शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सामाजिक समतेसाठी प्रयत्नांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 11:31 PM

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी जगाला समतेची शिकवण दिली. दूरदृष्टी असलेल्या या लोकनेत्याने समाजातील दुर्बल, मागासलेल्या घटकांसाठी अनेक धोरणे राबविली.

ठळक मुद्देमाधुरी आडे : सामाजिक न्यायदिनी विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी जगाला समतेची शिकवण दिली. दूरदृष्टी असलेल्या या लोकनेत्याने समाजातील दुर्बल, मागासलेल्या घटकांसाठी अनेक धोरणे राबविली. त्यांनी सांगितलेल्या सामाजिक समतेच्या विचारांची आजही आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी केले.राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आयोजित सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमात त्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक उपायुक्त किशोर भोयर, जात पडताळणी समितीचे उपायुक्त सुनील वारे, नगरपरिषद आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, अनिल आडे आदी उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दहावी व बारावीत प्राविण्य मिळविणारे अनिकेत निकाडे, किरण जमधाडे, मेघा मुरादे, गीतांजली वाघमारे, यश चव्हाण, रोहित जाधव, सलोनी खोब्रागडे, प्रज्वल मुनेश्वर, दिव्यानी डहाके, पल्लवी खैरमोडे यांना राजर्षी शाहू महाराज गुणवंत पुरस्कार, अर्चना गेडे, वैष्णवी गजभिये, संदीप खंदारे यांना स्वाधार योजनेंतर्गत पुरस्कार देण्यात आला. वैभव गोरे व अभिषेक पोटे यांना जातपडताळणी प्रमाणपत्र देण्यात आले. अनुसूचित जाती निवासी शाळेचे शिक्षक एस.एस. पडाळ, शिक्षिका एम.बी. भोयर आणि ताई भरजाडे यांचा सत्कार करण्यात आला.प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे सहायक उपायुक्त किशोर भोयर यांनी केले. संचालन प्रा. कमल राठोड यांनी तर आभार जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी मंगला मून यांनी मानले. कार्यक्रमाला माजी समाजकल्याण अधिकारी गवई, दलितमित्र पुरस्कारप्राप्त शिवराम करके, देवण्णा पालेवाल, श्रावण सोनोने, प्रल्हाद सिडाम, भगवान मुदाने, अण्णाभाऊ साठे पुरस्कारप्राप्त केशव लोढे आदी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीShahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंती