शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जिल्हा बँक नोकरभरतीसाठी नऊ एजंसी उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:48 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील लिपिक व शिपायाच्या १४७ जागांची भरती घेण्यासाठी नऊ एजन्सीजने तयारी दर्शविली आहे. मात्र त्यापैकी केवळ दोनच संस्था शासनाच्या नव्या निकषानुसार पात्र ठरणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देकेवळ दोनच पात्र : मंगळवारी संचालक मंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील लिपिक व शिपायाच्या १४७ जागांची भरती घेण्यासाठी नऊ एजन्सीजने तयारी दर्शविली आहे. मात्र त्यापैकी केवळ दोनच संस्था शासनाच्या नव्या निकषानुसार पात्र ठरणार असल्याची माहिती आहे.जिल्हा बँकेत लिपिकाच्या १३३ व शिपायाच्या १४ अशा १४७ जागांसाठी नोकरभरती घेतली जाणार आहे. भरतीची ही प्रक्रिया राबविण्यासाठी एजंसीजचे अर्ज मागण्यात आले होते. शुक्रवार त्यासाठी अखेरचा दिवस होता. एकूण नऊ एजंसीजने ही भरती घेण्याची तयारी दर्शविली. शनिवारी या अर्जांची छाननी करण्यात आली. मंगळवारी ५ फेब्रुवारी रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा व निर्णय होणार आहे. शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची नोकरभरती घेण्याबाबत १५ जून २०१८ च्या आदेशान्वये निकष, शर्ती-अटी जारी केल्या आहेत. त्यानुसार प्राप्त नऊ अर्जांपैकी केवळ दोनच संस्था ही भरती घेण्यासाठी पात्र ठरू शकतात, असा अंदाज आहे.जिल्हा बँकेची ही नोकरभरती आॅनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. शासनाच्या निकषानुसार देशभरातील चारच संस्था ही नोकर भरती घेण्यासाठी पात्र ठरतात. त्यातही तीन संस्थांनी ही भरती घेण्यास नकार दिला आहे. उर्वरित एक संस्था ही भरती प्रक्रिया राबवू शकते. मात्र बँकेकडे आॅनलाईन परीक्षेसाठी तेवढ्या पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. अशावेळी त्या संस्थेने पुण्यात परीक्षा घेतो म्हटल्यास अडचण निर्माण होऊ शकते. लिपिकच नव्हे तर चपराशीपदासाठीसुद्धा उच्चशिक्षित उमेदवार तयारीत आहेत. मात्र त्यांना दुसरा जॉब लागल्यास ते सोडून जातात. पुणे जिल्हा बँकेने ११०० जागांपैकी ३८० जागांची जाहिरात काढली. त्यातही २०० उमेदवारांनाच नियुक्त्या दिल्या. मात्र महिनाभरातच त्यातील २४ जण सोडून गेले. अशीच अवस्था अकोला जिल्हा बँकेच्या नोकरभरतीची झाली आहे. म्हणूनच भविष्यात जागा रिक्त राहू नये या दृष्टीनेही यवतमाळ जिल्हा बँकेकडून काळजी घेतली जाणार आहे.भरतीत गैरप्रकाराला थारा नाही, कुणालाही पैसे देऊ नकाजिल्हा मध्यवर्ती बँकेची ही नोकरभरती आॅनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेचे गुण वेबसाईटवर जाहीर केले जातील. त्यामुळे सर्व कारभार पारदर्शक राहील. संचालकांच्या हातात केवळ मुलाखतीचे पाच गुण आहेत. त्या बळावर कुणालाही सिलेक्ट करणे शक्य होणार नाही. त्यामुळे या भरतीत गैरप्रकाराला थारा नाही, कुणीही कुणाच्या आमिषाला बळी पडू नये, कुणासोबतही पैशाचे व्यवहार करू नये, असे आवाहन बँकेचे ‘सर्वेसर्वा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका ज्येष्ठ संचालकाने ‘लोकमत’च्या माध्यमातून केले आहे. यापूर्वीचा अनुभव पाहता ही भरती पूर्णत: पारदर्शक पद्धतीने व शासनाने सूचविलेल्या देशातील टॉप चार एजंसीपैकी एकाकडून घेण्याचा प्रयत्न आहे. सर्व काही नियमानुसार होणार असल्याने मेरीट असलेल्या उमेदवारालाच प्राधान्य राहील, असेही या संचालकाने स्पष्ट केले. भरतीबाबत बाहेर सुरू असलेली दर, सेटींग, कोटा या सर्वबाबींची चर्चा व्यर्थ असल्याचे व कुणाची इच्छा असलीतरी आॅनलाईनमुळे ते करता येणे कुणालाही शक्य नसल्याचे या संचालकाने सांगितले.