निसर्गाच्या लहरीपणाने व दुष्काळामुळे राज्यातील १४ हजार हेक्टरवरील फळबागा नष्ट झाल्याचा धक्कादायक अहवाल शासनाने सादर केला. यात सर्वाधिक नुकसान विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे. ...
तलाठी व शेतकरी यांचे नाते अत्यंत दृढ असते. गाव पातळीवर तलाठी अनेक कामे करतात. त्यांच्याकडून विविध प्रमाणपत्रे घ्यावी लागतात. मात्र अनेक ठिकाणी तलाठ्यांकडून आर्थिक लूट केली जाते, अशी ओरड असते. ...
रस्ता दयनीय असल्याचे कारण देत समग्र शिक्षा अभियानाची एसटी बस विद्यार्थिनींना चक्क जंगलात सोडून परत गेली. ही घटना तालुक्यातील करंजखेड येथे बुधवारी सायंकाळी उघडकीला आली. करंजखेड येथील अनेक विद्यार्थिनी महागावला शिक्षणासाठी येतात. ...
शहरामध्ये शंभर वर्ष जुन्या इमारती आहे. यातील काही इमारती चांगल्या अवस्थेत आहेत. तर काही इमारतींना तडे गेले आहेत. काही तिरप्या झाल्या आहेत. काही इमारतींवर अक्षरश: झाडे उगवले आहेत. विशेष म्हणजे पोलीस वसाहतीचा बहुमजली इमारतींमध्ये हा प्रकार दिसून येतो. ...
बहुप्रतिक्षीत दमदार पावसाचे अखेर सोमवारी वणी उपविभागात आगमन झाले. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. सोमवारी दुपारपासून बरसत असलेल्या या पावसामुळे मंगळवारी वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा या चारही तालुक्यात पूरपरिस्थीती निर्माण झाली आहे. ...
महसूल कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन छेडले आहे. यवतमाळातही कर्मचाºयांनी मंगळवारी काळ्या फिती लावून काम केले. नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देऊनही ग्रेड पे मात्र वर्ग तीनचा दिला आहे. ...
यावर्षी जिल्ह्यात धुवाधार पावसाने हजेरीच लावली नाही. यामुळे नदी, नाल्यांना पूर गेला नाही. जिल्ह्यातील पावसाची सरासरी २० ते २५ मिमीच्याच आसपास राहिली आहे. सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. यामुळे सरासरी ३६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली ...