पावसाने पिके उद्ध्वस्त, तरीही पीक आणेवारी ५८ पैसे कशी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST2019-11-01T06:00:00+5:302019-11-01T06:00:14+5:30

शासकीय यंत्रणेने काढलेली पहिली नजर पीक आणेवारी ६५ पैसे एवढी होती. जनतेतून ओरड सुरू झाल्यानंतर ही आता सात पैशाने कमी करून ५८ वर आणण्यात आली आहे. ३१ आॅक्टोबरला ही पीक आणेवारी जाहीर झाली. ती सरसकट ५८ टक्के असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. आणेवारीचे हे आकडे म्हणजे बँकांना आपल्या कर्जवसुली मोहिमा सुरू करण्यास हिरवा कंदील असल्याचेही मानले जाते.

Rainfall ruins crops, how about 58 paise per acre? | पावसाने पिके उद्ध्वस्त, तरीही पीक आणेवारी ५८ पैसे कशी ?

पावसाने पिके उद्ध्वस्त, तरीही पीक आणेवारी ५८ पैसे कशी ?

मॅनेज असल्याची ओरड : बँकांना वसुलीची मुभा, गावागावांत रोष
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खरीप हंगामात निसर्गाची साथ न मिळाल्याने आधीच पीक परिस्थिती डबघाईस आली आहे. त्यातच आता परतीच्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यानंतरही शासनाने काढलेली सुधारित पीक आणेवारी ५८ वर कायम आहे. ते पाहता ही पीक आणेवारी मॅनेज असल्याची ओरड गावागावांतून होऊ लागली आहे.
शासकीय यंत्रणेने काढलेली पहिली नजर पीक आणेवारी ६५ पैसे एवढी होती. जनतेतून ओरड सुरू झाल्यानंतर ही आता सात पैशाने कमी करून ५८ वर आणण्यात आली आहे. ३१ आॅक्टोबरला ही पीक आणेवारी जाहीर झाली. ती सरसकट ५८ टक्के असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. आणेवारीचे हे आकडे म्हणजे बँकांना आपल्या कर्जवसुली मोहिमा सुरू करण्यास हिरवा कंदील असल्याचेही मानले जाते. आधीच शेतकऱ्यांची अवस्था वाईट असताना आणेवारीने त्यांच्या जखमेवर मीठ चोळले तर आता बँकांकडून पीक व मुदती कर्जाच्या वसुलीसाठी नोटीसा येण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये पहायला मिळते.
यापूर्वी नजर आणेवारी ६५ टक्के जाहीर झाली होती. या स्थितीचा बँकांनी फायदा घेत जिल्ह्यातील अनेक थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटीस बजावल्या. आता सुधारित पीक आणेवारी वास्तवाला धरुन कमी येईल असा अंदाज शेतकºयांचा होता. प्रत्यक्षात सरासरी पीक पैसेवारी ५८ टक्के निघाली आहे. यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहे. ५० पैशावर पैसेवारी असेल तर पीक स्थिती उत्तम असल्याचे संकेत असतात. सर्वच तालुक्यातील पीक स्थिती अहवालानुसार उत्तम आहे. यामुळे महसूल विभागाच्या अहवालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निघालेल्या सोयाबीनचे एकरी उत्पादन ६० ते ७० टक्क्यांनी घटले आहे.

सुधारित आणेवारी
यवतमाळ ५९ पैसे, कळंब ६५ पैसे, बाभूळगाव ५७ पैसे, आर्णी ५७ पैसे, दारव्हा ५६ पैसे, दिग्रस ५५ पैसे, नेर ५८ पैसे, पुसद ५८ पैसे, उमरखेड ६५ पैसे, महागाव ५७ पैसे, केळापूर ६० पैसे, घाटंजी ५६ पैसे, राळेगाव ५७ पैसे, वणी ५६ पैसे, मारेगाव ६२ पैसे तर झरी जामणी ५६ पैसे अशी सुधारित पैसेवारी जाहीर झाली आहे.

Web Title: Rainfall ruins crops, how about 58 paise per acre?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.