामना करावा लागत असल्याने प्रामाणिक ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे अशा अनेक परिसरात नियमितपणे देयक भरणारे हजारो ग्राहक आहे. मात्र काही नागरिक वीज चोरी करीत असल्याने प्रामाणिक ग्राहकांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे.थकीत देयक वसुलीसाठी जोमाने प्रयत्न करणारी महावितरणची यंत्रणा तेवढ्याच जोरकसपणे वीजचोरी उघड करण्यात अपयश्ी ठरत आहे. उघड्या डीपीमधून जिल्ह्यात अनेक ठिकाणी थेट वीज चोरी सुरू आहे. ग्रामीण भागात थेट तारांवर आकोडे टाकून वीज चोरी केली जात आहे.खुद्द यवतमाळ श्हरातही जाम रोड परिसरातील जनकनगरी परिसरात वीज चोरी होत असल्याचा ग्राहकांचा दावा आहे. या परिसरात सतत विजेचा दाब कमी-जास्त होत असल्याने अनेक ग्राहकांच्या घरातील उपकरणे नादुरुस्त झाली आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारही केली. मात्र अद्याप उपाययोजना करण्यात आली नाही. या परिसरात उघड्या डीपीमधून वीज चोरी होत असल्याचे दिसून येत आहे. त्याकडेही महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने वीज चोरटे शिरजोर झाले आहे.संचालकांच्या इशाऱ्याला वाटाण्याच्या अक्षतामहावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी वसुली आणि चोरीकडे दुर्लक्ष करणाºयांवर कठोर कारवाईचा इशरा दिला. विशेष म्हणजे कमी वसुलीमुळे पुसद येथील अभियंत्याला निलंबितही करण्यात आले. त्याउपरही जिल्ह्यात वीज चोरी सुरू आहे. ग्राहकांना दर्जेदार सेवा देणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचेही खंडाईत यांनी स्पष्ट केले. मात्र ग्राहक सेवेत निष्काळजीपणा व कामचुकारपणा करणाºयांवर कारवाई केली जात नाही. जबाबदारी झटकणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रादेशिक संचालकांनी कारवाईचा इशारा दिला. त्यानुसार वीज चोरी पकडणे, तत्काळ जोडणी देणे, वीज चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू करण्याची गरज आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण