शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
2
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
3
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
4
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
5
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
6
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
7
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
8
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
9
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
10
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
11
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
12
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
13
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
14
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
15
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
16
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
17
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
18
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
19
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
20
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

आता प्रभाग रचनेतील राजकीय हस्तक्षेपाला बसणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:44 IST

-आराखड्याच्या पध्दतीत बदल, गोपनीयता, नियम पाळण्याच्या सुचना आयोगाची कठोर भूमिका : आराखड्याच्या पद्धतीत बदल, गोपनीयता पाळण्याच्या सूचना मुकेश इंगोले ...

-आराखड्याच्या पध्दतीत बदल, गोपनीयता, नियम पाळण्याच्या सुचना

आयोगाची कठोर भूमिका : आराखड्याच्या पद्धतीत बदल, गोपनीयता पाळण्याच्या सूचना

मुकेश इंगोले

दारव्हा : नगरपरिषद निवडणूक प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याच्या पद्धतीत बदल करीत गोपनीयता आणि नियमांचे पालन करण्याच्या स्पष्ट सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहे. आयोगाच्या कठोर भूमिकेमुळे आता प्रभाग रचनेतील राजकीय हस्तक्षेपाला चाप बसेल, असे बोलले जात आहे.

यापूर्वी नगरपरिषदेकडून आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जायचा. तेथे हरकतीनुसार दुरुस्तीची प्रक्रिया पाडल्यानंतर विभागीय आयुक्त स्तरावर प्रभागाला अंतिम मंजुरात मिळायची; परंतु आराखडा तयार करताना गोपनीयता व नियमांचे पालन होत नसल्यामुळे हरकती व रिट याचिकांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला.

डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. आता बहुसदस्यीय प्रभागऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आल्याने नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे. त्यासाठी २०११ च्या जनगणनेनुसार २३ ऑगस्टपासून कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना आहे. प्रभाग रचना करताना गोपनीयता राखली जावी, नियमांचे पालन करावे, असे आदेश आहे. यापूर्वी असे न झाल्याने प्रारूप प्रभाग रचनेविरुद्ध हरकती व रिट याचिकांची संख्या वाढली. त्यामुळे अकारण उद्भवणारे न्यायालयीन प्रकरणे, विलंब टाळणे आवश्यक आहे.

क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून अनेकदा चुका होतात. राजकीय दबावाला बळी पडून चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना केली जाते, असे निदर्शनास आल्याचे आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. कच्चा आराखडा कसा, का तयार करण्यात आला, नियम व निकषांचे पालन झाले का, याची तपासणी केली जाईल. तपासणीत आढळलेल्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

अ आणि ब वर्ग नगरपालिका राज्य निवडणूक आयुक्त, तर क वर्ग नगरपालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेस विभागीय आयुक्त मान्यता देणार आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना राजकीय हस्तक्षेप टाळून नियमानुसार प्रभाग रचना करणे बंधनकारक असणार आहे.

बाॅक्स

सोयीनुसार रचनेला बसणार झटका

नवीन प्रभाग रचना करताना क्षेत्र समाविष्ट करणे, वगळताना भौगोलिक बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. यापूर्वी राजकीय पक्ष, नगरसेवक, इच्छुक उमेदवार, स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्या सोयीनुसार प्रभागात बदल करून घेण्याचे प्रकार घडले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी योग्य प्रभाग रचना होत नव्हती. आता या निर्णयामुळे सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.