शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 05:00 IST

जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात साधारणपणे ६७४ मिमी पाऊस होतो. प्रत्यक्षात या तीन महिन्यात ७७९ मिमी सरासरी पाऊस कोसळला. हा पाऊस या तीन महिन्यांच्या सरासरी पावसाच्या तुलनेत ११५.५ टक्के इतका होता. ऑगस्टच्या मध्यंतरानंतर पावसाने काहीशी उघडीप दिली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मात्र, सप्टेंबरमध्ये पावसाचे पुन्हा जोरदार आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वरुणराजाने यंदाही बळीराजाला मोठा दिलासा दिला आहे. सप्टेंबरमध्येच जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. शनिवारपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या १०१.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये नऊ तालुक्यात १०० टक्क्यांहून अधिक पाऊस कोसळला आहे, तर सात तालुक्यांना अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. सर्वात कमी पाऊस राळेगाव आणि पुसद तालुक्यात झाला आहे. राळेगाव येथे ८०.७, तर पुसद येथे ८५.४ पाऊस शुक्रवारपर्यंत झाला आहे.यंदा जून महिन्यातच पावसाने दमदार हजेरी लावली. या महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी पेरणीला लागला. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात साधारणपणे ६७४ मिमी पाऊस होतो. प्रत्यक्षात या तीन महिन्यात ७७९ मिमी सरासरी पाऊस कोसळला. हा पाऊस या तीन महिन्यांच्या सरासरी पावसाच्या तुलनेत ११५.५ टक्के इतका होता. ऑगस्टच्या मध्यंतरानंतर पावसाने काहीशी उघडीप दिली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मात्र, सप्टेंबरमध्ये पावसाचे पुन्हा जोरदार आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारनंतर शुक्रवारीही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. यवतमाळ शहरात तासाभरात झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत यवतमाळ तालुक्यात सरासरी २१.१ मिमी पाऊस झाला आहे, तर वणी, मारेगाव, झरीजामणी तालुक्यालाही पावसाने चांगलेच झोडपले आहे. वणी तालुक्यात २२.३, मारेगाव २६.४, झरीजामणी ३९.६, केळापूर २२.५, तर घाटंजी तालुक्यात १३.२ मिमी पाऊस झाला आहे. दिग्रस, बाभूळगावसह आर्णी, राळेगावमध्येही पावसाचा जोर कायम होता. सर्वच तालुके पावसाळा संपण्यापूर्वी सरासरी ओलांडण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामात शेती सिंचनासाठी पाणी मिळण्याची अपेक्षा बळावली आहे. 

मंदिराच्या कळसावर कोसळली वीज

महागाव : तालुक्यातील काळी दाै. येथे शेतात व मंदिरावर वीज कोसळली. यात एक बैल ठार झाला, तर मंदिराच्या कळसाचे किरकोळ नुकसान झाले. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. तालुक्यात शनिवारी दुपारी अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. काही वेळातच जोरदार पावसाने हजेरी लावली. काळी दाै. येथे पावसामुळे ढगफुटीसारखी स्थिती निर्माण झाली होती. यावेळी शेतात वीज कोसळल्याने गोपाल चंदूसिंग राठोड यांचा एक बैल जागीच ठार झाला. गोपाल आणि दुसरा बैल थोडक्यात बचावले. मात्र हंगामात बैल ठार झाल्याने गोपाल राठोड यांचे ५० हजाराचे नुकसान झाले. दुसऱ्या घटनेत काळी दौ. येथील सामकी माता मंदिराच्या घुमटावर वीज कोसळली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र मंदिराच्या कळसाचे किरकोळ नुकसान झाले आहे.

शेती नुकसानीचे संकेतसततच्या ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढरी माशी या किडींनी हल्ला केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडायक्लोपिड १७.८ टक्के आणि एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के म्हणजे २० मिली प्रति दहा लिटर पाण्यात टाकून फवारावे.

निळोणा, चापडोह भरलेयवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा व चापडोह प्रकल्प १०० टक्के भरले आहे. दोन्ही प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दरम्यान, बेंबळा प्रकल्पात शनिवारी ८६.७६ टक्के, इसापूर प्रकल्पात ८३.२६ टक्के, अरुणावतीमध्ये ८९.४५ तर पूस प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा होता.

 

टॅग्स :Rainपाऊस