सत्तेची मस्ती, शेतकऱ्यांची जिंदगी झाली सस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST2019-08-31T06:00:00+5:302019-08-31T06:00:09+5:30

‘दुसकाय रे दुसकाय, विदर्भाचा दुसकाय, त्या दुसकायात इदर्भाचे येले सुरू, मुख्यमंत्री साहेब म्हणते हो समद बराबर करू, एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव’ या झडतीतून शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचीच बोलती बंद केली.

The power of the farmers, the life of the farmers became cheap | सत्तेची मस्ती, शेतकऱ्यांची जिंदगी झाली सस्ती

सत्तेची मस्ती, शेतकऱ्यांची जिंदगी झाली सस्ती

ठळक मुद्देपोळ्याची झडती : शेतकऱ्यांच्या व्यथा, राजकीय नेत्यांवर हल्लाबोल, मनातील खदखद व्यक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘सत्ताधाऱ्यांना चढली हो सत्तेची मस्ती, शेतकºयांची जिंदगी झाली हो सस्ती, कापसाचे बोंड अळीने पोखरले, शेतकरी मरतो हो विषाच्या फवारणीने, एक नमन कवडा पार्वती हर बोला हरहर महादेव’, यासारख्या अनेक झडत्यांनी यवतमाळचा बैलपोळा दणाणून गेला. येथील ऐतिहासिक आझाद मैदानात भरलेल्या बैल पोळ्यात शुक्रवारी दुपारी शेतकऱ्यांनी झडत्यांच्या माध्यमातून आपली व्यथा मांडत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
स्थानिक आझाद मैदानात बैल पोळा पार पडला. पंचक्रोशीतील बैलजोड्या या ठिकाणी आल्या. यावर्षी ९४ बैल जोड्यांनी पोळयाच्या उत्सवात हजेरी लावली होती. सुदृढ बैल व सजावटींना बक्षीस वितरित करण्यात आले.
या स्पर्धेत संजय मादेशवार यांच्या बैलजोडीला १५ हजारांचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. अंकुश बगमारे यांच्या बैलजोडीने १० हजाराचे दुसरे, दीपक सुुलभेवार यांच्या बैलजोडीने सात हजारांचे तिसरे, नामदेव अवथळे यांच्या बैलजोेडीने पाच हजारांचे चौथे, तर पिंटू ठाकरे यांच्या बैलजोडीने तीन हजारांचे पाचव्या क्रमांकाचे बक्षीस पटकाविले.
रमेश यमसनवार, अविनाश ठाकरे, राजेश ठाकरे, दिनेश तिवडे, अजय रापर्तीवार यांच्या बैलजोडींना प्रोत्साहनपर बक्षिसाच्या स्वरूपात दोन हजार रूपयांचा रोख इनाम मिळाला. इतर बैलजोडी मालकांना धोतरजोडी आणि टोपी देऊन सन्मानित करण्यात आले. त्री सदस्यीय समितीने बैलजोडींचे परीक्षण केले. समितीत अ‍ॅड.रवींद्र भुमरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.वाटाणे, डॉ.चव्हाण, अ‍ॅड.जयसिंग चव्हाण यांचा समावेश होता.
यावेळी बांधकाम सभापती विजय खडसे, नगरसेवक नित्यानंद गिरी, गजानन इंगोले, बबलू देशमुख, उद्धवराव साबळे, पंकज देशमुख, विशाल पावडे, वैशाली कनाके, शुभांगी हातगावकर, संगीता कासार, सुषमा राऊत, नीता धावतोडे उपस्थित होत्या.
पोळ्यात दारव्हा तालुक्याच्या बोरीअरब येथील नितीन कोल्हे यांच्या झडतीचे वाचन करण्यात आले. बबलू देशमुख, अशोक भुतडा यांच्यासह शेतकऱ्यांनी विविध झडत्या सादर केल्या. या झडत्यांनी पोळ्याच्या उत्सवात रंगत भरली. झडत्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सत्तादाऱ्यांवर आसूड ओढले.

झडतीतून मुख्यमंत्र्यांवर साधला नेम
‘दुसकाय रे दुसकाय, विदर्भाचा दुसकाय, त्या दुसकायात इदर्भाचे येले सुरू, मुख्यमंत्री साहेब म्हणते हो समद बराबर करू, एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव’ या झडतीतून शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचीच बोलती बंद केली. एकापेक्षा एक सरस आणि शेतकऱ्यांच्या विदारक स्थितीवर झडत्या सादर करून शेतकऱ्यांनी आपली खंत व्यक्त केली.

Web Title: The power of the farmers, the life of the farmers became cheap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी