शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी समाजाचा जीवनस्तर उंचावण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 06:00 IST

जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांची प्रगट मुलाखत पार पडली. त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सन्मानपत्राचे वाचन यवतमाळ आकाशवाणीचे उद्घोषक प्रमोद बाविस्कर यांनी केले. लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संस्थापक असलेले डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांनी आपला जीवनक्रम, सामाजिक कार्य, मिळालेली प्रेरणा, समाजापुढील समस्या यावेळी मांडल्या.

ठळक मुद्देप्रकाश व मंदाकिनी आमटे : प्रकट मुलाखतीत मांडले अनुभव, पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्याचे केले आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जगभरात आज आदिवासींची सुमारे दहा कोटी लोकसंख्या आहे. समाजातील प्रत्येकाने त्यांना यथार्थ मदत करावी, त्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लावावा, कारण आजही या समाजातील काही लोक दारिद्र्य, भूकबळी यासारख्या समस्यांनी ग्रस्त आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन करून नवनवीन उपकरणांद्वारे आदिवासींचा जीवनस्तर उंचावण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे यांनी प्रकट मुलाखतीत मांडले.येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांची प्रगट मुलाखत पार पडली. त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सन्मानपत्राचे वाचन यवतमाळ आकाशवाणीचे उद्घोषक प्रमोद बाविस्कर यांनी केले. लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संस्थापक असलेले डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांनी आपला जीवनक्रम, सामाजिक कार्य, मिळालेली प्रेरणा, समाजापुढील समस्या यावेळी मांडल्या.विवाह अत्यंत साध्या पद्धतीने आणि रविवारच्या मुहुर्तावर संपन्न झाला. समाजकार्याची प्रेरणा डॉक्टरकीचे शिक्षण घेतल्यानंतर बाबा व तार्इंच्या संस्कारातून मिळाली. इतर क्षेत्राचा विचारही मनात शिरला नाही. लोकबिरादरी प्रकल्पात वीज, पाणी, रस्त्याचा अभाव असल्याने काम करणे अत्यंत खडतर प्रवास होता. सुरुवातीला माडिया या आदिवासी लोकांबरोबर संवादात अनेक अडचणी येत होत्या. डॉ. मंदाकिनी आमटे यांनी स्थानिक आदिवासींची भाषा व मराठी भाषा यासंदर्भात एक छोटा शब्दकोष तयार करून संभाषणाच्या समस्येवर मात केली. त्यामुळे या लोकांमध्ये जवळीक वाढली व त्यांच्या आरोग्य समस्यांवर उपचार करणे सोपे झाले.आजच्या परिस्थितीत कोरोनासारख्या व्हायरसद्वारे होणारे संक्रमण हा प्रश्न निसर्गाचा समतोल न राखल्यामुळेच उद्भवला आहे. मानवाने आपल्या गरजा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. निसर्गाचा समतोल राखावा, पर्यावरणाचा ºहास टाळावा, असे आवाहन डॉ. आमटे यांनी केले.लोकबिरादरीतून आर्थिक संपन्नतेकडेलोकबिरादरी प्रकल्पाद्वारे जलसंधारणाचे उपक्रम राबविले जात आहे. त्याद्वारे मत्स्य उत्पादनासारखे उद्योग उभारून आदिवासी आर्थिक संपन्नतेकडे जात आहे. शेतीकडेसुद्धा लक्ष देऊन अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करत आहे. या कार्यात त्यांची तिसरी पिढी डॉ. अनिकेत व स्नूषा अनघा अग्रेसर आहे. आदिवासी भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करून उच्च शिक्षणाची दालनेसुद्धा उपलब्ध करून दिली जात आहे, असे डॉ. आमटे म्हणाले.