शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पुसद विषबाधा प्रकरणी आश्रमशाळेतील मुख्याध्यापकासह मदतनिसाच्या निलंबनाचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 13:24 IST

चौकशी समितीचा अहवाल, बकेटमधून शिळे अन्न वाढतानाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद

यवतमाळ : पुसद तालुक्यातील हुडी बु. येथील गिरीधारी महाराज विजाभज आश्रमशाळेच्या वसतिगृहातील ५४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समाज कल्याण उपायुक्तांनी तातडीने द्विसदस्यीय समितीची नियुक्ती केली होती. सोमवारी या समितीने आपला अहवाल उपायुक्तांकडे सादर केला. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना बकेटमधून शिळे अन्न वाढतानाचे दृश्य तपासणीवेळी सीसीटीव्हीमध्ये आढळले. समितीच्या अहवालानंतर मुख्याध्यापकासह मदतनिसाच्या निलंबनाचा प्रस्ताव अमरावतीच्या प्रादेशिक उपसंचालक इतर मागासवर्ग यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

पुसद तालुक्यातील हुडी बु. येथील गिरीधारी महाराज आश्रमशाळेतील ५४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार शुक्रवार ४ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आला होता. विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, पोटदुखी, डोकेदुखी आदी त्रास होऊ लागल्याने आश्रमशाळा परिसरातही एकच खळबळ उडाली. त्यावेळी तेथे असलेल्या मुख्याध्यापकांसह इतर शिक्षकांनी या सर्व विद्यार्थ्यांना पुसद शहरातील तीन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले होते. घटनेची माहिती समजल्यानंतर पालकांसह नागरिकांनीही या रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

शुक्रवारी सायंकाळपर्यंतच ५४ पैकी ४२ विद्यार्थ्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर शनिवारी उपचार सुरू असलेल्या १२ पैकी सात विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले होते. पाच विद्यार्थ्यांवर मात्र रुग्णालयातच उपचार सुरू होते. या सर्व विद्यार्थ्यांची आता प्रकृती चांगली आहे. दरम्यान, घटनेनंतर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिळे अन्न खाऊ घातल्याचा आरोप झाला होता.

या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी समाज कल्याण उपायुक्त भाऊराव चव्हाण यांनी दोन सदस्यीय समितीची स्थापना केली होती. पोलिस निरीक्षक आणि समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ लिपिकाने दोन दिवस पुसदमध्ये विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टरांशी चर्चा केली. तसेच अन्न व औषध प्रशासनाकडूनही अहवाल घेतला. त्यानंतर सोमवार ७ ऑगस्ट रोजी समाज कल्याण उपायुक्तांकडे आपला अहवाल सादर केला. अहवालामध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिळे अन्न खाऊ घातल्याचे स्पष्ट झाले आहे. चौकशी समिती सदस्यांनी आश्रमशाळेतील सीसीटीव्हीटीची तपासणी केली असता विद्यार्थ्यांना बकेटमध्ये ठेवलेले शिळे अन्न दुसऱ्या दिवशी सकाळी वाढल्याचे स्पष्ट झाले होते.

आता कारवाईकडे नजरा

विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना जेवण दिले त्यावेळी आश्रमशाळेतील कर्मचारी अत्यंत कमी संख्येने उपस्थित होते. समितीच्या या अहवालानंतर उपायुक्तांनी आश्रमशाळेतील मुख्याध्यापक आणि मदतनिसाच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला आहे. या प्रस्तावावर कुठली कारवाई केली जाते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रfood poisoningअन्नातून विषबाधाStudentविद्यार्थीYavatmalयवतमाळ