शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

यवतमाळातील बेघरांच्या स्वप्नाला पुन्हा घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 15:23 IST

२०१५ पासून शहरात राबविली जाईल अशी घरकूल योजना डिसेंबर २०२१ मध्येही प्रत्यक्ष सुरू झालेली नाही. आता आणखी अधिकृत मान्यतेचा कागद हाती येण्यासाठी किती वेळ लागेल याचे उत्तर पालिका प्रशासनाकडे नाही.

ठळक मुद्देघरकुलाचा प्रस्ताव केंद्रीय समितीकडे तीन हजार ५५६ घरांच्या प्रकल्पाचा तिढा

सुरेंद्र राऊत

यवतमाळ : शहरातील बेघरांना हक्काचे घर मिळावे, अतिक्रमण करून झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांना पक्के घर द्यावे यासाठी ९ डिसेंबर २०१५ पासून घरकुल योजना राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, डिसेंबर २०२१ मध्येही घराचे बांधकाम कधी होईल हे ठामपणे कोणीच सांगू शकत नाही. अनेकांनी गरिबांना भूलथापा देऊन शिबिर, मेळावे घेऊन राजकीय पोळी शेकली. मात्र, सहा वर्षांतही साडेतीन हजार घरकुलांचे स्वप्न वास्तवात उतरले नाही.

नगरपरिषदेकडे घरकुल बांधण्यासाठी हक्काची ट्रक टर्मिनल्सची ३५४०० चौरस मीटर जागा नागपूर रोडवर आहे. तर महसूल विभागाची जागा वडगाव परिसरात असून तेथे दोन भूखंड प्रस्तावित आहेत. अद्याप हे भूखंड नगरपालिकेकडे हस्तांतरित झाले नाहीत. त्यामुळे त्यावर बांधल्या जाणाऱ्या २५८३ घरांचा प्रस्ताव अजूनही अधांतरीच आहे.

सुरुवातीला हे घर खासगी कंत्राटदारांकडून बांधून घेण्याचे नियोजन होते. मात्र, कंत्राटदारांनी यात रस दाखविला नाही. निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर म्हाडा अंतर्गत असलेल्या महाहाऊसिंगमार्फत ही योजना पूर्ण करण्याचे ठरले. महाहाऊसिंगकडे घरकुल बांधकामाचा प्रस्ताव सादर झाला. मात्र, दिल्लीतील केंद्रीय सनियंत्रण मान्यता समितीने इएसआर (स्टँडर्ड शेड्यूल रेट) निश्चित केले नाही. त्यामुळे हा प्रस्ताव पुन्हा महाहाऊसिंगच्या निर्देशावरून नगरपालिकेने केंद्रीय सनियंत्रण मान्यता समिती दिल्ली यांच्याकडे पाठविला.

सप्टेंबर महिन्यात समितीची बैठक झाली. या बैठकीत यवतमाळ नगरपालिकेच्या घरकुल प्रस्तावाला मान्यता मिळाल्याची तोंडी माहिती आली. डिसेंबरपर्यंत सीएसएमसीच्या बैठकीतील मान्यतेचे अधिकृत पत्र प्राप्त झालेले नाही. त्यामुळे महाहाऊसिंग अजूनही घरकुल बांधकामाचे काम सुरू करू शकत नाही. एकंदरच ९ डिसेंबर २०१५ पासून शहरात राबविली जाईल अशी घरकूल योजना डिसेंबर २०२१ मध्येही प्रत्यक्ष सुरू झालेली नाही. आता आणखी अधिकृत मान्यतेचा कागद हाती येण्यासाठी किती वेळ लागेल याचे उत्तर पालिका प्रशासनाकडे नाही.

गरिबांच्या स्वप्नांशी खेळ

घरकुल मिळवून देतो, असे म्हणत काहींनी शहरात अक्षरश: शिबिर लावून नावांची नोंदणी केली. आता यालाही जवळपास चार वर्षे लोटली आहेत. ज्या केंद्र शासनाच्या समितीकडे मान्यतेचा प्रस्ताव रखडला आहे. त्यासाठी कोणी पाठपुरावा करताना दिसत नाही. महसुलाची जागा नगरपालिकेला हस्तांतरितच झाली नाही. त्यामुळे नगरपालिकेच्या हक्काच्या भूखंडावर प्रस्तावित असलेली ९७३ घरे तरी पूर्ण होतील काय, असा प्रश्न कायम आहे.

टॅग्स :GovernmentसरकारHomeसुंदर गृहनियोजन