शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

पावसाळा संपताच रेतीघाट तस्करांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 5:00 AM

रेती घाट लिलाव झाल्यावर या रेतीघाटावर लिलाव घेणाऱ्यांची करडी नजर असते. त्यामुळे रेतीची तस्करी करणे कठीण असते. रेती लिलाव होण्यापूर्वीच हे रेती तस्कर चोरट्या मार्गाने या रेतीचा साठा करत आहे. मागील आठवड्यात १५ दिवस पाऊस कोसळला नाही. त्यामुळे काही रेती घाटापर्यंत पोहोचण्याचे मार्ग सुरू होताच, अंधाराचा फायदा घेत रेती तस्करांनी रेतीचा साठा करणे सुरू केले आहे. परंतु आणखी अचानक तालुक्यात पावसाचे आगमन झाल्याने रेती तस्करीला ‘ब्रेक’ लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : यावर्षी धो-धो कोसळणारा पाऊस कमी होताच तालुक्यातील रेती घाटावरील रेतीची तस्करी करण्याचे नियोजन रेती तस्करांनी आखले आहे. दोन आठवडे पाऊस गायब होताच, रेती तस्करीला सुरुवात झाली असून महसूल प्रशासन आणि पोलीस विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या सुमारास या रेती तस्करांकडून रेतीचा वारेमाप उपसा केला जात आहे. तालुक्यात वर्धा नदीवरील कोसारा, दांडगाव गाडेगाव आदी  ठिकाणी रेती घाट आहे, तर निर्गुडा नदी आणि इतर मोठ्या नाल्यांवरसुद्धा रेतीचे मुबलक साठे आहेत. गेल्यावर्षी शेवटच्या टप्प्यात जिल्हा प्रशासनाने या रेतीघाटाचे लिलाव करून हे रेती घाट तीन वर्षांच्या कालावधीनंतर खुले केले होते. यावर्षीसुद्धा तालुक्यातील सर्वच रेती घाट लिलाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रेती घाट लिलाव झाल्यावर या रेतीघाटावर लिलाव घेणाऱ्यांची करडी नजर असते. त्यामुळे रेतीची तस्करी करणे कठीण असते. रेती लिलाव होण्यापूर्वीच हे रेती तस्कर चोरट्या मार्गाने या रेतीचा साठा करत आहे. मागील आठवड्यात १५ दिवस पाऊस कोसळला नाही. त्यामुळे काही रेती घाटापर्यंत पोहोचण्याचे मार्ग सुरू होताच, अंधाराचा फायदा घेत रेती तस्करांनी रेतीचा साठा करणे सुरू केले आहे. परंतु आणखी अचानक तालुक्यात पावसाचे आगमन झाल्याने रेती तस्करीला ‘ब्रेक’ लागला आहे. रेतीला मिळणारे दर पाहता तस्कराची संख्या वाढली आहे. स्थानिक पुढारी राजकीय आश्रय मिळवत रेती तस्करीच्या व्यवसायात येत असल्याचे काही घटनांवरून उघड होत आहे. आगामी सणासुदीचे दिवस पाहता आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची व्यस्तता पाहता, या रेती चोरीला उधाण येण्याची शक्यता आहे. प्रशासकीय कर्मचारी  सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाणार असल्याने नेमका याचा फायदा उचलत मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

 शासनाने रेतीघाटांचा लिलाव करण्याची मागणी  - रेतीचा चढा दर आणि तस्करीतून होणारी कमाई पाहता, या व्यवसायात अनेकजण येत आहेत. जिल्हा प्रशासन या रेती घाटाचे लवकर लिलाव करत नसल्याने रेती तस्करीला चांगलाच वाव मिळत आहे. तालुका प्रशासनाने डोळ्यांत तेल घालून जरी या रेती घाटाचे रक्षण केले तरी रेती चोरीच्या घटना घडणारच आहेत. त्यात राजकीय दबाव प्रशासनावर येत असतो. त्यामुळे रेती तस्करी रोखताना  तालुका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. त्याचा परिणाम रेती लिलावाच्या रकमेवर होतो. त्यापेक्षा जिल्हा प्रशासनाने या रेती घाटाचे लवकर लिलाव करावे, अशी मागणी रेती घाट खरेदीदारांकडून होत आहे.

 

टॅग्स :sandवाळू