शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
5
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
6
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
7
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
8
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
9
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
10
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
11
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
12
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
13
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
14
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
15
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
16
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
17
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
18
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
19
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
20
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा

आता प्रभाग रचनेतील राजकीय हस्तक्षेपाला बसणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:44 IST

-आराखड्याच्या पध्दतीत बदल, गोपनीयता, नियम पाळण्याच्या सुचना आयोगाची कठोर भूमिका : आराखड्याच्या पद्धतीत बदल, गोपनीयता पाळण्याच्या सूचना मुकेश इंगोले ...

-आराखड्याच्या पध्दतीत बदल, गोपनीयता, नियम पाळण्याच्या सुचना

आयोगाची कठोर भूमिका : आराखड्याच्या पद्धतीत बदल, गोपनीयता पाळण्याच्या सूचना

मुकेश इंगोले

दारव्हा : नगरपरिषद निवडणूक प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याच्या पद्धतीत बदल करीत गोपनीयता आणि नियमांचे पालन करण्याच्या स्पष्ट सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहे. आयोगाच्या कठोर भूमिकेमुळे आता प्रभाग रचनेतील राजकीय हस्तक्षेपाला चाप बसेल, असे बोलले जात आहे.

यापूर्वी नगरपरिषदेकडून आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जायचा. तेथे हरकतीनुसार दुरुस्तीची प्रक्रिया पाडल्यानंतर विभागीय आयुक्त स्तरावर प्रभागाला अंतिम मंजुरात मिळायची; परंतु आराखडा तयार करताना गोपनीयता व नियमांचे पालन होत नसल्यामुळे हरकती व रिट याचिकांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला.

डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. आता बहुसदस्यीय प्रभागऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आल्याने नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे. त्यासाठी २०११ च्या जनगणनेनुसार २३ ऑगस्टपासून कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना आहे. प्रभाग रचना करताना गोपनीयता राखली जावी, नियमांचे पालन करावे, असे आदेश आहे. यापूर्वी असे न झाल्याने प्रारूप प्रभाग रचनेविरुद्ध हरकती व रिट याचिकांची संख्या वाढली. त्यामुळे अकारण उद्भवणारे न्यायालयीन प्रकरणे, विलंब टाळणे आवश्यक आहे.

क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून अनेकदा चुका होतात. राजकीय दबावाला बळी पडून चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना केली जाते, असे निदर्शनास आल्याचे आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. कच्चा आराखडा कसा, का तयार करण्यात आला, नियम व निकषांचे पालन झाले का, याची तपासणी केली जाईल. तपासणीत आढळलेल्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

अ आणि ब वर्ग नगरपालिका राज्य निवडणूक आयुक्त, तर क वर्ग नगरपालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेस विभागीय आयुक्त मान्यता देणार आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना राजकीय हस्तक्षेप टाळून नियमानुसार प्रभाग रचना करणे बंधनकारक असणार आहे.

बाॅक्स

सोयीनुसार रचनेला बसणार झटका

नवीन प्रभाग रचना करताना क्षेत्र समाविष्ट करणे, वगळताना भौगोलिक बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. यापूर्वी राजकीय पक्ष, नगरसेवक, इच्छुक उमेदवार, स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्या सोयीनुसार प्रभागात बदल करून घेण्याचे प्रकार घडले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी योग्य प्रभाग रचना होत नव्हती. आता या निर्णयामुळे सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.