नरभक्षी वाघिणीची राळेगाव, कळंब तालुक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. चौदा जणांचे बळी घेणाºया वाघिणीमुळे शेतकऱ्यांचे शेतात जाणे बंद झाले आहे. यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील पीक करपले आहे. ...
सोयाबीनच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास बोरगाव लिंगा येथे घडली. या परिसरात सोयाबीनच्या गंजीला आग लावण्याची पाच वर्षातील नववी घटना आहे. ...
राज्य सरकारमध्ये सहभागी पक्षांनी निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जवाब दो’ पदयात्रा काढली जाणार आहे. ...
कोट्यवधी रुपयांची अवैध सावकारी चालणाऱ्या यवतमाळातून आता हवाला मार्गे मुंबई व गुजरातमध्ये दरदिवशी किमान दोन कोटी रुपये पाठविले जात असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. ...
खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांना इमारत भाड्याचे अनुदान देण्यासाठी सरकार टाळाटाळ करीत आहे. सरकार आणि संस्थाचालकांच्या या दुर्लक्षाचा फटका मात्र शिक्षकांना बसत आहे. ...
हंगामाच्या सुरूवातीला शेतकऱ्यांना व्याजाने पैसे द्यायचे, हे पैसे देताना विना रकमेचे स्वाक्षरीचे धनादेश घ्यायचे, शेतातील माल हाती आला की, संबंधित शेतकऱ्यांना हेरून त्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे आपले धान्य विकण्यासाठी बाध्य करायचे. ...
शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तालुक्यातील १८ गावांत विविध कामे घेण्यात आली. यातून ही गावे आता पाणीटंचाईमुक्त झाली आहे. तालुक्यात जलयुक्त शिवारअंतर्गत ३२३ कामे पूर्णत्वास गेली आहे. ...