शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
3
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
4
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
5
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
6
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
7
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
8
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
9
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
10
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
11
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
12
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
13
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
14
रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध होती...
15
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
16
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...
17
प्रेमासाठी बदललं जेंडर, पती निघाला फ्रॉड, पैसे-प्रॉपर्टीचा होता लालची, ट्रांसजेंडर अभिनेत्रीचा खुलासा
18
कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश
19
चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण
20
आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र

रणेत्यांचा पुसद तालुकाच जलसंधारणात पिछाडीवर

By admin | Updated: April 16, 2017 01:12 IST

महाराष्ट्र राज्यात जलसंधारणासाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती करणारे पाणी अडवा, पाणी जिरवा हा मूलमंत्र देणारे जलसंधारणाचे प्रणेते ....

प्विदारक वास्तव : सुधाकरराव नाईकांच्या पुण्याईचा विसरपुसद : महाराष्ट्र राज्यात जलसंधारणासाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती करणारे पाणी अडवा, पाणी जिरवा हा मूलमंत्र देणारे जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा पुसद तालुकाच जलसंधारणात पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. दुष्काळी परिस्थितीच्या तोंडावर पुसद तालुक्यातील शासकीय अधिकारी अनास्था दाखवत आहेत. तर गावागावातील लोकप्रतिनिधींची अनास्था राहिल्याने जलसंधारणाच्या कामामध्ये तालुका मागे पडला आहे. आज अनेक गावांमध्ये ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने जलक्रांतीचे नवे पर्व उभे राहात असताना पुसद तालुक्यात मात्र जलसंधारणाच्या कामांचे तीनतेरा वाजले आहेत. माळपठार भागासह तालुक्यात टंचाई पाचवीलाच पुजलेल्या पुसद तालुक्याचे चित्र बदलण्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि जनतेने हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. पंचेविस वर्षापूर्वी या महाराष्ट्रात पहिल्यांदा जलसंधारण विभागाची निर्मितीचा मूलमंत्र देणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या पुसद तालुक्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिकांना जलसंधारणाचा जणू विसरच पडला की काय, अशी अवस्था आज पाहावयास मिळत आहे. अडीच वर्षांपूर्वी युती सरकारने सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र हे ब्रिद घेवून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानात पहिल्या वर्षी पुसद तालुक्यात दमदार सुरुवात करण्यात आली. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना अनेक गावांमध्ये राबविण्यात आली. दुसऱ्या वर्षी मात्र जलयुक्त शिवार अभियानाबाबत असलेला जोश ओसलेला दिसत आहे. लोकसहभाग कमी आणि जलसंधारणाच्या कामात ठेकेदारी बोकाळली. कामे निकृष्ट होऊ लागली. अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे यावर्षी तर पुसद तालुक्यात सगळीकडे आनंदी आनंदच दिसत आहे. शासनाचे सर्वच विभाग कोमात गेले आहेत. जी थोडीफार कामे सुरू आहेत, ती निकृष्ट दर्जाची होत आहे. अशा कामांच्या तक्रारीही येत आहेत. शासन स्तरावरुन लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)अधिकाऱ्यांचा निष्क्रिय कारभार चव्हाट्यावर पुसद तालुक्यातील गहुली गावाने राज्याला वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने दोन मुख्यमंत्री दिलेत. वसंतराव नाईक यांनी हरितक्रांतीचा मंत्र व सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणाचा मंत्र महाराष्ट्राला दिला. पण आज पुसद तालुक्यातील नागरिकांना हरितक्रांती व जलक्रांतीचा पूर्णत: विसर पडल्याचे वास्तव आहे. तालुक्यात कोणतेच अधिकारी सक्रिय होऊन काम करताना दिसत नाहीत. एकंदरीत जलसंधारणात पुसद तालुका पिछाडीवर गेला आहे.