येथील नगरपरिषदेत शासनाकडूनप्राप्त विकास निधी प्रशासकीय दिरंगाईमुळे अखर्चित असून याबाबत नगराध्यक्ष नयना शैलेश ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ...
शहरात थोडासा जरी पाऊस जरी पडला, तरी पूर येणाऱ्या लेंडी नाल्याने १५ व १६ आॅगस्टला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शहरवासीयांना वेठीस धरले. त्यामुळे दारव्हा शहरावरील लेंडी नाल्याचे संकट कधी टळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
जिल्ह्यात बुधवारपासून अविश्रांत कोसळणाऱ्या पावसाने तब्बल २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. आर्णी, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, उमरखेड, महागाव या सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अस्मानी संकटाने तब्बल ३ हजार ७८५ घरांची पडझड झाली. ...
गेल्या ३१ महिन्यांत राळेगाव तालुक्यातील १० व केळापूर तालुक्यातील दोन अशा, १२ नागरिकांचे वाघाने बळी घेतले. या दोन तालुक्यातील १६ गावांतील २० हजार ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत आहे. या वाघाचा पाच ते सात हजार हेक्टर जंगल क्षेत्रात वावर आहे. ...
तालुक्यात अतिवृष्टीमुळे ६५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आंदाज आहे. तालुक्यात तब्बल १९४ जनावरे दगावली असून १३७२ घरांची पडझड झाली आहे. पुरामुळे २४८ कुटुंबे बाधीत झाली आहे. ...
प्रधानमंत्री आवास योजनेतून बेघरांना घरे मिळावित यासाठी नगरपरिषदेकडून सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. याला यश प्राप्त झाले आहे. राज्य व केंद्रीय स्तरावरच्या उच्चाधिकार समितीने मान्यता दिल्यामुळे वडगाव रोड येथे घरकूल बांधण्यासाठी महसूल विभागा ...
महिनाभराच्या विश्रांतीनंतर बुधवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने जिल्हा आनंदाने भिजला होता. मात्र पावसाचा मुक्काम शुक्रवारी रात्रीपर्यंत वाढल्याने माणसे बेघर झाली. आर्णी, दिग्रस, दारव्हा शहरात पुराचा वेढा पडला. उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा, नेर, महागाव त ...
कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्याच्या तपासावर आता अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचाही वॉच राहणार आहे. अलिकडेच या कार्यालयाने ‘एसआयटी’च्या तपास अधिकाऱ्यांला अमरावतीमध्ये पाचारण करून तपासातील प्रगतीची अपडेट माहिती घेतली होती. ...
आर्णी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे रस्ते ठप्प झाले होते. राणीधानोरा येथे रुग्णवाहिकेतच एका महिलेची प्रसुती करण्याचा प्रसंग डॉक्टरांवर ओढवला. अशा बिकट परिस्थितीत त्यांनी प्रसंगावधान राखत तिची सुखरुप प्रसुती केली. ...
गेल्या तीन दिवसांपासून संततधारेने यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीसह काही तालुक्यांना झोडपून काढले आहे. बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अरुणावती धरणातील पाण्याची पातळी ६८ टक्क्यांवर गेल्यामुळे या तालुक्यातील नागरिकांनी गुरुवारची रात्र अक् ...