शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

वणी उपविभागात बोंडअळीचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 5:00 AM

ऐन सोयाबीनला शेंगा फुटण्याच्यावेळी पावसाला आरंभ झाला. हा पाऊस पुढे अनेक दिवस कायम होता. परिणामी शेंगात दाणे भरल्यानंतर या पावसामुळे दाण्यांना अंकुर फुटले. सोयाबीनने रंग बदलला. ज्या शेतात एकरी १० क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न होेणे अपेक्षित होते. त्या शेतात एकरी ८० किलो ते एक क्विंटलपर्यंत सोयाबीनचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती पडले. कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला.

ठळक मुद्देसोयाबीनची झाली माती : यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी ठरतोय मारक, पीक वाचविण्यासाठी केली जातेय धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच वणी उपविभागातील शेतकरी संकटात सापडला आहे. अती पावसाने सोयाबीनची माती झाली. आता कापसावरही बोंडअळीने आक्रमण केल्याने शेतकरी कमालिचा हतबल झाला आहे. यंदा हे दोनही नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.वणी तालुक्यासह मारेगाव, झरी तालुक्यात बोंडअळीने दस्तक दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कपाशीवर बोंडअळीचा हल्ला होत आहे. यंदा मात्र त्याचे स्वरूप अतिशय तीव्र आहे. त्यामुळे जो कापूस फुटून आहे, तेवढाच कापूस शेतकऱ्यांच्या हाती येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उर्वरित कापसाची बोंडे गुलाबी अळ्या पोखरत आहे. निसर्गाच्या या संकटाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहेत. यावर्षी परतीच्या पावसाने विलंब केला.ऐन सोयाबीनला शेंगा फुटण्याच्यावेळी पावसाला आरंभ झाला. हा पाऊस पुढे अनेक दिवस कायम होता. परिणामी शेंगात दाणे भरल्यानंतर या पावसामुळे दाण्यांना अंकुर फुटले. सोयाबीनने रंग बदलला. ज्या शेतात एकरी १० क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न होेणे अपेक्षित होते. त्या शेतात एकरी ८० किलो ते एक क्विंटलपर्यंत सोयाबीनचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती पडले. कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला. कापूस विकून कर्जाची परतफेड करू, अशी स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र बोंडअळीने निराशा केली. परतीच्या पावसाने अनेक शेतातील फुटलेला कापूस ओला झाला. ओला कापूस बाजारात नेऊन विकताना व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची अक्षरश: लुट सुरू केली. शेतकऱ्यांची सध्या तरी केवळ एकच वेचाई झाली आहे. उर्वरित प्रत्येक बोंडात गुलाबी बोंडअळीने शिरकाव केला. ह्या अळ्या आता कापसाची बोंडे पोरखत आहे. या अळ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकर प्रयत्न करित असले तरी त्यात फार यश येत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात बोंडअळीने हल्ला केल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे यंदा कापूस उत्पादनातही घट येण्याची शक्यता आहे.मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्याएकीकडे सोयाबीनचे पीक शेतातच सडले. दुसरीकडे कापूस पिकावर बोंडअळीने हल्ला केला. जो कापूस निघाला, तो वेचण्यासाठीही मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे अडचणी वाढल्या आहे. दरवर्षी वणी, झरी व मारेगाव या तालुक्यांमध्ये चंद्रपूर, नांदेड व अन्य जिल्ह्यातून मजूर हंगामासाठी येतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे मजुरांनी या भागात पाठ फिरविली आहे. परिणामी स्थानिक मजुरांचे भाव वधारले असून विनंत्या, आर्जव करूनही स्थानिक मजूर काम करण्यासाठी शेतात येत नसल्याचे शेतकरी सांगतात.

टॅग्स :agricultureशेती