शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पोत्याने नव्हे, किलोने विकण्याची वेळ

By admin | Updated: October 13, 2014 23:28 IST

अपुरा पाऊस आणि किडींच्या प्रादुर्भावाने यंदा सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट होत आहे. यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीन पोत्याने नव्हे तर किलोने विकण्याची वेळ आली आहे.

उताऱ्यात घट : अपुरा पाऊस आणि किडींचा परिणामपुसद : अपुरा पाऊस आणि किडींच्या प्रादुर्भावाने यंदा सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट होत आहे. यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीन पोत्याने नव्हे तर किलोने विकण्याची वेळ आली आहे. निघत असलेल्या सोयाबीनमधून मजुरीही निघत नाही. पुसद तालुक्यात दोन धरणे असूनही माळपठार परिसर आवर्षणग्रस्तच आहे. डोंगर-दऱ्यात वसलेल्या तालुक्यात हलक्या प्रतिची जमीन आहे. त्यामुळे या जमीनीत तसेही उत्पन्न कमीच येते. असे असले तरी यंदा तर अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनला मुकावे लागले आहे. अत्यल्प पावसाने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. पेरणी केल्यानंतर पावसाने दीर्घ दडी मारली. पिके सुकायला लागली होती. उडीद, मुंग शेतकऱ्यांच्या हातचे गेले. पोळ््यापासून पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आठ-दहा दिवस पाऊस पडला. खरीप पिकांना जीवदान मिळाले होते. नंतर मात्र पावसाने पाठ फिरविली तो आजतागायत. याकाळात सोयाबीनची वाढ खुंटली. पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाला. पाने पिवळी पडून सोयाबीन उद्ध्वस्त झाले. काही शेतकऱ्यांनी ओलीत करून पीक वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र आता उताऱ्यात घट येत आहे. पूर्वी एका बॅगला सात ते आठ क्विंटल सोयाबीन होत होते. परंतु यावर्षी एका बॅगला एक क्विंटलही उतारा येत नाही. मजुरी व थ्रेशरचालकाला दिले जाणारे पैसे यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीही उरत नाही. अशा स्थितीत सोयाबीन काढावा की सरळ नांगर टाकावा अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)