शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
3
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
4
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
5
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
6
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
7
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
8
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
9
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
10
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
11
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
12
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
13
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
14
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

मान्सूनपूर्व लागवडीने वाढतो गुलाबी बोंडअळीचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 18:01 IST

१५ मे रोजी बियाणे विक्री : कृषी विभागापुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड होते. यात कापसाचे सर्वाधिक उत्पन्न मिळावे, म्हणून शेतकरी मान्सूनपूर्व कापसाची लागवड करतात. याचवेळी गुलाबी बोंडअळीचे कोशमात्र आक्रमण करण्याचा धोका असतो. गुलाबी बोंडअळीचे चक्र भेदण्यासाठी १ जूननंतरच कापसाचे बियाणे विक्री करण्याचे आदेश होते. मात्र, यावर्षी १५ मेपासून कापूस बियाणे विक्रीच्या सूचना आहेत. यासोबतच १ जूननंतर कापूस लागवड करण्याचे आदेश कृषी विभागाने काढले आहेत.

प्रत्यक्षात शेतकरी कृषी विभागाच्या सूचनांचे पालन कितपत करतील, हा खरा प्रश्न आहेत. या सूचनांचे पालन न झाल्यास गुलाबी बोंडअळीचा जिल्ह्यात उद्रेक होण्याची चिन्ह आहेत. यातून शेतकऱ्यांना पुन्हा नव्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. 

जिल्ह्यात यावर्षी पाच लाख हेक्टरवर कापसाची लागवड होण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात कापसाच्या बियाण्याची उचल शेतकरी करणार आहेत. पेरणीच्या तोंडावर बाजारात बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होते. यामुळे शेतकरी पेरणी पूर्वीच बियाण्याची मोठ्या प्रमाणात उचल करणार आहेत. बियाणे खरेदी झाल्यामुळे पाऊस बरसताच शेतकरी पेरणीकरिता घाई करणार आहेत. अशा परिस्थितीत कापसाची लागवड मान्सूनपूर्व क्षेत्रावर होण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी केलेली लागवड कापसाचे उत्पादन घटीला कारणीभूत ठरण्याचा धोका आहे.

नियंत्रणासाठी १७ पथकेशेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कपाशिची लागवड होऊ नये, म्हणून खबरदारी घेण्याच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने १७ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. हे भरारी पथक शेतकऱ्यांच्या लागवडीवर नियंत्रण ठेवणार आहे. वेळेपूर्वी पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीच बोंडअळीच्या धोक्याचे पूर्व संकेत गुलाबा देणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळणार आहे. 

दोन हजार ४० गावांपुढे भरारी पथकही अपुरे पडणारदोन हजार ४० गावांवर नियंत्रण ठेवण्यासाठी १७ भरारी पथके अपुरे असणार आहे. यामुळे अशा सर्व ठिकाणी वाँच ठेवण्यासाठी कृषी विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गावोगावी कॅम्प घ्यावे लागणार आहे.

टॅग्स :cottonकापूसYavatmalयवतमाळfarmingशेतीFarmerशेतकरी