शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राळेगावात शेतकऱ्यांचे ५४ कोटी रुपये अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:00 IST

२० एप्रिलपर्यंत तूर विक्री करणाऱ्या ८३ शेतकऱ्यांचे ६५० क्विंटल तुरीचे ३७ लाख ७३ हजार रुपये नाफेडतर्फे सरळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी विकलेल्या तुरीचे पैसे अद्याप मिळालेले नाही. शेतीचा हंगाम सुरू झाला. पेरणी पूर्णत्वास गेली. कृषी हंगामासाठी मोठ्या आशेने नाफेडला तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांची यात अशी कोंडी झाली आहे.

ठळक मुद्देनाफेडची तूर खरेदी : शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्याचे हित

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : नाफेडची तूर खरेदी शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांच्या जास्त हिताची ठरली आहे. चालू हंगामात दोन हजार ७८७ तूर उत्पादकांनी विक्रीकरिता खरेदी विक्री संघात आवश्यक त्या कागदपत्रासह नोंदणी केली होती. १५ जून रोजी अखेरपर्यंत त्यातील एक हजार २९४ शेतकऱ्यांची दहा हजार २३ क्विंटल तुरीची खरेदी नाफेडतर्फे खरेदी विक्री संघाने केली.२० एप्रिलपर्यंत तूर विक्री करणाऱ्या ८३ शेतकऱ्यांचे ६५० क्विंटल तुरीचे ३७ लाख ७३ हजार रुपये नाफेडतर्फे सरळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी विकलेल्या तुरीचे पैसे अद्याप मिळालेले नाही. शेतीचा हंगाम सुरू झाला. पेरणी पूर्णत्वास गेली. कृषी हंगामासाठी मोठ्या आशेने नाफेडला तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांची यात अशी कोंडी झाली आहे.नोंदणी करूनही तब्बल एक हजार ४८३ शेतकऱ्यांनी नाफेडला पाठ दाखवून आपली तूर अन्यत्र विकली आहे. एका शेतकऱ्याची सरासरी दहा क्विंटल याप्रमाणे १५०० शेतकऱ्यांची १५ हजार क्विंटल तूर खुल्या बाजारात विकली गेली आहे. एका क्विंटलमागे शेतकऱ्यांना यात सरासरी एक हजार रुपये याप्रमाणे दीड कोटी रुपयांचा फटका बसून जबर नुकसान सोसावे लागले. मागच्या दाराने व्यापाऱ्यांना विकलेला हाच माल शेतकऱ्यांच्या नावे नाफेडकडे थोड्या अधिक प्रमाणात आला आहे. यंत्रणेतील त्रुटींमुळे शेतकऱ्यांना फटका बसला.येथील खविसंत दोन हजार ७८७ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती. एक हजार २९४ शेतकऱ्यांनी दहा हजार २३ क्विंटल तुरी नाफेडने खरेदी केली. एक हजार २०० शेतकऱ्यांचे ५४ कोटी रुपयांचे चुकारे अद्यापही येणे बाकी आहे. २० एप्रिलनंतर पासून विकलेल्या तुरीच्या चुकाऱ्याची प्रतीक्षा आहे, अशी माहिती खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक संजय जुमडे यांनी दिली.‘२४ तासातच चुकारे’ चा कायदा बासणातशेतकरी हिताच्या नावाच्या सहकारी संस्था, बाजार समिती, खरेदी विक्री संघ आहे. त्यावर पदाधिकारी, संचालक आहे. नाफेड आहे, जनप्रतिनिधी व शासन व्यवस्थेची निश्चित चाकोरी आहे. त्यांच्या यंत्रणेकडून कामे केली जातात. बाजार समितीचा शेतकऱ्यांना २४ तासात चुकारे देण्याचा कायदा आहे. पण शेतकऱ्यांच्या बाबतीत या सर्वांचे अनुकूल परिणाम दिसून येत नाहीत. वेळेवर चुकारे मिळत नाही, माल विकण्यात असंख्य प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी तोच तो पणा दिसून आला. मजुरांच्या हाताने चाळणी करविण्यात कालापव्यय करण्यात आला. कोट्यवधी रुपये उत्पन्न असणाऱ्या बाजार समितीत ग्रेन सेपरेटर आणले नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी