शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
3
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
4
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
5
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
6
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
7
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
8
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
9
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
10
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
11
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
12
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
13
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
14
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
15
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
16
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
17
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
18
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
19
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
20
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

दारव्हात शेतमालाची खासगी खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 23:39 IST

शहर तसेच ग्रामीण भागात खुलेआमपणे सुरू असलेली शेतमालाची खासगी खरेदी पूर्णत: बंद करण्यात आली. बाजार समितीच्या स्थापनेनंतर प्रथमच हा चमत्कार घडला असून या ऐतिहासिक निर्णयाचा शेतकरी आणि बाजार समितीला मोठा लाभ होणार आहे.

ठळक मुद्देऐतिहासिक निर्णय : सहायक निबंधकांचे प्रयत्न फळाला, शेतकऱ्यांना दिलासा

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शहर तसेच ग्रामीण भागात खुलेआमपणे सुरू असलेली शेतमालाची खासगी खरेदी पूर्णत: बंद करण्यात आली. बाजार समितीच्या स्थापनेनंतर प्रथमच हा चमत्कार घडला असून या ऐतिहासिक निर्णयाचा शेतकरी आणि बाजार समितीला मोठा लाभ होणार आहे.येथील सहाय्यक निबंधक प्रेम राठोड यांनी या बदलासाठी प्रयत्न केले. व्यापाºयांबाबत त्यांनी कठोर भूमिका घेतली. त्यामुळे आता सर्व शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार केवळ बाजार समितीच्या प्रांगणात होत आहे. १९२१ मध्ये येथे बाजार समितीच्या स्थापननंतर खरेदी-विक्रीचे व्यवहार मार्केट यार्डमध्ये सुरू झाले. मात्र बाहेरसुद्धा व्यापारी खरेदी करीत होते. कापूस उत्पादक पणन महासंघाचा एकाधिकार संपुष्टात आल्यानंतर बाजार समितीच्या ‘सेस’वर मोठा परिणाम झाला. तसेच इतर शेतमालाचीसुद्धा खरेदी बाहेर होत असल्याने बाजार समिती अडचणीत आली होती.अलीकडे व्यापाऱ्यांनी खुलोम दुकाने थाटून शेतमालाची खासगी खरेदी सुरू केली. बाजार समितीत एका दाण्याचासुद्धा व्यवहार होत नव्हता. याचा मोठा परिणाम शहराच्या बाजारपेठेवर झाला. खेडा खरेदीसुद्धा वाढली. खासगी खरेदीत शेतमालाचे दर आणि वजनात शेतकऱ्यांची लूट सुरू झाल्यानंतर खासगी खरेदी बंदसाठी भरपूर प्रयत्न झाले. मात्र हा प्रकार बंद करण्यात कुणालाही यश आले नाही.यावर्षी येथील सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) प्रेम राठोड यांनी कठोर भूमिका घेतली. त्यांनी प्रथम व्यापाऱ्यांच्या दुकानावर धडक देऊन त्यांचे रेकॉर्ड ताब्यात घेतले. तपासणी केली असता बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या रेकॉर्डमध्ये मोठी तफावत आढळली. नंतर त्यांनी खासगी खरेदी बंद करण्याचा विडा उचलला. सुरुवातीला बाजार समितीचे प्रशासक जी.एस.कुमरे यांच्यासह सर्व व्यापाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत खासगी दुकान व गोदाम बंद करून व्यापाऱ्यांनी मार्केट यार्डमध्येच शेतमालाची खरेदी करावी, खरेदी-विक्रीचे रेकॉर्ड ठेवावे, ट्रेडिंग कंपनीचे बोर्ड लावू नये, अशा सूचना दिल्या. यार्डमध्ये शेतमाल खरेदी करताना शेतकऱ्यांना २४ तासांत मालाचा चुकारा द्यावा, नियमानुसार हमाली, मापाई व तोलाई कपात करावी, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दिवसातून दोनदा हर्रास करावा, अशाही सूचना दिल्या. सूचनांचे पालन न झाल्यास कारवाईचा इशारा दिला.यानंतर राठोड यांनी दुकानांमध्ये सरप्राइज व्हिजीट तसेच ग्रामीण भागात दौरे करून खेडा खरेदी बंद केली. आता संपूर्ण व्यवहार बाजार समितीच्या यार्डमध्ये होत आहे. त्यामुळे शेतकºयांसह समितीला लाभ होत आहे. समितीचा सेसही वाढणार आहे.बाजार समितीला सेस, शेतमालाला भावशेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार बाजार समितीच्या यार्डमध्ये व्हायला लागल्यामुळे ‘सेस’मध्ये मोठी वाढ होणार आहे. मागीलवर्षी कापूस व धान्य मिळून केवळ पाच लाख २१ हजार ८५० रुपये सेसपोटी मिळाले. यावर्षी यात चौपट वाढ होऊन २० लाखांच्यावर सेस मिळेल, असे सांगीतले जाते. सोयाबीनला खुल्या बाजारात प्रति क्विंटल दोन हजार ५०० ते दोन हजार ६०० रुपये दर मिळत होता. आता लिलावात तीन हजार २०० रुपये दर मिळत आहे. कापूसही ४५०० रुपयांवरून ५६०० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या २८ महिन्यांपासून समितीच्या कर्मचाºयांचा पगार झाला नाही. मात्र आता समितीच्या उत्पन्नात वाढ होऊन हा प्रश्न मिटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती