शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मान्सूनपूर्व लागवडीने वाढतो गुलाबी बोंडअळीचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 18:01 IST

१५ मे रोजी बियाणे विक्री : कृषी विभागापुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड होते. यात कापसाचे सर्वाधिक उत्पन्न मिळावे, म्हणून शेतकरी मान्सूनपूर्व कापसाची लागवड करतात. याचवेळी गुलाबी बोंडअळीचे कोशमात्र आक्रमण करण्याचा धोका असतो. गुलाबी बोंडअळीचे चक्र भेदण्यासाठी १ जूननंतरच कापसाचे बियाणे विक्री करण्याचे आदेश होते. मात्र, यावर्षी १५ मेपासून कापूस बियाणे विक्रीच्या सूचना आहेत. यासोबतच १ जूननंतर कापूस लागवड करण्याचे आदेश कृषी विभागाने काढले आहेत.

प्रत्यक्षात शेतकरी कृषी विभागाच्या सूचनांचे पालन कितपत करतील, हा खरा प्रश्न आहेत. या सूचनांचे पालन न झाल्यास गुलाबी बोंडअळीचा जिल्ह्यात उद्रेक होण्याची चिन्ह आहेत. यातून शेतकऱ्यांना पुन्हा नव्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. 

जिल्ह्यात यावर्षी पाच लाख हेक्टरवर कापसाची लागवड होण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात कापसाच्या बियाण्याची उचल शेतकरी करणार आहेत. पेरणीच्या तोंडावर बाजारात बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होते. यामुळे शेतकरी पेरणी पूर्वीच बियाण्याची मोठ्या प्रमाणात उचल करणार आहेत. बियाणे खरेदी झाल्यामुळे पाऊस बरसताच शेतकरी पेरणीकरिता घाई करणार आहेत. अशा परिस्थितीत कापसाची लागवड मान्सूनपूर्व क्षेत्रावर होण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी केलेली लागवड कापसाचे उत्पादन घटीला कारणीभूत ठरण्याचा धोका आहे.

नियंत्रणासाठी १७ पथकेशेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कपाशिची लागवड होऊ नये, म्हणून खबरदारी घेण्याच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने १७ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. हे भरारी पथक शेतकऱ्यांच्या लागवडीवर नियंत्रण ठेवणार आहे. वेळेपूर्वी पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीच बोंडअळीच्या धोक्याचे पूर्व संकेत गुलाबा देणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळणार आहे. 

दोन हजार ४० गावांपुढे भरारी पथकही अपुरे पडणारदोन हजार ४० गावांवर नियंत्रण ठेवण्यासाठी १७ भरारी पथके अपुरे असणार आहे. यामुळे अशा सर्व ठिकाणी वाँच ठेवण्यासाठी कृषी विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गावोगावी कॅम्प घ्यावे लागणार आहे.

टॅग्स :cottonकापूसYavatmalयवतमाळfarmingशेतीFarmerशेतकरी