शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

युवा शेतकऱ्याने मागितली आत्मदहनाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 3:00 PM

राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शेतातील पाणी वाहून जाण्याची नाली बुजली. त्यामुळे शेतात साचून राहात असलेल्या पाण्यामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आले. अखेर तरोडा (ता.आर्णी) गावातील युवा शेतकऱ्याने आत्मदहनाची परवानगी मागितली आहे.

ठळक मुद्दे तरोडा येथे पिकांची नासाडी, प्रशासनाचे दुर्लक्षमहामार्गामुळे शेतात पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शेतातील पाणी वाहून जाण्याची नाली बुजली. त्यामुळे शेतात साचून राहात असलेल्या पाण्यामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आले. अखेर तरोडा (ता.आर्णी) गावातील युवा शेतकऱ्याने आत्मदहनाची परवानगी मागितली आहे.नयनेश सुनील भोयर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे ३.५ एकर शेतजमीन आहे. या शेतातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ गेला आहे. या मार्गाच्या कामामुळे शेतातून पाणी वाहून जाण्याची नाली बंद झाली. पाण्याचा निचरा होत नाही. याशिवाय लगतच्या काही शेतातील पाणीही त्यांच्याच शेतात येऊन साचते.नाली बंद झाल्याने शेतात पाणी साचून नुकसान होईल, ही भीती नयनेश भोयर याने उपविभागीय अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला एप्रिलमध्येच पूर्वसूचना देऊन व्यक्त केली होती. या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी या शेतकºयाचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. नयनेशच्या वडिलांचे निधन झाले असल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी तो पार पाडत आहे. अडचणीतून मार्ग काढत असतानाच यावर्षी त्यांच्या पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांनी आत्मदहनाची परवानगी मागितली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी