शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

रणेत्यांचा पुसद तालुकाच जलसंधारणात पिछाडीवर

By admin | Updated: April 16, 2017 01:12 IST

महाराष्ट्र राज्यात जलसंधारणासाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती करणारे पाणी अडवा, पाणी जिरवा हा मूलमंत्र देणारे जलसंधारणाचे प्रणेते ....

प्विदारक वास्तव : सुधाकरराव नाईकांच्या पुण्याईचा विसरपुसद : महाराष्ट्र राज्यात जलसंधारणासाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती करणारे पाणी अडवा, पाणी जिरवा हा मूलमंत्र देणारे जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा पुसद तालुकाच जलसंधारणात पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. दुष्काळी परिस्थितीच्या तोंडावर पुसद तालुक्यातील शासकीय अधिकारी अनास्था दाखवत आहेत. तर गावागावातील लोकप्रतिनिधींची अनास्था राहिल्याने जलसंधारणाच्या कामामध्ये तालुका मागे पडला आहे. आज अनेक गावांमध्ये ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने जलक्रांतीचे नवे पर्व उभे राहात असताना पुसद तालुक्यात मात्र जलसंधारणाच्या कामांचे तीनतेरा वाजले आहेत. माळपठार भागासह तालुक्यात टंचाई पाचवीलाच पुजलेल्या पुसद तालुक्याचे चित्र बदलण्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि जनतेने हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. पंचेविस वर्षापूर्वी या महाराष्ट्रात पहिल्यांदा जलसंधारण विभागाची निर्मितीचा मूलमंत्र देणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या पुसद तालुक्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिकांना जलसंधारणाचा जणू विसरच पडला की काय, अशी अवस्था आज पाहावयास मिळत आहे. अडीच वर्षांपूर्वी युती सरकारने सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र हे ब्रिद घेवून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानात पहिल्या वर्षी पुसद तालुक्यात दमदार सुरुवात करण्यात आली. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना अनेक गावांमध्ये राबविण्यात आली. दुसऱ्या वर्षी मात्र जलयुक्त शिवार अभियानाबाबत असलेला जोश ओसलेला दिसत आहे. लोकसहभाग कमी आणि जलसंधारणाच्या कामात ठेकेदारी बोकाळली. कामे निकृष्ट होऊ लागली. अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे यावर्षी तर पुसद तालुक्यात सगळीकडे आनंदी आनंदच दिसत आहे. शासनाचे सर्वच विभाग कोमात गेले आहेत. जी थोडीफार कामे सुरू आहेत, ती निकृष्ट दर्जाची होत आहे. अशा कामांच्या तक्रारीही येत आहेत. शासन स्तरावरुन लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)अधिकाऱ्यांचा निष्क्रिय कारभार चव्हाट्यावर पुसद तालुक्यातील गहुली गावाने राज्याला वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने दोन मुख्यमंत्री दिलेत. वसंतराव नाईक यांनी हरितक्रांतीचा मंत्र व सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणाचा मंत्र महाराष्ट्राला दिला. पण आज पुसद तालुक्यातील नागरिकांना हरितक्रांती व जलक्रांतीचा पूर्णत: विसर पडल्याचे वास्तव आहे. तालुक्यात कोणतेच अधिकारी सक्रिय होऊन काम करताना दिसत नाहीत. एकंदरीत जलसंधारणात पुसद तालुका पिछाडीवर गेला आहे.