सोयाबीनला बाजारात अवघ्या दीड हजारांचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 05:00 IST2020-10-15T05:00:00+5:302020-10-15T05:00:13+5:30
अतिपावसाने शेतकऱ्यांचे सोयाबीन ओलेचिंब झाले आहे. याला वाळविण्यासाठी उसंतही मिळत नाही. यामुळे हे सोयाबीन फुली येऊन काळे पडले आहे. तर काही सोयाबीनला कुबट वास सुटला आहे. यातून शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणला आहे. सोयाबीनला शासनाने तीन हजार ८८० रूपये क्विंटलचे हमी दर जाहीर केले आहेत. खुल्या बाजारात मात्र अवघा दीड हजारांपासून भाव सुरू होतो आहे. अधिकाधिक अर्थात चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला सव्वा तीन हजारांचा भाव मिळतो आहे.

सोयाबीनला बाजारात अवघ्या दीड हजारांचा भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पावसामुळे शेतातील आणि काढलेलेसुद्धा सोयाबीन भिजल्याचा फायदा उठवित खुल्या बाजारात व्यापार्यांनी सोयाबीनचे दर पाडले आहेत. अवघा दीड हजार रुपये क्विंटल भाव दिला जात असल्याने शेतकरी खुलेआम लुटला जातोय.
अतिपावसाने शेतकऱ्यांचे सोयाबीन ओलेचिंब झाले आहे. याला वाळविण्यासाठी उसंतही मिळत नाही. यामुळे हे सोयाबीन फुली येऊन काळे पडले आहे. तर काही सोयाबीनला कुबट वास सुटला आहे. यातून शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणला आहे.
सोयाबीनला शासनाने तीन हजार ८८० रूपये क्विंटलचे हमी दर जाहीर केले आहेत. खुल्या बाजारात मात्र अवघा दीड हजारांपासून भाव सुरू होतो आहे. अधिकाधिक अर्थात चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला सव्वा तीन हजारांचा भाव मिळतो आहे. यातून शेतकऱ्यांचा अवसानच गळाले आहे. शेतीचा खर्च निघणेही अवघड झाले आहे.
आसमानी संकटांसोबत शेतकऱ्यांना सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
जिल्ह्यात कपाशी पिकावर दहिया रोगाचे आक्रमण
सततच्या पावसाने कापसावर दहिया रोगाने आक्रमण केले आहे. यामुळे कपाशीची पाने पांढरी पडली आहेत. आता कपाशी काळवंडण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे कापसाच्या उत्पादनावर याचा परिणाम होणार आहे. कापसावरील उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार आहे. जिल्ह्यात पावणे पाच लाख हेक्टरवर कापसाचा पेरा आहे. अती पावसाने विविध किडींचे आक्रमण कापसावर होत आहे. यावर्षी दहिया रोगाने या कपाशीवर हल्ला चढविला आहे. यामुळे पाने पांढरी पडत आहेत. पातीगळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. यापूर्वी अतिपावसाने लागलेल्या पात्या गळाल्या होता. आता दहिया रोगाने कापूस पिकाला चांगलाच फटका बसला आहे. काही भागात लाल्याचा प्रकोप झाला आहे. शेतशिवार पावसाच्या प्रकोपाने हादरले आहे. शेतकऱ्यांनी तत्काळ उपाययोजना कराव्या असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे. दहिया रोगाचा प्रकोप सर्वत्र पहायला मिळत आहे. हा प्रकार पावसाने आणि वातावरण बदलाने झाला आहे. शेतकऱ्यांनी यावर वेळीच उपाययोजना कराव्या असा सल्ला येथील मध्य विदर्भ विभाग, कृषी विज्ञान केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी दिला.